शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

दिवसाआड दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST

कोपरगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यात ६ ते ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा ...

कोपरगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यात ६ ते ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने पूर्णवेळ बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांची गैरसोय होऊन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर पर्याय म्हणून सर्वच दुकानांना दिवसआड उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कोपरगावातील सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक राजेश मंटाला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे.

मंटाला म्हणाले, या लॉकडाऊनमध्ये गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. परंतु, लग्नसमारंभासाठी ५० लोकांना परवानगी दिली आहे. याउलट छोट्या व्यावसायिकांच्या दुकानात एका वेळी दोन ते तीन ग्राहक असतात. नियोजन केले तर एका वेळी एकाच ग्राहकाला दुकानात येण्याची परवानगी देता येऊ शकते. तरीही दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. हा निर्णय छोट्या व्यापाऱ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे ज्या दुकानांना उघडण्यास परवानगी आहे. त्यांना एक दिवस व ज्यांना दुकाने उघडण्यास परवानगी नाही. त्यांना दुसऱ्या दिवशी दुकान चालू करण्याची परवानगी द्यावी. यामुळे कोणावरही अत्याचार होणार नाही आणि सर्वांचीच रोजीरोटी सुरू राहील.