शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

कोरोना विषाणू दुबई व्हाया अहमदनगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST

.............. उद्योगाचे चाक रुतले मार्च महिन्याच्या शेवटी जिल्ह्यातील कारखान्यांचे चाक थांबले. दोन महिन्यांनंतर कारखाने रडतखडत सुरू झाले. पण, अनेक ...

..............

उद्योगाचे चाक रुतले

मार्च महिन्याच्या शेवटी जिल्ह्यातील कारखान्यांचे चाक थांबले. दोन महिन्यांनंतर कारखाने रडतखडत सुरू झाले. पण, अनेक बंधने आली. छोट्या उद्योजकांना ही बंधने पाळून कारखाने सुरू करणे शक्य नव्हते. कधी सुरू कधी बंद, यातच हे आर्थिक वर्ष सरले.

.......

व्यवसाय ठप्प झाले

कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन करावे लागले. फिरणाऱ्यावर बंधने आली. रस्ते निर्मनुष्य झाले. दुकानांचे शटर बंद होते. हॉटेल बंद राहिले. मंगल कार्यालयांतील सनई चौघड्यांचा आवाज कानावर पडला नाही. वऱ्हाडींसाठी जेवण बनिवणारे केटर्स, लग्नसमारंभासाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी झाली नाही. त्यामुळे व्यावसायिकांना हातावर हात धरून बसण्याची वेळ आली.

....

परप्रांतीय कामगारांनी घर गाठले

लॉकडाऊन काळात वाहतूक सेवा ठप्प होती. परप्रांतीय कामगारांनी भीतीपोटी घर गाठले. लॉकडाऊन शिथिल झाला. पण, सर्वच कामगार परत आले नाहीत. केवळ ३० ते ४० टक्केच कामगार परत आले.

......

सामाजिक संस्थांनी केली मदत

लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार झाली. स्थलांतरित कामगारांसह हातावर पोट असणाऱ्यांना सामाजिक संस्थांनी मदत केली. काहींनी किरणा दिला, तर लंगरसारख्या संस्थांनी घरोघरी जाऊन अन्नाचे पॅकेट वाटले.

.....

कोविड केअर सेंटर उभारणीत संस्थांचा सहभाग

वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात शासकीय आरोग्य कमी पडू लागली. ही गरज लक्षात घेऊन अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या. त्यांनी कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी हातभार लावला. त्यामुळे हजारो रुग्णांना मोफत उपचार घेता आले.

....

भाजीविक्रेत्यांची परवड

कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. परंतु, भाजीविक्रेत्यांना भाजी विकण्याची मुभा होती. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून परवानगी देण्यात आली होती. मात्रए गर्दी होऊ लागल्याने भाजी विक्रेत्यांना उठविण्यात आले. घरोघरी जाऊन शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची विक्री केली.

...

अमरधाममध्ये रांगा

कोरोनामुळे मृतांच्या संख्येत अचानक वाढ झाली. कोरानामुळे मृत पावलेल्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यावर बंधने होती. प्रशासकीय यंत्रणेकडूनच अंत्यंविधी केला जात होता. जिल्हाभरातून रुग्ण जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल होत होती. त्यामुळे अंत्यविधीची जबाबदारी एकट्या महापालिकेवर येऊन पडली. अमरधाममध्ये एकच विद्युत दाहिनी होती. त्यामुळे अंत्यविधीसाठी प्रथमच नातेवाईकांना रांगेत उभे रहावे लागले.

....

शहरवासीयांनी गाव गाठले

लॉकडाऊन झाल्याने अनेक शहरवासीयांनी भीतीपोटी गाव गाठले. पुणे, मुंबई, औरंगाबाद, या बड्या शहरांतून नागरिक गावाकडे गेले. परंतु, त्यांच्या जाण्याचे गावागावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पाहुण्यांचा वाद थेट तहसील कचेरीत गेल्याच्या घटना घडल्या.

....

रोजगार गेल्याने व्यवसाय सुरू केले

कोरोनाच्या संकटात अनेकांचे रोजगार गेले. रोजगार गेल्याने हाताला काम राहिले नाही. त्यामुळे रोजीराेटीचा प्रश्न निर्माण झाला. रोजगार गेल्याने अनेकांनी व्यवसायात उडी घेतली.

....

जीवनावश्यक वस्तूंसाठी हाल

शहरातील ज्या भागात रुग्ण सापडले, तो भाग कंन्टेमेन्ट झोन म्हणून घोषित केले गेले. पत्रे लावून हा भाग बंद केला गेला. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी नागिरकांचे हाल झाले. घरपोहोच सेवा देणाऱ्यांची यादी तयार करून ती सोशल मीडियाव्दारे नागिरकांपर्यंत पोहोच करण्यात आली.

....