शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आढळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 17:05 IST

अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी बुुुुधवारी सकाळी दोन्ही कालव्यांतून पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील सूचनेनुसार पाटबंधारे विभागाने आवर्तन सोडले आहे. 

गणोरे : अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी बुुुुधवारी सकाळी दोन्ही कालव्यांतून पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील सूचनेनुसार पाटबंधारे विभागाने आवर्तन सोडले आहे. प्रारंभी उजव्या कालव्यातून ३० व डाव्या कालव्यातून २० क्युसेक दाबाने पाणी सोडले होते. गरजेनुसार पाण्यात वाढ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’शी  बोलताना सांगितले.  मात्र, प्रत्यक्षात शेतक-यांकडून पुरेशा प्रमाणात अधिकृत पाणी मागणीचे अर्ज पाटबंधारे विभागाकडे जमा झालेले नाहीत. आढळा धरणाची पाणी साठवण क्षमता एक हजार ६० दशलक्ष घनफूट आहे. बुधवारी आवर्तन सोडताना ९९५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. चार हजार हेक्टरसाठी पाणी मागणीआढळा धरणाखाली तीन हजार ९१४ हेक्टर सिंचनक्षेत्र आहे. मात्र, शेतक-यांकडून फक्त सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रासाठी पाण्याच्या मागणीची अधिकृतपणे नोंद पाटबंधारे विभागाकडे झाली आहे. गेल्या रब्बी हंगामात धरण अर्धेच भरले असताना शेतक-यांनी एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रासाठी पाण्याची मागणी केली होती. यंदा आढळा धरणाच्या लाभक्षेत्रात पाणीदार परिस्थिती आहे. अद्याप शेतक-यांना पाणी टंचाईची चिंता नसल्याने पाण्याच्या मागणीची घाई दिसून येत नाही. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेDamधरणWaterपाणी