शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

'...तर आमदार साथ सोडून निघून जातील', अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना सूचक इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 16:57 IST

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून याबाबत भरपाई देण्याची मागणी विधानसभेत करणार असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अहमदनगर

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून याबाबत भरपाई देण्याची मागणी विधानसभेत करणार असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असल्याची टीका शिंदे-फडणवीस सरकारवर अजित पवार यांनी केली. एका अडत व्यापाऱ्यानं कांदा शेतकऱ्याला दोन रुपयाचा चेक दिला म्हणून यांनी त्याचा परवाना निलंबित केला. तू दोन रुपयाचा धनादेश दिला आणि आमची बदनामी झाली म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं, असं अजित पवार म्हणाले. 

राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारावरुनही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच सुनावलं. प्रत्येक आमदाराला आज सांगितलं जात आहे की तुला मंत्री करणार, पण मंत्रिमंडळ विस्तार काही अद्याप केला गेलेला नाही. असं झालं तर आमदार निघून जातील, असा इशारा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना दिला आहे. 

"एका मंत्र्याकडे सहा जिल्ह्यांचं पालकत्व आहे. ४० ते ५० कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले जात आहेत. मुंबईत तर १७ कोटी रुपये जाहिरासाठी खर्च केले गेले. सगळीकडं यांच्याच जाहिराती आणि यांचेच फोटो. एक डबळी एसटी दिसली त्याखालीही या दोघांचेच फोटो. असे फोटो शोभतात तरी का?", असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला. 

कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असताना आता अवकाळी पावसानं कापूर, हरभऱ्याचीही अशीच अवस्था झाली आहे. दिल्लीत कांद्याचे भाव कमी-जास्त झाले होते त्यामुळे दिल्लीचे सरकार गेले होते. जनतेनं मनात आणलं तर हेही सरकार पडू शकतं, असंही अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार