शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राधाकृष्ण विखेंच्या मतदारसंघात बाळासाहेब थोरातांनी केली पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

By शेखर पानसरे | Updated: April 12, 2023 15:30 IST

अवकाळी पाऊस, गारपीटीने फळबागांसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत मिळावी, असे आमदार थोरात म्हणाले.

संगमनेर : अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी (दि. १२) महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील राहता तालुक्यातील केलवड, पिंपरी, गोगलगाव, पिंपळस, दहेगाव येथे जाऊन पाहणी केली, तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

अवकाळी पाऊस, गारपीटीने फळबागांसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत मिळावी, असे आमदार थोरात म्हणाले. अवकाळी पाऊस आणि गारपीटीने संगमनेर तालुक्याच्या पश्चिम भागात शेतीचे मोठे नुकसान झाले. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात या दोन्ही नेत्यांनी मंगळवारी (दि. ११) वेगवेगळे दौरे करत तेथे जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार थोरात यांनी राहाता तालुक्यातील केलवड, पिंपरी, गोगलगाव, पिंपळस, दहेगाव येथे जाऊन पाहणी केली. 

थोरात यांच्यासमवेत सुरेश थोरात, राहता तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, डॉ. एकनाथ गोंदकर, नितीन सदाफळ, विक्रांत दंडवते, अविनाश दंडवते, मच्छिंद्र गुंजाळ, निलेश डांगे, संजय जेजुरकर, सचिन चौगुले, संदिप कोकाटे, बबन नळे, उत्तम मते, गणेश चोळके, जाकीर शेख, शिवप्रसाद आहेर, बाळासाहेब निरगुडे, विनायक निरगुडे, आण्णासाहेब निरगुडे,  विनायक दंडवते, सुधाकर दंडवते, समीर करमासे ,विशाल डांगे, अशोक ठाकरे, आबासाहेब आभाळे, सोमनाथ जेजुरकर, आबासाहेब आभाळे, बाबासाहेब चव्हाण, आण्णासाहेब वाघे, विशाल वाघमारे, सागर वाघमारे, लाला बनसोडे, सतिश डांगे, सुभाष निर्मळ आदी उपस्थित होते.

राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना शेती करताना मोठा खर्च करावा लागतो. अशातच अवकाळी पाऊस, गारपिटीने झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना वेळेवर मोठी मदत झाली. सहजतेने मदत उपलब्ध करून दिली होती. या सरकारनेही घोषणा न करता शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे. त्याकरता भरीव मदत केली पाहिजे. झालेले नुकसान याचबरोबर बँकेचे असलेले कर्ज भरता येईल, एवढी तरी भरीव मदत झाली पाहिजे. असे आमदार थोरात म्हणाले. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातFarmerशेतकरी