शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अळकुटी, कळस, रांधे, दरोडीचा कांदा लंडनला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 12:36 IST

कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन असल्याने शेतक-याची कांदा विक्रीची मोठी अडचण झाली आहे. पारनेर येथील प्रसन्ना कृषी उद्योग समुहाने शेतक-यांचा कांदा विक्रीसाठी पुढाकार घेतला आहे. शेतकºयांचा कांदा जास्त भावाने खरेदी करून समुद्रमार्गे थेट लंडनला पाठविण्याचे काम सुरू केले आहे.

अळकुटी : कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन असल्याने शेतक-याची कांदा विक्रीची मोठी अडचण झाली आहे. पारनेर येथील प्रसन्ना कृषी उद्योग समुहाने शेतक-यांचा कांदा विक्रीसाठी पुढाकार घेतला आहे. शेतक-यांचा कांदा जास्त भावाने खरेदी करून समुद्रमार्गे थेट लंडनला पाठविण्याचे काम सुरू केले आहे.शेतक-यांच्या सोयीसाठी उद्योजक किरण डेरे, विकास गांधी यांनी खासगी कांदा मार्केट सुरू केले. गेल्या पाच वर्षांपासून मार्केटच्या माध्यमातून ते शेतक-यांच्या मालाला योग्य भाव देत आहेत. मार्केटपेक्षा दोन ते तीन रुपये किलोमागे कांद्याला जास्त भाव दिला आहे. थेट शेतावर जाऊन कांदा खरेदी केला जात आहे.  शेतकºयांकडून गोणी, मजुरी, तोलाई, मापाई, हमालीचे पैसे घेतले जात नाहीत. रांधे, दरोडी, कळस, पाडळी आळे, गारखिंडी, अळकुटी परिसरातील गावांमधून कांदा खरेदी करण्यात येतो. कंटेनरमध्ये २५ टन कांदा मजुरांमार्फत भरला जातो. मुंबईत गेल्यानंतर जहाजामधून हा कांदा लंडनकडे रवाना करण्यात येतो. 

बांधावर जाऊन कांदा खरेदी होत आहे. जास्त भाव दिल्याने शेतकरी समाधानी आहेत. कांद्याचा कंटेनर पोहचायला २७ दिवस लागतात. दर आठ दिवसांनी २५ टन कांदा येथून भरण्यात येतो. कांद्याचे अडीच किलोचे पॅकेट तयार करून पाठविले जातात, असे प्रसन्ना कृषी उद्योग समुहाचे संचालक किरण डेरे यांनी सांगितले.  

आम्ही पाच वर्षांपासून प्रसन्ना कृषी उद्योग समूहामधून शेतक-यांच्या कांद्याला योग्य भाव देत आहोत. आताही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कांदा शेताच्या बांधावर जाऊन खरेदी करत आहोत. यामुळे शेतक-यांनाही कांद्याला चांगला भाव मिळत आहे, असे कळस येथील शेतकरी सुभाष गलांडे यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरonionकांदाFarmerशेतकरी