शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
5
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
6
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
7
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
8
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
9
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
10
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
11
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
12
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
13
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
14
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
15
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
16
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
17
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
18
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
19
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
20
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद

शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेतच प्रमाणपत्राची मुदत संपली; पात्रता पुन्हा सिद्ध करण्याची नामुष्की 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:21 IST

२०१२, २०१३ मध्ये सीटीईटी/टीईटी पात्र असलेल्यांना यापुढे होणा-या अभियोग्यता चाचणीसाठी पुन्हा टीईटी पास होण्याच्या दिव्यातून जावे लागणार आहे. त्यामुळे डीटीएड धारकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नानासाहेब चेडे । दहिगावने : राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी घेण्यात येते. यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई)  सीटीईटी/टीईटी परीक्षा पास असावे लागते. या सीटीईटी/टीईटी प्रमाणपत्राची मुदत ७ वर्ष आहे. त्यामुळे २०१२, २०१३ मध्ये सीटीईटी/टीईटी पात्र असलेल्यांना यापुढे होणा-या अभियोग्यता चाचणीसाठी पुन्हा टीईटी पास होण्याच्या दिव्यातून जावे लागणार आहे. त्यामुळे डीटीएड धारकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.राज्यातील शिक्षक भरतीप्रक्रिया एक ना अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असते. २०१० साली सीईटीद्वारे शिक्षक भरती सुरू झाली. त्यानंतर मात्र सरकार बदलले तसे शिक्षक भरतीचे नियमही बदलत गेले. संस्था चालकांच्या भूमिकेनेही खलबते झाली. अशातच २०१० नंतर थेट २०१९ मध्ये (९ वर्षांनी) पवित्र प्रणालीच्या माध्यमातून शिक्षकभरतीचे चाक फिरले खरे, मात्र २०२० उजाडले तरीही भरती पूर्ण झालेली नाही. डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या अभियोग्यता चाचणीतून मुलाखतीशिवाय शिक्षकांची सप्टेंबर २०१९ निवड यादी लागली. यातही अनेक विद्यार्थी निकषांची शर्यत पार करू न शकल्याने जागा रिक्त राहिल्या. तर मुलाखतीसह भरण्यात येणाºया जागांचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे दहा वर्षांपासूनची शिक्षक भरतीची प्रतीक्षा कायम असलेल्या विद्यार्थ्यांमधून पवित्र प्रणालीही अपवित्र ठरल्याची टीका होत आहे.सीटीईटी/टीईटी पात्र विद्यार्थ्यांची अभियोग्यता चाचणी झाल्यानंतर भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही. तेच सीटीईटी/टीईटी पात्रताधारक पुढील अभियोग्यता चाचणीसाठी अपात्र झाले आहेत. याबाबत परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांच्याशी फोनवर विचारणा केली असता हे वास्तव असले तरी याबाबत मला अधिक भाष्य करता येणार नसल्याचे सांगत शासनाच्या मान्यतेशिवाय पुढील अभियोग्यता चाचणी होणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.दरवर्षी शिक्षकभरती प्रक्रिया राबवली गेली असती तर सीटीईटी/टीईटी पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असता. २०१० नंतर २०२० मध्ये शिक्षकभरती होत आहे. अशातच सीटीईटी/टीईटी पात्र विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची मुदत संपली म्हणून त्यांना अपात्र ठरवणे हा अन्याय आहे, असे महाराष्ट डीटीएड बीएड स्टुडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEducationशिक्षणTeacherशिक्षक