शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

कर्जत-जामखेडला पुन्हा सहकारी साखर कारखाना; मुख्यमंत्र्यांची घोषणा, मतदारसंघाच्या अपेक्षा उंचावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 13:36 IST

कर्जत-जामखेडला पुन्हा मंत्रिपद मिळेल ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच मतदारसंघात सहकारी साखर कारखान्याला मंजुरी देण्याचे सूतोवाचही त्यांनी केल्याने प्रचारात रंगत भरली गेली आहे. मतदारसंघात सहकारी साखर कारखान्याची निर्मिती होण्याची चर्चा यामुळे पुन्हा सुरु झाली आहे. 

विश्लेषण - अशोक निमोणकर । जामखेड : कर्जत-जामखेडला पुन्हा मंत्रिपद मिळेल ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच मतदारसंघात सहकारी साखर कारखान्याला मंजुरी देण्याचे सूतोवाचही त्यांनी केल्याने प्रचारात रंगत भरली गेली आहे. मतदारसंघात सहकारी साखर कारखान्याची निर्मिती होण्याची चर्चा यामुळे पुन्हा सुरु झाली आहे. कर्जत जामखेड मतदारसंघ मुळातच दुष्काळी पट्ट्यात आहे. त्यामुळे मोठे उद्योग व कारखाने नाहीत. अशा परिस्थितीत जनता दलाच्या नेत्या रंजना पाटील यांनी सहकार तत्वावरील साखर कारखाना काढण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. नंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब पवार यांनी जामखेड तालुक्यात सहकारी साखर कारखाना काढण्यासाठी प्रयत्न केला पण, तोही सफल झाला नाही. कर्जत तालुक्यात आबासाहेब निंबाळकर, बापूसाहेब देशमुख, भालचंद्र पाटील, आनंदराव फाळके यांनी जगदंबा सहकारी साखर कारखाना काढला. परंतु पुढे तो कर्जबाजारी होऊन लिलावात निघाला. हा कारखाना अवघ्या १९ कोटीच्या लिलावात खासगी तत्वावर विकला गेला. तोच अंबालिका म्हणून पुढे आला.माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी हळगाव येथे खाजगी कारखाना उभारला. परंतु काही दिवसांनी त्यांनी तो विकला. भीमापट्ट्यात व उजनी फुगवट्यातील पाण्यामुळे या भागात उसाचा पट्टा आहे. तसेच तालुक्यातील खैरी प्रकल्प व काही पाझर तलाव या ठिकाणी उसाचे क्षेत्र आहे. खासगी कारखाना चालतो. मात्र, सहकाराला यश आले नाही. मतदारसंघातील शेतक-यांची ऊस देताना अडवणूक होऊ नये म्हणून सहकारी तत्वावरील साखर कारखाना काढण्याची घोषणा पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रचारात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यास मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. नुकतीच सहकारी तत्वावरील सूतगिरणीला सरकारने मंजुरी दिली आहे. त्यापाठोपाठ कारखान्याबाबत भाष्य करण्यात आले आहे. या मतदारसंघात राम शिंदे व रोहित पवार यांच्यात चुरस आहे. पवार यांच्याकडे खासगी कारखाना आहे. त्याला पर्याय म्हणून शिंदे यांनी सहकारी साखर कारखाना काढण्याची घोषणा केली आहे. कारखाना निर्मितीचा हा मुद्दा प्रचारात कळीचा बनला आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर