शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने पुसले शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST

अहमदनगर : कोरोना महामारीने अनेक संकटे निर्माण केली. जिल्ह्यातील शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू या महामारीने पुसले गेले. आता ही ...

अहमदनगर : कोरोना महामारीने अनेक संकटे निर्माण केली. जिल्ह्यातील शेकडो महिलांच्या कपाळावरील कुंकू या महामारीने पुसले गेले. आता ही कुटुंबे सावरण्यासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्यात येत आहे.

कोरोनामुळे जिल्ह्यातील अडीच हजारांपेक्षा जास्त पुरुषांना, तर दीड हजारांपेक्षा जास्त महिलांना जीव गमवावा लागला. अडीच हजार मृत्यूंमध्ये घराची जबाबदारी असणाऱ्या कर्त्या पुरुषांची संख्या मोठी होती. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर बहुतांशवेळा कुटुंबाची जबाबदारी ही त्याच्या पत्नीवर येऊन पडते. सध्याच्या परिस्थितीमध्ये तत्काळ नोकरी किंवा कुठला व्यवसाय मिळणे कठीण आहे. या परिस्थितीमध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, नॅशनल फॅमिली बेनिफिट स्कीम या योजनांमध्ये अशा महिलांची नावे घेऊन त्यांना पेन्शन सुरू करण्यात येते.

-----------

असा करा अर्ज

जिल्हा महिला, बालविकास विभागाकडून जिल्ह्यातील अशा कुटुंबांचा सर्व्हे करण्यात येत आहे. त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात येणार आहे. महिला बालविकास विभागाचे कर्मचारी, अधिकारी गावोगावी जाऊन याची माहिती घेत आहेत. या योजनेपासून कोणी वंचित राहू नये, या उद्देशाने घरातील कर्ता पुरुष कोरोनामुळे गेला असल्यास त्याची माहिती महिला बाल विकास विभागाला द्यावी. तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

-----------

जिल्ह्यातील एकूण बाधित :

बरे झालेले रुग्ण :

उपचार सुरू असलेले रुग्ण :

पुरुषांचा मृत्यू- २५०० पेक्षा जास्त

महिलांचा मृत्यू- १५०० पेक्षा जास्त

निराधार महिला- ५०० पेक्षा जास्त

------------

१) कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये ३००० पेक्षा जास्त पुरुष रुग्णांना जीव गमवावा लागला

२) घरातील कर्त्या पुरुषाच्या पाठीमागे राहिलेल्या कुटुंबाला सावरताना महिलांची होरपळ होत आहे

३) अनेक महिलांच्या घरामध्ये सासरे, सासू तसेच लहान मुले देखील असल्याने या महिलांना मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

४) शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या महिलांना आपल्या पायावर उभे राहता येऊ शकते, किमान कुटुंब सावरण्यासाठी कुटुंब आहे, त्यांची भूक भागवण्यासाठी शासनाकडून निधी मिळणार आहे.

--------

कोरोना महामारीमुळे शेकडो महिलांना कुटुंब सावरण्यासाठी धडपड करावी लागत आहे. ज्या महिलेचा पती कोरोनामुळे गेला, अशा महिलांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी आदी योजनांच्या माध्यमातून अशा महिलांना मदत देण्यात येत आहे.

- महिला व बालविकास कार्यालय

---------