शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

'...तर आमदार साथ सोडून निघून जातील', अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना सूचक इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 16:57 IST

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून याबाबत भरपाई देण्याची मागणी विधानसभेत करणार असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अहमदनगर

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून याबाबत भरपाई देण्याची मागणी विधानसभेत करणार असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असल्याची टीका शिंदे-फडणवीस सरकारवर अजित पवार यांनी केली. एका अडत व्यापाऱ्यानं कांदा शेतकऱ्याला दोन रुपयाचा चेक दिला म्हणून यांनी त्याचा परवाना निलंबित केला. तू दोन रुपयाचा धनादेश दिला आणि आमची बदनामी झाली म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं, असं अजित पवार म्हणाले. 

राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारावरुनही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच सुनावलं. प्रत्येक आमदाराला आज सांगितलं जात आहे की तुला मंत्री करणार, पण मंत्रिमंडळ विस्तार काही अद्याप केला गेलेला नाही. असं झालं तर आमदार निघून जातील, असा इशारा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना दिला आहे. 

"एका मंत्र्याकडे सहा जिल्ह्यांचं पालकत्व आहे. ४० ते ५० कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले जात आहेत. मुंबईत तर १७ कोटी रुपये जाहिरासाठी खर्च केले गेले. सगळीकडं यांच्याच जाहिराती आणि यांचेच फोटो. एक डबळी एसटी दिसली त्याखालीही या दोघांचेच फोटो. असे फोटो शोभतात तरी का?", असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला. 

कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असताना आता अवकाळी पावसानं कापूर, हरभऱ्याचीही अशीच अवस्था झाली आहे. दिल्लीत कांद्याचे भाव कमी-जास्त झाले होते त्यामुळे दिल्लीचे सरकार गेले होते. जनतेनं मनात आणलं तर हेही सरकार पडू शकतं, असंही अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार