शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जलविद्युत प्रकल्प पूर्णत्वाकडे

By admin | Updated: May 22, 2014 00:01 IST

राजूर : निळवंडे धरणाच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या सात मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून

राजूर : निळवंडे धरणाच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या सात मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रवरेच्या पाण्यावर सुरू होणारा हा तिसरा जलविद्युत प्रकल्प ठरणार आहे. प्रवरेच्या पाण्यावर भंडारदरा येथे सुरुवातीला बारा मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प शासनामार्फत उभारण्यात आला. यानंतर याच पाण्यावर कोदणी येथे ३४ मेगावॅट क्षमतेचा दुसरा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला. मात्र कोदणीचा प्रकल्प सुरू राहण्यासाठी त्यास २ हजार ७०० क्युसेकचा पाण्याचा विसर्ग आवश्यक असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांतच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असतो. तर इतर वेळी भंडारदरा धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यानंतर हे पाणी रंधा येथील उन्नयनी बंधार्‍यात साठविले जाते त्यानंतर ते वीज निर्मितीसाठी सोडण्यात येत असते. भंडारदरा- १ प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहिल्यास वर्षाला सुमारे साडेतीन हजार कोटी युनिट, तर कोदणीतून साडेपाच हजार कोटी युनिट वीजनिर्मिती होऊ शकते. हे दोन्ही प्रकल्प करार पद्धतीने खासगीरित्या चालविण्यास दिले आहेत. भंडारदरा धरणातून सोडण्यात येणारे पाणी पुढे निळवंडे धरणात साठविण्यात येते व त्यानंतर ते प्रवरा पात्रात सोडण्यात येते. या पाण्यावरच पुन्हा वीजनिर्मिती करण्याचे ठरवत शासनाने हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर उभारण्यास परवानगी दिली व काही महिन्यांत हा प्रकल्पही उभा राहिला. वीज निर्मितीसाठी ३.५ मेगावॅट क्षमतेचे दोन टर्बाईन उभारण्यात आले असून, विजेचे पॅनल बोर्डही बसविण्यात आले आहेत. यात तयार होणारी वीज भोजदरी येथील १३२ केव्ही उपकेंद्रास जोडण्यात येणार होती, मात्र हे उपकेंद्र अद्याप उभे राहिले नसल्याने सध्या ही वीज राजूर वीज उपकेंद्रास जोडण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्प ठिकाणापासून राजूरपर्यंत १९ मनोरे उभारण्यात येत आहेत. हे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. प्रकल्पासाठी धरणातून पाणी सोडण्यासाठी केवळ गेट बसविण्याचे काम बाकी आहे. हे काम एक दीड महिन्यात पूर्ण होणार असल्याचा अंदाज द्वार-उभारणी पथकाचे सहाय्यक अभियंता पी. एन. थोरात यांनी व्यक्त केला. (वार्ताहर) ५३ मेगावॅटची क्षमता हा प्रकल्प पावसाळ्यात सुरू झाल्यास भंडारदरा धरणाच्या प्रवरेतील पाण्यावर एकूण ५३ मेगावॅट वीज निर्मिती सुरू होईल आणि पावसाळा व धरणातील अन्य आवर्तन काळात या तीनही प्रकल्पांतून वर्षभरात सुमारे दहा हजार कोटी युनिटहून अधिक वीजनिर्मिती होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कॅनालच्या गेटशीही तीन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.