शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

राधाकृष्ण विखेंच्या मतदारसंघात बाळासाहेब थोरातांनी केली पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

By शेखर पानसरे | Updated: April 12, 2023 15:30 IST

अवकाळी पाऊस, गारपीटीने फळबागांसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत मिळावी, असे आमदार थोरात म्हणाले.

संगमनेर : अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी (दि. १२) महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील राहता तालुक्यातील केलवड, पिंपरी, गोगलगाव, पिंपळस, दहेगाव येथे जाऊन पाहणी केली, तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

अवकाळी पाऊस, गारपीटीने फळबागांसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत मिळावी, असे आमदार थोरात म्हणाले. अवकाळी पाऊस आणि गारपीटीने संगमनेर तालुक्याच्या पश्चिम भागात शेतीचे मोठे नुकसान झाले. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात या दोन्ही नेत्यांनी मंगळवारी (दि. ११) वेगवेगळे दौरे करत तेथे जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार थोरात यांनी राहाता तालुक्यातील केलवड, पिंपरी, गोगलगाव, पिंपळस, दहेगाव येथे जाऊन पाहणी केली. 

थोरात यांच्यासमवेत सुरेश थोरात, राहता तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, डॉ. एकनाथ गोंदकर, नितीन सदाफळ, विक्रांत दंडवते, अविनाश दंडवते, मच्छिंद्र गुंजाळ, निलेश डांगे, संजय जेजुरकर, सचिन चौगुले, संदिप कोकाटे, बबन नळे, उत्तम मते, गणेश चोळके, जाकीर शेख, शिवप्रसाद आहेर, बाळासाहेब निरगुडे, विनायक निरगुडे, आण्णासाहेब निरगुडे,  विनायक दंडवते, सुधाकर दंडवते, समीर करमासे ,विशाल डांगे, अशोक ठाकरे, आबासाहेब आभाळे, सोमनाथ जेजुरकर, आबासाहेब आभाळे, बाबासाहेब चव्हाण, आण्णासाहेब वाघे, विशाल वाघमारे, सागर वाघमारे, लाला बनसोडे, सतिश डांगे, सुभाष निर्मळ आदी उपस्थित होते.

राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना शेती करताना मोठा खर्च करावा लागतो. अशातच अवकाळी पाऊस, गारपिटीने झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना वेळेवर मोठी मदत झाली. सहजतेने मदत उपलब्ध करून दिली होती. या सरकारनेही घोषणा न करता शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे. त्याकरता भरीव मदत केली पाहिजे. झालेले नुकसान याचबरोबर बँकेचे असलेले कर्ज भरता येईल, एवढी तरी भरीव मदत झाली पाहिजे. असे आमदार थोरात म्हणाले. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातFarmerशेतकरी