शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

केंद्र सरकारने साकळाई योजना पूर्ण करावी : खा.सुजय विखे यांची लोकसभेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 16:22 IST

अहमदनगर  : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३२ गावांसाठी वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी नाबार्ड अंतर्गत पाचशे कोटी रुपयांचा निधी देऊन योजना तातडीने पूर्ण करावी. ...

अहमदनगर : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३२ गावांसाठी वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी नाबार्ड अंतर्गत पाचशे कोटी रुपयांचा निधी देऊन योजना तातडीने पूर्ण करावी. केंद्र सरकारने जलशक्ती मंत्रालयामार्फत ही योजना पूर्णत्वास न्यावी, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आज लोकसभेत केली.

विखे म्हणाले, नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील अवर्षणग्रस्त गावांसाठी साकळाई जलसिंचन उपसा योजना महत्त्वपूर्ण आहे. तरीही योजना अद्यापही कार्यान्वित होऊ शकली नाही. गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून शेतकरी योजनेसाठी संघर्ष करीत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद देखील केली होती.

त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले. या योजनेकडे आघाडी सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही. लोक हितासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेली ही योजना निधीअभावी व राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे अडकू नये, त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे  यांनी यापूर्वी नाबार्डच्या अर्थसहाय्यातून वांबोरी चारी उभी केली होती. त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असून देखील पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सोय झाली आहे. याच योजनेच्या धर्तीवर साकळाई जलसिंचन उपसा योजनेला केंद्र सरकारच्या मार्फत नाबाड अंतर्गत जर अर्थसाहाय्य मिळाले तर ३२ गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखे