कोरोना विषाणू दुबई व्हाया अहमदनगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST2021-03-13T04:36:53+5:302021-03-13T04:36:53+5:30

.............. उद्योगाचे चाक रुतले मार्च महिन्याच्या शेवटी जिल्ह्यातील कारखान्यांचे चाक थांबले. दोन महिन्यांनंतर कारखाने रडतखडत सुरू झाले. पण, अनेक ...

Corona virus Dubai via Ahmednagar | कोरोना विषाणू दुबई व्हाया अहमदनगर

कोरोना विषाणू दुबई व्हाया अहमदनगर

..............

उद्योगाचे चाक रुतले

मार्च महिन्याच्या शेवटी जिल्ह्यातील कारखान्यांचे चाक थांबले. दोन महिन्यांनंतर कारखाने रडतखडत सुरू झाले. पण, अनेक बंधने आली. छोट्या उद्योजकांना ही बंधने पाळून कारखाने सुरू करणे शक्य नव्हते. कधी सुरू कधी बंद, यातच हे आर्थिक वर्ष सरले.

.......

व्यवसाय ठप्प झाले

कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन करावे लागले. फिरणाऱ्यावर बंधने आली. रस्ते निर्मनुष्य झाले. दुकानांचे शटर बंद होते. हॉटेल बंद राहिले. मंगल कार्यालयांतील सनई चौघड्यांचा आवाज कानावर पडला नाही. वऱ्हाडींसाठी जेवण बनिवणारे केटर्स, लग्नसमारंभासाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी झाली नाही. त्यामुळे व्यावसायिकांना हातावर हात धरून बसण्याची वेळ आली.

....

परप्रांतीय कामगारांनी घर गाठले

लॉकडाऊन काळात वाहतूक सेवा ठप्प होती. परप्रांतीय कामगारांनी भीतीपोटी घर गाठले. लॉकडाऊन शिथिल झाला. पण, सर्वच कामगार परत आले नाहीत. केवळ ३० ते ४० टक्केच कामगार परत आले.

......

सामाजिक संस्थांनी केली मदत

लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार झाली. स्थलांतरित कामगारांसह हातावर पोट असणाऱ्यांना सामाजिक संस्थांनी मदत केली. काहींनी किरणा दिला, तर लंगरसारख्या संस्थांनी घरोघरी जाऊन अन्नाचे पॅकेट वाटले.

.....

कोविड केअर सेंटर उभारणीत संस्थांचा सहभाग

वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात शासकीय आरोग्य कमी पडू लागली. ही गरज लक्षात घेऊन अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या. त्यांनी कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी हातभार लावला. त्यामुळे हजारो रुग्णांना मोफत उपचार घेता आले.

....

भाजीविक्रेत्यांची परवड

कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. परंतु, भाजीविक्रेत्यांना भाजी विकण्याची मुभा होती. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून परवानगी देण्यात आली होती. मात्रए गर्दी होऊ लागल्याने भाजी विक्रेत्यांना उठविण्यात आले. घरोघरी जाऊन शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची विक्री केली.

...

अमरधाममध्ये रांगा

कोरोनामुळे मृतांच्या संख्येत अचानक वाढ झाली. कोरानामुळे मृत पावलेल्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यावर बंधने होती. प्रशासकीय यंत्रणेकडूनच अंत्यंविधी केला जात होता. जिल्हाभरातून रुग्ण जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल होत होती. त्यामुळे अंत्यविधीची जबाबदारी एकट्या महापालिकेवर येऊन पडली. अमरधाममध्ये एकच विद्युत दाहिनी होती. त्यामुळे अंत्यविधीसाठी प्रथमच नातेवाईकांना रांगेत उभे रहावे लागले.

....

शहरवासीयांनी गाव गाठले

लॉकडाऊन झाल्याने अनेक शहरवासीयांनी भीतीपोटी गाव गाठले. पुणे, मुंबई, औरंगाबाद, या बड्या शहरांतून नागरिक गावाकडे गेले. परंतु, त्यांच्या जाण्याचे गावागावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पाहुण्यांचा वाद थेट तहसील कचेरीत गेल्याच्या घटना घडल्या.

....

रोजगार गेल्याने व्यवसाय सुरू केले

कोरोनाच्या संकटात अनेकांचे रोजगार गेले. रोजगार गेल्याने हाताला काम राहिले नाही. त्यामुळे रोजीराेटीचा प्रश्न निर्माण झाला. रोजगार गेल्याने अनेकांनी व्यवसायात उडी घेतली.

....

जीवनावश्यक वस्तूंसाठी हाल

शहरातील ज्या भागात रुग्ण सापडले, तो भाग कंन्टेमेन्ट झोन म्हणून घोषित केले गेले. पत्रे लावून हा भाग बंद केला गेला. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी नागिरकांचे हाल झाले. घरपोहोच सेवा देणाऱ्यांची यादी तयार करून ती सोशल मीडियाव्दारे नागिरकांपर्यंत पोहोच करण्यात आली.

....

Web Title: Corona virus Dubai via Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.