शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

भाजपच्या चुकांचे खापर एकट्या विखेंच्या माथी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 06:32 IST

उमेदवारांबाबतही होते आक्षेप: सत्तेविरोधातील शेतकऱ्यांची नाराजीही नडली

सुधीर लंके 

अहमदनगर : नगर जिल्ह्यात भाजपपेक्षा व भाजपच्या तथाकथित मोदी लाटेपेक्षाही विखे पिता-पुत्र प्रभावी आहेत असे प्रमाणपत्र एकप्रकारे भाजप नेत्यांनी स्वत:च देऊन टाकले आहे. स्वत:च्या चुकांचे खापर भाजप नेत्यांनी एकट्या विखेंवर फोडले आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे नावाचा स्वतंत्र फॅक्टर आहे हे कधीही लपून राहिलेले नाही. विखेंनी स्वत:चे अस्तित्व टिकविणारे राजकारण सातत्याने केले. लोकसभा निवडणुकीत भाजपला विखेंबद्दल काहीच आक्षेप नव्हता. विधानसभा निवडणुकीच्या सांगतेपर्यंतही हा आक्षेप नव्हता. मात्र, निकालानंतर सर्वच पराभूत उमेदवारांनी एकासुरात विखेंबाबत तक्रार केली. मात्र, एकटे विखे यास जबाबदार आहेत का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. नगर जिल्ह्यात विधानसभेच्या बारा जागा आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला यापैकी पाच जागा मिळाल्या होत्या. म्हणजे भाजप हा क्रमांक एकचा पक्ष होता. असे असतानाही भाजप गत पाच वर्षे जिल्ह्यात इतर सत्तास्थाने मिळवू शकला नाही. भाजपचे जे आमदार पराभूत झाले त्यास केवळ विखे जबाबदार नसून स्थानिक संदर्भही आहेत.

राम शिंदे यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क तुटला होता. त्यांचे अनेक कार्यकर्ते खासगीत ही बाब मान्य करतात. रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघात जी तयारी करत होते त्याकडेही शिंदे यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. शिंदे हे ४३ हजाराहून अधिक मतांनी पराभूत झाले आहेत. एवढा फटका एकटे विखे कसा देऊ शकतात? राहुरीमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते हे आमदार कर्डिले यांच्यावर नाराज होते. नेवाशात शंकरराव गडाख यांनी मोठी तयारी केली होती. त्यामुळे भाजपचे बाळासाहेब मुरकुटे पराभूत झाले. कोपरगावात भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांचे पुत्र विजय वहाडणे यांनी बंडखोरी करत चार हजार मते घेतली. त्याचा स्नेहलता कोल्हे यांना फटका बसला. तेथे राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजणे यांनी बंडखोरी केली हे खरे आहे. मात्र, वहाडणे गत पाच वर्षे भाजपवर नाराज असताना भाजप त्यांचेही मन वळवू शकला नाही ही बाब दुर्लक्षित केली जाते.काँग्रेस सोडली खरी....राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर कधीही टीका केली नाही. तेच धोरण राम शिंदे यांनी अवलंबिले. तेही विखेंबाबत कधीच बोलले नाहीत. तेव्हा मैत्री जपत लिव्ह इन रिलेशन सुरु होते. आता मात्र शिंदे यांना विखेंबाबत आक्षेप आहेत. विखे यांनी काँग्रेस सोडली खरी, पण भाजप आपली नाही हेही त्यांना आता जाणवू लागले असेल.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAhmednagarअहमदनगर