शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

अकोलेत गड, धबधबे, गुहा आजही पर्यटकांचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 17:08 IST

अकोले तालुक्यातील शेकडो दुर्लक्षित धबधबे, गड, गुहा, जंगल, गडवाटांनी किमान दोन हजार वर्षांचा इतिहास जसाच्या तसा ठेवला आहे. गरज आहे हा अमूल्य ठेवा जगासमोर येण्याची, तसेच शासनाच्या पर्यटन विभागाने योग्य प्रसिद्धी देण्याची.

जागतिक पर्यटन दिन विशेष/ मच्छिंद्र देशमुख/  कोतूळ-अकोले तालुक्यातील निसर्ग, गड-किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या नैसर्गिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरांचा राजमार्ग. आजही अकोले तालुक्यातील शेकडो दुर्लक्षित धबधबे, गड, गुहा, जंगल, गडवाटांनी किमान दोन हजार वर्षांचा इतिहास जसाच्या तसा ठेवला आहे. गरज आहे हा अमूल्य ठेवा जगासमोर येण्याची, तसेच शासनाच्या पर्यटन विभागाने योग्य प्रसिद्धी देण्याची.राज्यातील वन्यजीव व वनसंपदेसाठी हरिश्चंद्रगड व कळसूबाई अभयारण्य सर्वश्रुत आहे. कळसूबाई, भंडारदरा, रंधा ही पर्यटनस्थळे राज्यभर प्रसिद्ध झाली, ती भंडारदरा धरण व  इथल्या व्यावसायिकांनी केलेल्या जाहिरातीमुळे. तालुक्यातील मुळा नदीच्या उगमापर्यंत कोतूळ ते हरिश्चंद्रगडापर्यंत शेकडो धबधबे पर्यटकांना हाक देत आहेत. त्यात कोतूळ (पिसेवाडी) येथील कातरण्याचा तीनशे फुटांवरुन कोसळणारा धबधबा, तसेच मुकाईचा धबधबा, कोहणे परिसरातील बाळाईचा धबधबा, तर तळे, विहीर, कोथळे डोंगरावरून कोसळणारे शेकडो धबधबे पर्यटकांची वाट पाहत आहेत. तालुक्यात हरिश्चंद्रगड व कळसूबाईच्या कुशीत दोन हजार वर्षांचा मोठा इतिहास दडला आहे, तो म्हणजे तालुक्यातील अलंग, मलंग व कुलंग गड, तसेच करवली (सांधन दरी ) चेंढ्या, मेंढ्या व उंबरदरा या घाटवाटांमध्ये. सातवाहन काळातील जगातील पहिली मराठी सम्राज्ञी नागनिका हिने हे किल्ले व मार्ग बनवले. ती आंद्र (आंदर मावळ) येथील म्हणजे हल्लीचे जुन्नर येथील सम्राज्ञी होती. नाणे घाट व अकोले तालुक्यातील या मार्गांनी कलीयन (कल्याण), शुरपारक (नालासोपारा) या आंतरराष्ट्रीय बंदरांत मसाल्याचे पदार्थ, कलाकुसरीच्या वस्तुंची ने आण करण्यासाठी चेंड्या घाट (व्यापारी मार्ग) तयार केला. तर मेंढ्या (लष्करी मार्ग) होता. दोन्ही मार्ग नैसर्गिक आपत्तीने बंद झाल्यास उंबरदरा (बायपास) तयार केला. पुढे सातवाहन राजे सातकर्णी व शिवश्री यांनी हे मार्ग विकसित करून अखंड सत्ता ठेवली. आजही हे मार्ग सुस्थितीत आहेत. घाटनदेवीमार्गे मेढं (शहापूर) या ठिकाणी जायला स्थानिक आदिवासी आजही याच मार्गाने पायी जातात, तर ट्रेकर्सचे स्वप्न पूर्ण करणारे अलंग मलंग व कुलंग किल्ले कोकण व पश्चिम महाराष्ट्राचे निरीक्षक ठरले.अकोले तालुक्यातील धारेरावचे अप्रतिम जंगल,  क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची बाडगीची माची, शेणीतचे भुयार (स्थानिक लोक यास हिरण्यकश्यपूची राजधानी म्हणतात) अशी कितीतरी पर्यटनस्थळे प्रसिध्दीअभावी दुर्लक्षित आहेत. अकोले तालुक्यातील इतिहास, निसर्ग व अलंग, मलंग, कुलंग हे किल्ले राज्यातील ट्रेकर्सचे स्वप्न आहे. रस्ते, निवास अशा सुविधा मिळाल्या व या ठिकाणांची माहिती पर्यटन विभागाने चित्रफितीद्वारे प्रसिद्ध केल्यास येथील पर्यटन जगाच्या नकाशावर येईल, असे सातवाहन ट्रेकर्सचे  धनंजय गाडेकर यांनी सांगितले.                       अकोले तालुक्यातील बराच इतिहास व प्रेक्षणीय स्थळे प्रसिध्दीपासून दूर आहेत. लवकरच तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन, माहिती संकलित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे हरिश्चंद्रगडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांनी सांगितले.  

टॅग्स :environmentपर्यावरणAhmednagarअहमदनगर