शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

भाजपच्या चुकांचे खापर एकट्या विखेंच्या माथी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 06:32 IST

उमेदवारांबाबतही होते आक्षेप: सत्तेविरोधातील शेतकऱ्यांची नाराजीही नडली

सुधीर लंके 

अहमदनगर : नगर जिल्ह्यात भाजपपेक्षा व भाजपच्या तथाकथित मोदी लाटेपेक्षाही विखे पिता-पुत्र प्रभावी आहेत असे प्रमाणपत्र एकप्रकारे भाजप नेत्यांनी स्वत:च देऊन टाकले आहे. स्वत:च्या चुकांचे खापर भाजप नेत्यांनी एकट्या विखेंवर फोडले आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे नावाचा स्वतंत्र फॅक्टर आहे हे कधीही लपून राहिलेले नाही. विखेंनी स्वत:चे अस्तित्व टिकविणारे राजकारण सातत्याने केले. लोकसभा निवडणुकीत भाजपला विखेंबद्दल काहीच आक्षेप नव्हता. विधानसभा निवडणुकीच्या सांगतेपर्यंतही हा आक्षेप नव्हता. मात्र, निकालानंतर सर्वच पराभूत उमेदवारांनी एकासुरात विखेंबाबत तक्रार केली. मात्र, एकटे विखे यास जबाबदार आहेत का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. नगर जिल्ह्यात विधानसभेच्या बारा जागा आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला यापैकी पाच जागा मिळाल्या होत्या. म्हणजे भाजप हा क्रमांक एकचा पक्ष होता. असे असतानाही भाजप गत पाच वर्षे जिल्ह्यात इतर सत्तास्थाने मिळवू शकला नाही. भाजपचे जे आमदार पराभूत झाले त्यास केवळ विखे जबाबदार नसून स्थानिक संदर्भही आहेत.

राम शिंदे यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क तुटला होता. त्यांचे अनेक कार्यकर्ते खासगीत ही बाब मान्य करतात. रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघात जी तयारी करत होते त्याकडेही शिंदे यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. शिंदे हे ४३ हजाराहून अधिक मतांनी पराभूत झाले आहेत. एवढा फटका एकटे विखे कसा देऊ शकतात? राहुरीमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते हे आमदार कर्डिले यांच्यावर नाराज होते. नेवाशात शंकरराव गडाख यांनी मोठी तयारी केली होती. त्यामुळे भाजपचे बाळासाहेब मुरकुटे पराभूत झाले. कोपरगावात भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांचे पुत्र विजय वहाडणे यांनी बंडखोरी करत चार हजार मते घेतली. त्याचा स्नेहलता कोल्हे यांना फटका बसला. तेथे राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजणे यांनी बंडखोरी केली हे खरे आहे. मात्र, वहाडणे गत पाच वर्षे भाजपवर नाराज असताना भाजप त्यांचेही मन वळवू शकला नाही ही बाब दुर्लक्षित केली जाते.काँग्रेस सोडली खरी....राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर कधीही टीका केली नाही. तेच धोरण राम शिंदे यांनी अवलंबिले. तेही विखेंबाबत कधीच बोलले नाहीत. तेव्हा मैत्री जपत लिव्ह इन रिलेशन सुरु होते. आता मात्र शिंदे यांना विखेंबाबत आक्षेप आहेत. विखे यांनी काँग्रेस सोडली खरी, पण भाजप आपली नाही हेही त्यांना आता जाणवू लागले असेल.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAhmednagarअहमदनगर