शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

शिखर बँक चौकशीच्या क्लोजर रिपोर्टला आव्हान; पारनेर कारखाना बचाव समितीकडून आव्हान याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 14:34 IST

राज्य सहकारी बँकेतील शिखर बँक घोटाळा प्रकरणी ७६ संचालकांवर आर्थिक अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सादर केलेल्या या क्लोजर रिपोर्टला मुंबई उच्च न्यायालयात मुख्य तक्रारदारांसह पारनेर साखर कारखाना बचाव समितीने आव्हान दिले आहे. 

पारनेर : राज्य सहकारी बँकेतील शिखर बँक घोटाळा प्रकरणी ७६ संचालकांवर आर्थिक अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सादर केलेल्या या क्लोजर रिपोर्टला मुंबई उच्च न्यायालयात मुख्य तक्रारदारांसह पारनेर साखर कारखाना बचाव समितीने आव्हान दिले आहे. 

गेल्या वर्षी क्लोजर रिपोर्टला मुंबई उच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने बँकेच्या ७६ संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता. सर्वोच्च न्यायालयानेही  हा गुन्हा रद्द करण्याची संचालकांची मागणी फेटाळली होती. त्यानंतर  या गुन्ह्याचा तपास राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने केला होता. वर्षभराच्या तपासानंतर सुमारे ७० हजार पानांचा अहवाल न्यायालयात गेल्या महिन्यात सादर केला होता.

 अहवाल सादर करताना सर्व संचालकांना दोषमुक्त करत या तक्रारीत  फार तथ्य नसल्यामुळे या गुन्ह्याचा तपास बंद करावा,  असा अहवाल न्यायालयाकडे सादर केला होता. परंतु मुख्य तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते माणिकराव जाधव  व याचिकाकर्ते सुरिंदर अरोरा यांच्यासह  शालिनीताई पाटील, बबनराव कवाद यांनी या तपास बंद अहवालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हा तपास आम्हाला मान्य नसून तो  राज्याच्या पोलीस यंत्रणेकडून  काढून ईडी किंवा सीबीआयकडे सोपवण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे  केली आहे.

 सक्त वसुली संचालनालयानेही यापूर्वीच  या अहवालावर आक्षेप घेवून तपास आमच्याकडे वर्ग करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली आहे. याप्रकरणी पुढील ६ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

     राज्य सहकारी बँकेने पारनेर सहकारी साखर कारखान्यासह राज्यातील सुमारे ३५ सहकारी साखर कारखाने, सुतगिरण्या, दूध संघ, कवडीमोल भावात खासगी उद्योजकांना  विकून धनदांडग्यांच्या घशात घातल्या आहेत. पारनेर साखर कारखान्यावरही कर्जाचा खोटा डोंगर दाखवून कवडीमोल किमतीत खाजगी भांडवलदाराला विकल्याचे  अहवालावरून स्पष्ट झाले आहे.  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गुन्हा नोंद झाल्यानंतर विशेष तपास पथकात ईडी व सीबीआयचे अधिकारी असणे आवश्यक होते. परंतु सध्याच्या राज्य सरकारने  पोलीस खात्यातील आपल्या मर्जीतील तपासी अधिकारी नेमून आपल्या सोयीचा तपास अहवाल तयार केल्याचा आरोप मुख्य तक्रारदार माणिकराव जाधव व सुरिंदर अरोरा यांनी केला आहे.

अ‍ॅड. सतिष तळेकर, प्रज्ञा तळेकर तक्रारदारांची बाजू उच्च न्यायालयात मांडत आहेत.

      पारनेर साखर कारखाना विक्रीत राज्य सहकारी बँकेने केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे आम्ही न्यायालयात दाखल केले आहेत. त्यामुळे शिखर बँक घोटाळ्यातील गुन्ह्याचा राज्य सरकारच्या तपास बंद अहवालाला पारनेरच्या वतीनेही आम्ही आव्हान दिलेले आहे,  असे पारनेर कारखाना बचाव समितीचे रामदास घावटे, बबनराव कवाद, साहेबराव मोरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरBanking Sectorबँकिंग क्षेत्रCourtन्यायालय