शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'धार्मिक राजकारण करून, घरं पेटविण्याचं काम करतेय भाजपा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 15:50 IST

राज्यातील शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे भाजपने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये मोठा घोटाळा केल्याचा घणाघात सेनाप्रमुख उध्दव ठाकरेंनी केला.

अहमदनगर - तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मात्र, धार्मिक राजकारण करून घरे पेटवण्याचे काम भाजपा करत आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच आम्ही सरकारचा विरोध करीत नसून फक्त जनतेची बाजू मांडत आहोत. राम मंदिरासाठी सगळे शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत. रामाची शपथ घेऊन राममंदिर उभारू असे, म्हणत उद्धव ठाकरेंनीभाजपावर घणाघाती टीका केली. 

राज्यातील शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे भाजपने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये मोठा घोटाळा केल्याचा घणाघात सेनाप्रमुख उध्दव ठाकरेंनी केला. अहमदनगर येथील रेसिडेन्सिअल हायस्कूलच्या प्रांगणातील जाहीर सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे, असे खोटे आश्वासन सरकार देत आहे. आताचे सरकार मजबूत आहे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडून काहीही होणार नाही. मोहन भागवत यांचेही मी आभार मानतो. जी मागणी आम्ही केली ती भागवतांनी केली. राममंदिरासाठी सगळे शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत, असेही ठाकरे म्हणाले. रामाची शपथ घेऊन राममंदिर उभारू असे, ठाकरे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली. दरम्यान, याप्रसंगी अहमदनगर येतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका कलावती शेळके व काँग्रेसचे नगरसेवक संजय लोंढेंनी शिवसेनेत प्रवेश केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारणRam Mandirराम मंदिर