नगर @ ४२.२ अंश
By Admin | Updated: May 27, 2014 00:28 IST2014-05-27T00:01:57+5:302014-05-27T00:28:15+5:30
अहमदनगर : गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला आहे.
नगर @ ४२.२ अंश
अहमदनगर : गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला आहे. गेल्या दोन दिवसापासून हाच पारा ४२ अंश सेल्सिअसवर स्थिरावला असून उन्हाच्या काहिलीने नगरकर त्रस्त झाले आहे. यामुळे सर्वांना पावसाची ओढ लागली आहे. मे महिन्यात खर्या अर्थाने उन्हाळ्याची जाणीव झाली. अखेरच्या टप्प्यात उन्हाचा चटका वाढल्याने नगरकरांच्या अंगाची लाही लाही झाली. शहर आणि जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून उन्हाची लाट आहे. पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. दिवसा अनेक ठिकाणी रस्ते निर्मनुष्य असल्याची स्थिती निर्माण होतांना दिसत आहेत आणि ज्यांना दुपारी उन्हात फिरावे लागत आहे ते स्वत:चा उन्हापासून बचाव करतांना दिसत आहेत. वाढलेल्या या तापमानाचा फटका जनजीवनाला बसलेला दिसत असून शहरातील गल्लीबोळात सकाळी ११ नंतर शुकशुकाट दिसून येत आहे. वाढलेली उष्णतेची लाट कमी होण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)वाढलेल्या उन्हाचा फटका सर्वत्र दिसत असला तरी उष्णतेपासून मुक्ती मिळावी, यासाठी ताक, लस्सी, उसाचा रस, संत्री मोसंबीच्या रसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. नगर शहरात सर्वत्र थंड पेयाची दुकाने, स्टॉल गर्दीने फुलून गेलेले आहेत.