शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

‘अहिल्यानगर’साठी विखेंना पुन्हा दिल्लीला पाठवा; प्रचारात आला नामकरणाचा मुद्दा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 08:52 IST

गेल्या ५० वर्षांत राहुल गांधी यांचे लाँचिंग होऊ शकले नाही. ते काय देश पुढे नेणार? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

अहमदनगर : सुजय विखे यांची गाडी पुन्हा दिल्लीला जाऊन मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अहमदनगरचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ होईल. मुख्यमंत्र्यांनी नामकरणास मंजुरी दिली आहे; पण दिल्लीची मंजुरी बाकी आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरच्या नामकरणाचा मुद्दा प्रचारात छेडला. 

भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी शहरात चौपाटी कारंजा येथे प्रचारफेरीच्या सांगता सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी विरोधी उमेदवार नीलेश लंके यांचा उल्लेख लंका असा केला. ते म्हणाले, सुजय विखे पराभूत होणे अशक्य आहे. त्यांचे मताधिक्य वाढवून त्यांना संसदेत पाठवायचे असून, विरोधकांच्या लंकेचे दहन करायचे आहे. गेल्या ५० वर्षांत राहुल गांधी यांचे लाँचिंग होऊ शकले नाही. ते काय देश पुढे नेणार? कुणी स्वप्नात जरी विचार केला तरी राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होऊ शकणार नाहीत.’

लोखंडेंची जबाबदारी विखेंवर : शिंदे शिर्डी मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनीही सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांच्या उपस्थितीत राहाता येथे झालेल्या सभेत शिंदे म्हणाले, मी विखेंना जेव्हा लोखंडे यांच्या उमेदवारीबद्दल बोललो तेव्हा विखे पाटील म्हणाले की, थोडी मेहनत घ्यावी लागेल. मात्र, लोखंडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही तुमची आहे, असे आपण त्यांना सांगितले आहे.

टॅग्स :ahmednagar-pcअहमदनगरBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४