शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

एकीतून चिखलठाणची जलक्रांती; तयार झाली बंधा-यांची साखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 16:05 IST

लोकसहभागातून मातीच्या बंधा-यांची साखळी निर्माण करून वाया जाणारे पाणी अडवण्याची किमया राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण या गावातील ग्रामस्थांनी केली आहे. गावच्या एकीतून चिखलठाणची जलक्रांती उदयास आली.

सुभाष आंग्रे । 

म्हैसगाव : लोकसहभागातून मातीच्या बंधा-यांची साखळी निर्माण करून वाया जाणारे पाणी अडवण्याची किमया राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण या गावातील ग्रामस्थांनी केली आहे. गावच्या एकीतून चिखलठाणची जलक्रांती उदयास आली. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ढगफुटीमुळे बंधारे फुटून शेतीचे व जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बंधारे फुटल्याने अडणारे पाणी वाहून गेले. बंधा-यांची पाहणी प्रशासकीय अधिका-यांनी केली. बंधारे दुरुस्त करण्याची ग्वाही दिली. यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रस्ताव दाखल करण्यात आला. पावसाळा जवळ येऊनही बंधा-यांची दुरुस्ती होत नव्हती. सरकारी अनास्थेमुळे सरपंच डॉ. सुभाष काकडे यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून बंधारे बांधण्याची कल्पना पुढे आली. यासाठी संजय काकडे, गंगाधर काकडे, सुभाष काकडे, शांताराम काकडे, अनिल काकडे, बाळासाहेब काकडे, राजेंद्र काकडे, आबासाहेब काकडे, नंदू काकडे, भिमराज काकडे, हेमंत गायकवाड यांनी सहकार्य केले.

गावातील प्रत्येक कुटुंबाकडून आर्थिक मदत गोळा करण्यात आली. यासाठी ट्रॅक्टर मालकांनी आपले ट्रॅक्टर दिले. प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाल्यानंतर जेसीबी ट्रॅक्टर या यंत्राच्या साहय्याने पहिला बंधारा दहा ते बारा दिवसात बांधून तयार झाला. गावातील युवकांनी या लोक सहभागाच्या कामाला चिखलठाणची जलक्रांती हे नाव दिले. देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी तळयाच्या कामासाठी मोफत पॉकलॅण्ड दिले. दुसºया बंधाºयाचे कामही दहा बारा दिवसात पूर्ण झाले. लोकसहभागातून दोन मोठ्या बंधाºयाचे काम हे दहा ते अकरा लाखांत पूर्ण झाले.

 गावातील अनुभवी नागरिकांनी अभियंत्याची भूमिका पार पाडली. तिस-या  बंधा-याच्या जागा निश्चित करून त्याचाही शुभारंभ करण्यात आला आहे.

मागील वर्षी ढगफुटी होऊन अचानक जास्त पाणी आल्याने बंधारा फुटून पाणी वाहून वाया गेले होते. बंधा-यांच्या नादुरुस्तीमुळे याही वर्षी पावसाचे पाणी वाया जाणार होते. यासाठी लोकसहभागातून बंधा-यांची दुरुस्ती व नवीन बंधारे बांधले आहेत. - डॉ.सुभाष काकडे, सरपंच, शेरी- चिखलठाण.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीDamधरणWaterपाणी