शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

भाजपात पिचडांना ‘एन्ट्री’ तर जगतापांना ‘नो एन्ट्री’ ?

By नवनाथ कराडे | Updated: July 27, 2019 19:01 IST

गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू झालेली पक्षांतराची लाट कायम आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू झालेली पक्षांतराची लाट कायमपिचड यांना ‘एन्ट्री’ दिलेल्या भाजपातून दोन्ही जगतापांना मात्र ‘नो एन्ट्री’भाजपामध्ये घेण्यास नेतृत्व सकारात्मक दिसत नाही

नवनाथ खराडेअहमदनगर : गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू झालेली पक्षांतराची लाट कायम आहे. या लाटेत अकोले तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड येत्या दोन-तीन दिवसांमध्ये भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अहमदनगर शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि श्रीगोंदा मतदारसंघातील आमदार राहुल जगताप हेही भाजपामध्ये जाण्यास उत्सुक आहेत. मात्र पिचड यांना ‘एन्ट्री’ दिलेल्या भाजपातून दोन्ही जगतापांना मात्र ‘नो एन्ट्री’चा बोर्ड दाखविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीपासून भाजपमध्ये मोठमोठ्या नेत्यांनी प्रवेश करण्यास सुरुवात केली. अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला न सोडल्यामुळे डॉ.सुजय विखे हे मोठ्या दिमाखात भाजपात गेले. त्यांचे वडील यांनीही थोड्याच दिवसात काँग्रेसला बाय-बाय करत राज्याच्या राजकारणात मंत्रीपद मिळविले. या दरम्यान जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनेक सुप्त हालचाली सुरुच होत्या. लोकसभेच्या निवडणुकीत युतीने मिळविलेल्या अभूतपूर्व यशामुळे जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे आमदार भाजप-सेनेमध्ये जाण्यास इच्छुक होते. तशी फिल्डींग लोकसभा निवडणुकीनंतर लगेच त्यांनी लावण्यास सुरुवात केली. अजूनही जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे अनेक आमदार फिल्डींग लावून आहेत.सर्वात प्रथम आमदार राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसला राम राम ठोकला. त्यानंतर अकोले तालुक्याचे आमदार वैभव पिचड यांनीही भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. शहराचे आमदार संग्राम जगताप यांनीही भाजपात जाण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली. श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप हेही भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. मात्र नगर शहर आणि श्रीगोंदा शहरातील परिस्थिती पाहता दोघांनाही भाजपामध्ये घेण्यास नेतृत्व सकारात्मक दिसत नाही. यदाकदाचित पक्षामध्ये यायचे असेल तर ‘उमेदवारी मागू नका’ अशीही अट त्यांच्यासमोर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही जगताप सध्यातरी वेटिंगवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.अहमदनगर शहरात सेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पाचवेळा विजय मिळविला आहे. गेल्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव करत राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आमदार झाले. गेल्या निवडणुकीत भाजप-सेना आणि काँग्रेस - राष्ट्रवादी वेगवेगळे लढले होते. ४९ हजार ३७७ एवढी मते आमदार संग्राम जगताप यांना मिळाली होती. तर सेनेचे अनिल राठोड यांना ४६ हजार ६१ मते मिळाली होती. ३ हजार ३१७ मतांनी जगताप यांनी विजय मिळविला होता. यावेळी भाजपचे अ‍ॅड.अभय आगरकर तिस-या स्थानी राहिले होते. त्यांना ३९ हजार ९१३ मते मिळाली होती. काँग्रसचे सत्यजित तांबे यांना २७ हजार ७६ मते मिळाली होती. या आकडेवारीचा विचार केल्यास युतीची मते नक्कीच जास्त आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ.सुजय विखे यांना तब्बल ५२ हजारांचे मताधिक्य शहरातून मिळाले आहे. युती झाल्यास शहराची जागा शिवसेनेला जाईल. शिवसेनेकडून अनिल राठोड उमेदवार असतील. युती झाली नाही तर भाजपाकडून अ‍ॅड.अभय आगरकर, माजी खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांची नावेही पुढे येतील. त्यामुळे लोकसभेत पराभूत झालेले आमदार संग्राम जगताप यांना भाजपमध्ये घेऊन नेमके काय साध्य होणार ? असा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना ‘नो एन्ट्री’चा बोर्ड दाखविण्यात आल्याचे समजते. असाच प्रश्न श्रीगोेंद्याचे आमदार राहुल जगताप यांच्याबाबतीत निर्माण झाला आहे.श्रीगोंदा मतदारसंघातील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करत विधानसभा लढविली. मात्र त्यांना राष्ट्रवादीचे राहुल जगताप यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळचा सामना दुरंगी होता. तालुक्यातील ज्येष्ठ नेते दिवगंत शिवाजीराव नागवडे यांच्या नेतृत्वाखाली राहुल जगताप रिंगणात उतरले होते. तसेच राहुल जगताप यांचे वडील दिवगंत कुंडलिकराव जगताप आणि शिवाजीराव नागवडे यांनी भाजपचे बबनराव पाचपुते यांच्याविरोधात मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मोट बांधली होती. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, नगर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ अशा सर्वांना एकत्र आणले होते. दिवगंत शिवाजीराव नागवडे यांच्या शब्दाला मानणारा मतदारसंघात मोठा वर्ग आहे. सर्वजण एकत्र आल्याने अवघ्या २५ वर्षाचे राहुल जगताप आमदार झाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा २०१४ मध्ये १० हजार मते वाढूनही पाचपुते यांना पराभव स्वीकारावा लागला होता. राहुल जगताप यांना ९९ हजार २८१, बबनराव पाचपुते ८५ हजार ४४ तर शिवसेनेचे शशिकांत गाडे २२ हजार ५४ मते मिळाली होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आमदार राहुल जगताप यांना पुन्हा मोट बांधणे आता अशक्य आहे. अनुराधा नागवडे याही विधानसभेसाठी उत्सुक आहेत. अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, बाळासाहेब हराळ हे विखे समर्थक आहेत. त्यामुळे ते भाजपासाठीच काम करतील.भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आणखी कोण-कोण नेते युतीत जातात, हे पाहणे औत्सुक्याचे राहील.पिचडांना का स्वीकारले भाजपाने ?आमदार वैभव पिचड यांचे वडील माजी मंत्री मधुकरराव पिचड हे अकोले मतदारसंघातून तब्बल सात वेळा निवडून आले होते. त्यानंतर गतवेळीच्या विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड राष्ट्रवादीतून निवडून आले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही पिचड पिता-पुत्रांनी अकोले तालुक्यातून आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना मताधिक्य मिळवून दिले. ही वस्तुस्थिती पाहता अकोले तालुक्यावर पिचड यांचे एकहाती वर्चस्व आहे. तालुक्यातील आदिवासी समाजही पिचडांच्या मागे आहे. त्यामुळे भविष्यात भाजपाची नक्कीच एक जागा पिचडांच्या रुपाने वाढणार आहे. अकोले तालुक्यात भाजपालाही तगडा उमेदवार नसल्याने, पिचड यांच्या रुपाने अकोलेत कमळ फुलण्याची शक्यता असल्याने भाजपाने पिचड यांना सहज स्वीकारले. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून ६७ हजार ६९६ मते मिळाली होती. सेनेचे मधुकर तळपाडे ४७ हजार ६३४ तर भाजपाचे २७ हजार ४४६ मते मिळाली होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangram Jagtapआ. संग्राम जगतापVaibhav Pichadवैभव पिचडRahul Jagtapआ. राहुल जगतापNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSujay Vikheसुजय विखेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील