शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

‘महावितरण’ अंबानी - अदानीकडे गेल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:38 IST

राहुरी : महावितरण कंपनीचे खासगीकरण करण्याचा केंद्राचा डाव आहे. भविष्यात ही कंपनी अदानी - अंबानी यांच्याकडे गेल्यास शेतकऱ्यांना मोठ्या ...

राहुरी : महावितरण कंपनीचे खासगीकरण करण्याचा केंद्राचा डाव आहे. भविष्यात ही कंपनी अदानी - अंबानी यांच्याकडे गेल्यास शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे शेतकरी हितासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतात, असे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी सबस्टेशनवर गुरुवारी पंडित दीनदयाळ ग्रामज्योती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पहिले लिंक फीडर बसविण्यात आले. तसेच ३२ लाख रुपये अंदाजपत्रक असलेला ब्राह्मणी - केंदळ डांबरीकरण रस्ता, चेडगाव ते जुना कात्रड रस्त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी मंत्री बोलत होते.

ऊर्जा विभागात काम करणं हे खरंतर आव्हानात्मक होतं. तरी शेतकऱ्यांची सेवा करता यावी म्हणून हे ऊर्जा खाते हे मी घाबरत- घाबरत घेतले. राज्यात महावितरण कंपनीची ६० हजार कोटी थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणला तारेवरची कसरत करावी लागते. शेतकऱ्यांसाठी नवीन ऊर्जा धोरण आणले आहे. थकीत शेतकऱ्यांच्या वीजबिल थकबाकीत सवलत देऊन दंड माफ केला. या योजनेमधून शेतकऱ्यांना अधिकाधिक सवलती देऊन ६५ वीजबिलात माफी दिली. आगामी काळात आपल्या मतदार संघात एकही ट्रान्सफार्मर ओहरलोड राहणार नाही, याची खात्री देत अधिकाधिक कामे करून विकासाचा डोंगर उभा करू, असेही तनपुरे म्हणाले. शेतकऱ्यांनी आपले वीजबिल भरून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी बाबासाहेब भिटे, नितीन बाफना, नामदेव म्हसे, केशव बेरड, विकास तरवडे, सरपंच संजय खरात, डाॅ. राजेंद्र बानकर, नंदकुमार तनपुरे, संतोष धसाळ, धीरज पानसंबळ, बन्सी औटी, बाबासाहेब तोडमल, ईश्वर कुसमुडे, सचिन ठुबे, दादासाहेब हापसे, बाळासाहेब देशमुख, शिवाजी राजदेव, राजेंद्र मोरे, उपकार्यकारी अभियंता धीरज गायकवाड, मंगेश गांगुर्डे, नितीन मुरकुटे, रवींद्र आढाव, संभाजी पालवे, प्रकाश देठे, माऊली पवार, अमोल वाघ, विठ्ठल मोकटे उपस्थित होते.