शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

अहमदनगर एज्युकेशन हब करणे शक्य : डॉ. सर्जेराव निमसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 17:37 IST

जी शहरे ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध असतात तेथे पर्यटन विकास व शैक्षणिक वाढीला संधी असते. नगरलाही शैक्षणिक हब होण्याच्या दृष्टिने मोठा वाव आहे. पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे काम खोळंबले असून समाजातील विविध घटकांचे

अहमदनगर : जी शहरे ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध असतात तेथे पर्यटन विकास व शैक्षणिक वाढीला संधी असते. नगरलाही शैक्षणिक हब होण्याच्या दृष्टिने मोठा वाव आहे. पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे काम खोळंबले असून समाजातील विविध घटकांचे शिष्टमंडळ स्थापन करुन याबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे. आपणही याप्रश्नी लक्ष घालण्यास तयार आहोत, असे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ व लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.निमसे यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी विविध प्रश्नांवर मतप्रदर्शन केले. नगर हे राज्याचे मध्यवर्ती केंद्र आहे. हे शहर म्हणजे मराठवाडा, विदर्भ यांचे प्रवेशद्वार आहे. पुण्याप्रमाणेच येथे शैक्षणिक संस्थांच्या वाढीला संधी आहे. नगर जिल्ह्यात ख्रिश्चन मिशनरी, जिल्हा मराठा, रयत शिक्षण संस्था, हिंद सेवा मंडळ यांसह इतरही नामवंत शिक्षण संस्था आहेत. या सर्व संस्था चांगले काम करत आहेत. त्यामुळे विद्यापीठाचे उपकेंद्र झाले तर विद्यार्थ्यांची मोठी सोय नगरला होईल. या उपकेंद्रात विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध झाल्यास थेट विद्यापीठ कॅम्पसमध्ये शिक्षण घेता येईल. २००६ ला या केंद्राची कल्पना आल्यानंतर शंभर एकर जागा मोफत उपलब्ध झालेली आहे. विद्यापीठ अधिकार मंडळांवरील व्यक्तींनी यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. ठरविले तर येत्या जूनपासून काही अभ्यासक्रम सुरु करता येतील. समाजातील मान्यवर व्यक्तींनी यासाठी शिष्टमंडळ स्थापन करायला हवे. विद्यापीठाकडे पैसा आहे. मात्र इच्छाशक्ती कमी पडत आहे.नगर शहरात शासकीय तंत्रनिकेतन व औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. याच कॅम्पसमध्ये सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय निर्माण करुन हा सर्व परिसर ‘तांत्रिक शिक्षण संकुल’ म्हणून पुढे आणणेही शक्य आहे. प्रयत्न केल्यास नगरला वैद्यकिय महाविद्यालयही आणता येऊ शकेल. आपण स्वत: प्राचार्य असताना न्यू आर्टस् महाविद्यालयात ‘कम्युनिकेशन स्टडीज’ हा अभ्यासक्रम सुरु केला. हा अभिनव प्रयोग व धाडसी निर्णय होता. कारण त्यावेळी ग्रामीण भागात या अभ्यासक्रमाची माहितीही नव्हती. मात्र, याच अभ्यासक्रमामुळे नगर शहरातून नागराज मंजुळे, भाऊराव कºहाडे हे दिग्दर्शक घडले. नगर ही आता सिनेमांची निर्मिती करणारी भूमी झाली आहे. पुणे, मुंबईचे लक्ष त्यामुळे नगरच्या या अभ्यासक्रमाकडे वेधले गेले. यातून रोजगार व कलावंत निर्माण झाले. तुमच्या भागातील शैक्षणिक व सामाजिक वातावरण काय आहे? यावर तुमचा विकासाचा अजेंडा ठरतो. शिक्षणाची गरज भागविण्यासाठी खासगी संस्था काही प्रमाणात हव्या आहेत. मात्र, सरकारी शिक्षण संस्थाच पुरेशा हव्यात. कारण सरकारी व खासगी संस्थातील शुल्कात तफावत आहे. अनुदानित तत्त्वावरील शिक्षकांना पुरेसे वेतन व विनाअनुदानीतला मात्र वेतनाची मारामार ही दरीही मिटायला हवी. कारण त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत आहे.शैक्षणिक क्षेत्रात राजकारण आणणे अयोग्यसध्याचे सरकार शिक्षणात मोठ्या सुधारणा करेल असे अपेक्षित होते. २०१४ मध्ये नवीन शैक्षणिक धोरणासाठी सूचना मागविण्यात आल्या. मात्र, पाच वर्षानंतरही धोरण तयार झाले नाही. शिक्षणात उच्चपदस्थ पदे नियुक्त करताना त्या व्यक्तीच्या गुणवत्तेला महत्त्व आहे. मात्र, सध्या राज्य व केंद्राच्या विविध विद्यापीठांत विशिष्ट विचारसरणीचे लोक नियुक्त करण्याचा चुकीचा पायंडा पाडला जात आहे हे शिक्षणाच्या दृष्टीने घातक आहे. केंद्रीय विद्यापीठातील नऊ कुलगुरु पात्र नसल्याने त्यांना घरी जावे लागले ही देशासाठी चिंताजनक बाब आहे याकडे डॉ. निमसे यांनी लक्ष वेधले.रोजगार निर्मितीत सरकारला अपयशदरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण होतील असे सध्याचे सरकार म्हणाले होते. पण, रोजगार निर्मितीचा दर नकारात्मक आहे. रोजगारामुळे आर्थिक विकासाचा दर वाढलेला नसून सेवा क्षेत्रातून जो पैसा उपलब्ध झाला त्याद्वारे वाढला आहे. तरुणांना रोजगार मिळाला नाही, तर समाजात अस्थिरता निर्माण होईल. त्यामुळे रोजगार कसे निर्माण होतील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरसारख्या जिल्ह्यांतील औद्योगिक क्षेत्राला चालना देणे आवश्यक आहे.शेतीतील अस्थिरताही विकासाला मारकबहुतांश शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळाली. मात्र, त्यासाठीची यंत्रणा कार्यक्षम नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. हा दर गत पाच वर्षांपूर्वी पाच व साडेचार टक्के होता. मात्र, सध्या दोन टक्के आहे. त्यामुळे एकतर शेतीची धोरणे चुकत आहेत किंवा अंमलबजावणी चुकत आहे. शेतकरी अस्वस्त रहाणे हे परवडणारे नाही, असेही निमसे म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर