शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

राधाकृष्ण विखेंच्या मतदारसंघात बाळासाहेब थोरातांनी केली पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

By शेखर पानसरे | Updated: April 12, 2023 15:30 IST

अवकाळी पाऊस, गारपीटीने फळबागांसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत मिळावी, असे आमदार थोरात म्हणाले.

संगमनेर : अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी (दि. १२) महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील राहता तालुक्यातील केलवड, पिंपरी, गोगलगाव, पिंपळस, दहेगाव येथे जाऊन पाहणी केली, तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

अवकाळी पाऊस, गारपीटीने फळबागांसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत मिळावी, असे आमदार थोरात म्हणाले. अवकाळी पाऊस आणि गारपीटीने संगमनेर तालुक्याच्या पश्चिम भागात शेतीचे मोठे नुकसान झाले. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात या दोन्ही नेत्यांनी मंगळवारी (दि. ११) वेगवेगळे दौरे करत तेथे जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार थोरात यांनी राहाता तालुक्यातील केलवड, पिंपरी, गोगलगाव, पिंपळस, दहेगाव येथे जाऊन पाहणी केली. 

थोरात यांच्यासमवेत सुरेश थोरात, राहता तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, डॉ. एकनाथ गोंदकर, नितीन सदाफळ, विक्रांत दंडवते, अविनाश दंडवते, मच्छिंद्र गुंजाळ, निलेश डांगे, संजय जेजुरकर, सचिन चौगुले, संदिप कोकाटे, बबन नळे, उत्तम मते, गणेश चोळके, जाकीर शेख, शिवप्रसाद आहेर, बाळासाहेब निरगुडे, विनायक निरगुडे, आण्णासाहेब निरगुडे,  विनायक दंडवते, सुधाकर दंडवते, समीर करमासे ,विशाल डांगे, अशोक ठाकरे, आबासाहेब आभाळे, सोमनाथ जेजुरकर, आबासाहेब आभाळे, बाबासाहेब चव्हाण, आण्णासाहेब वाघे, विशाल वाघमारे, सागर वाघमारे, लाला बनसोडे, सतिश डांगे, सुभाष निर्मळ आदी उपस्थित होते.

राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना शेती करताना मोठा खर्च करावा लागतो. अशातच अवकाळी पाऊस, गारपिटीने झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना वेळेवर मोठी मदत झाली. सहजतेने मदत उपलब्ध करून दिली होती. या सरकारनेही घोषणा न करता शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे. त्याकरता भरीव मदत केली पाहिजे. झालेले नुकसान याचबरोबर बँकेचे असलेले कर्ज भरता येईल, एवढी तरी भरीव मदत झाली पाहिजे. असे आमदार थोरात म्हणाले. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातFarmerशेतकरी