शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

दिल्लीतील आंदोलनातील सहभागी सर्व भामटेच

By | Updated: December 7, 2020 04:14 IST

अहमदनगर : दिल्लीत आंदोलन करण्यासाठी जे लोक गोळा झाले आहेत, हे सर्व भामटे लोक आहेत. दिल्लीचे आंदोलन म्हणजे दुसरे ...

अहमदनगर : दिल्लीत आंदोलन करण्यासाठी जे लोक गोळा झाले आहेत, हे सर्व भामटे लोक आहेत. दिल्लीचे आंदोलन म्हणजे दुसरे शाहीनबागच सुरू झाले आहे, अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. एकाने कायदे करायचे आणि दुसऱ्याने विरोध करायचा, अशीच कॉंग्रेस व भाजपाची धोरणे असल्याने दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीकाही पाटील यांनी केली.

शेतकरी संघटनेची जनप्रबोधन यात्रा रविवारी नगरमध्ये आली होती. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागांतील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाबाबत शंका उपस्थित करीत पाटील म्हणाले, दिल्लीचे आंदोलन हे फसवून आणलेल्या शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांपेक्षा तेथे आडते, हमाल असेच लोक अधिक आहेत. त्यामुळे हे आंदोलन शेतकऱ्यांचे आंदोलन मानत नाही. वन्यप्राणी संरक्षण कायदा, गोवंश हत्याबंदी कायदा, जमीन अधिग्रहण कायदा याबाबतीत आंदोलक काही बोलत नाहीत. शेतकऱ्यांना खरा त्रास ज्या कायद्यापासून आहे, त्या कायद्यांचा उच्चारसुद्धा या आंदोलनात झालेला नाही.

आजच्यासारखे कायदे २००६ ला मनमोहन सिंग यांनी केले, तेव्हा भाजपने विरोध केला. आज भाजप कायदे करीत आहे, तर काँग्रेस विरोध करीत आहे. काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हेच दिसून येते. देशात ७० वर्षे काँग्रेसची राजवट होती. त्यांनी शेतमालाची निर्यातबंदी उठविली नाही. वाजपेयी सरकारनेही निर्यातबंदी उठविली नाही की, नरेंद्र मोदी यांनीही निर्यातबंदी उठविली नाही. भाजप व काँग्रेस या दोघांची आर्थिक धोरणे एकच आहेत. हे फक्त मतांच्या राजकारणासाठी सुरू आहे.