शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

कोरोनाने पुसले शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST

अहमदनगर : कोरोना महामारीने अनेक संकटे निर्माण केली. जिल्ह्यातील शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू या महामारीने पुसले गेले. आता ही ...

अहमदनगर : कोरोना महामारीने अनेक संकटे निर्माण केली. जिल्ह्यातील शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू या महामारीने पुसले गेले. आता ही कुटुंबे सावरण्यासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्यात येत आहे.

कोरोनामुळे जिल्ह्यातील अडीच हजारांपेक्षा जास्त पुरुषांना, तर दीड हजारांपेक्षा जास्त महिलांना जीव गमवावा लागला. अडीच हजार मृत्यूंमध्ये घराची जबाबदारी असणाऱ्या कर्त्या पुरुषांची संख्या मोठी होती. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर बहुतांशवेळा कुटुंबाची जबाबदारी ही त्याच्या पत्नीवर येऊन पडते. सध्याच्या परिस्थितीमध्ये तत्काळ नोकरी किंवा कुठला व्यवसाय मिळणे कठीण आहे. या परिस्थितीमध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, नॅशनल फॅमिली बेनिफिट स्कीम या योजनांमध्ये अशा महिलांची नावे घेऊन त्यांना पेन्शन सुरू करण्यात येते.

-----------

असा करा अर्ज

जिल्हा महिला, बालविकास विभागाकडून जिल्ह्यातील अशा कुटुंबांचा सर्व्हे करण्यात येत आहे. त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात येणार आहे. महिला बालविकास विभागाचे कर्मचारी, अधिकारी गावोगावी जाऊन याची माहिती घेत आहेत. या योजनेपासून कोणी वंचित राहू नये, या उद्देशाने घरातील कर्ता पुरुष कोरोनामुळे गेला असल्यास त्याची माहिती महिला बाल विकास विभागाला द्यावी. तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

-----------

जिल्ह्यातील एकूण बाधित :

बरे झालेले रुग्ण :

उपचार सुरू असलेले रुग्ण :

पुरुषांचा मृत्यू- २५०० पेक्षा जास्त

महिलांचा मृत्यू- १५०० पेक्षा जास्त

निराधार महिला- ५०० पेक्षा जास्त

------------

१) कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये ३००० पेक्षा जास्त पुरुष रुग्णांना जीव गमवावा लागला

२) घरातील कर्त्या पुरुषाच्या पाठीमागे राहिलेल्या कुटुंबाला सावरताना महिलांची होरपळ होत आहे

३) अनेक महिलांच्या घरामध्ये सासरे, सासू तसेच लहान मुले देखील असल्याने या महिलांना मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

४) शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या महिलांना आपल्या पायावर उभे राहता येऊ शकते, किमान कुटुंब सावरण्यासाठी कुटुंब आहे, त्यांची भूक भागवण्यासाठी शासनाकडून निधी मिळणार आहे.

--------

कोरोना महामारीमुळे शेकडो महिलांना कुटुंब सावरण्यासाठी धडपड करावी लागत आहे. ज्या महिलेचा पती कोरोनामुळे गेला, अशा महिलांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी आदी योजनांच्या माध्यमातून अशा महिलांना मदत देण्यात येत आहे.

- महिला व बालविकास कार्यालय

---------