शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

CM देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केले ८ वर्षापूर्वीचे वचन; ३८८ किमी दूर पोहोचले लग्नाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 08:46 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लग्नाला उपस्थित राहून ८ वर्षांपूर्वी दिलेले वचन पूर्ण केले.

Ahilya Nagar : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी एका लग्न समारंभात पोहोचले. हा विवाह ८ वर्षांपूर्वी अत्याचारानंतर खून झालेल्या पीडितेच्या बहिणीचा विवाह होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लग्नाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिलं होतं. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी या लग्नाला हजेरी लावली आणि नव दाम्पत्याला आशीर्वाद दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीडित कुटुंबाला आश्वासन दिले होते की ते त्यांच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेतील आणि स्वतः लग्न समारंभाला उपस्थित राहतील. विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या पोस्टमधून ही माहिती दिली आहे.

अहिल्यानगरमध्ये आयोजित एका विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. २०१६ मध्ये कोपर्डी बलात्कार आणि खून पीडितेच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. या लग्नाला हजर राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ वर्ष जुने वचन पूर्ण केले. तत्पूर्वी, ५ डिसेंबर रोजी पदभार स्वीकारल्यानंतर, बोन मॅरो प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी स्वाक्षरी केली. पुणे येथील रहिवासी चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या उपचारासाठी ही मदत देण्यात आली होती. चंद्रकांत यांच्या पत्नीने मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीचे आवाहन केले होते, ते मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्वीकारले. 

"कोपर्डीत ८ वर्षांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला होता. कुटुंबीयांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त केली. तेव्हाच तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो आणि त्या लग्नालाही मी आवर्जून येईन, असा शब्द दिला होता. आज तो दिवस उगवला आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या लग्नसोहळ्याला हजेरी लावत आपला शब्द पाळला. वधू-वराला भरभरून आशिर्वाद दिले. नेता असावा तर असा, दिलेला शब्द पाळणारा! या लग्नात मंगलाष्टक म्हणण्याची संधी मला लाभली, कुटुंबीयांनी ती संधी मला दिली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी आहे. सुजय विखे पाटील, राम शिंदे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते," असं प्रवीण दरेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. "गेल्या काही वर्षांपासून मी कुटुंबाशी जोडलो गेलो आहे. त्या घटनेपासून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आम्हाला एकमेकांबद्दल खूप आपुलकी आहे. मला आमंत्रण मिळताच मी लग्नाला येईन आणि जोडप्याला आशीर्वाद देईन असे वचन दिले होते," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

दरम्यान, १३ जुलै २०१६ रोजी कोपर्डी येथे राहणाऱ्या एका १५ वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यभरात जोरदार आंदोलने सुरू झाली होती. त्यावेळीही फडणवीस मुख्यमंत्री होते. मराठा क्रांती मोर्चाखाली अनेक आंदोलने झाली, ज्यात मोठ्या संख्येने लोक जमले. या आंदोलनादरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. यामध्ये जितेंद्र उर्फ ​​पप्पू बाबूलाल शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांचा समावेश आहे. भवाळ आणि भैलुमे अजूनही तुरुंगात आहेत. तर, जितेंद्रने गेल्या वर्षी येरवडा कारागृहात फाशी घेतली होती.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAhilyanagarअहिल्यानगरkopardi caseकोपर्डी खटलाBJPभाजपा