शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर एज्युकेशन हब करणे शक्य : डॉ. सर्जेराव निमसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 17:37 IST

जी शहरे ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध असतात तेथे पर्यटन विकास व शैक्षणिक वाढीला संधी असते. नगरलाही शैक्षणिक हब होण्याच्या दृष्टिने मोठा वाव आहे. पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे काम खोळंबले असून समाजातील विविध घटकांचे

अहमदनगर : जी शहरे ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध असतात तेथे पर्यटन विकास व शैक्षणिक वाढीला संधी असते. नगरलाही शैक्षणिक हब होण्याच्या दृष्टिने मोठा वाव आहे. पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे काम खोळंबले असून समाजातील विविध घटकांचे शिष्टमंडळ स्थापन करुन याबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे. आपणही याप्रश्नी लक्ष घालण्यास तयार आहोत, असे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ व लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.निमसे यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी विविध प्रश्नांवर मतप्रदर्शन केले. नगर हे राज्याचे मध्यवर्ती केंद्र आहे. हे शहर म्हणजे मराठवाडा, विदर्भ यांचे प्रवेशद्वार आहे. पुण्याप्रमाणेच येथे शैक्षणिक संस्थांच्या वाढीला संधी आहे. नगर जिल्ह्यात ख्रिश्चन मिशनरी, जिल्हा मराठा, रयत शिक्षण संस्था, हिंद सेवा मंडळ यांसह इतरही नामवंत शिक्षण संस्था आहेत. या सर्व संस्था चांगले काम करत आहेत. त्यामुळे विद्यापीठाचे उपकेंद्र झाले तर विद्यार्थ्यांची मोठी सोय नगरला होईल. या उपकेंद्रात विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध झाल्यास थेट विद्यापीठ कॅम्पसमध्ये शिक्षण घेता येईल. २००६ ला या केंद्राची कल्पना आल्यानंतर शंभर एकर जागा मोफत उपलब्ध झालेली आहे. विद्यापीठ अधिकार मंडळांवरील व्यक्तींनी यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. ठरविले तर येत्या जूनपासून काही अभ्यासक्रम सुरु करता येतील. समाजातील मान्यवर व्यक्तींनी यासाठी शिष्टमंडळ स्थापन करायला हवे. विद्यापीठाकडे पैसा आहे. मात्र इच्छाशक्ती कमी पडत आहे.नगर शहरात शासकीय तंत्रनिकेतन व औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. याच कॅम्पसमध्ये सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय निर्माण करुन हा सर्व परिसर ‘तांत्रिक शिक्षण संकुल’ म्हणून पुढे आणणेही शक्य आहे. प्रयत्न केल्यास नगरला वैद्यकिय महाविद्यालयही आणता येऊ शकेल. आपण स्वत: प्राचार्य असताना न्यू आर्टस् महाविद्यालयात ‘कम्युनिकेशन स्टडीज’ हा अभ्यासक्रम सुरु केला. हा अभिनव प्रयोग व धाडसी निर्णय होता. कारण त्यावेळी ग्रामीण भागात या अभ्यासक्रमाची माहितीही नव्हती. मात्र, याच अभ्यासक्रमामुळे नगर शहरातून नागराज मंजुळे, भाऊराव कºहाडे हे दिग्दर्शक घडले. नगर ही आता सिनेमांची निर्मिती करणारी भूमी झाली आहे. पुणे, मुंबईचे लक्ष त्यामुळे नगरच्या या अभ्यासक्रमाकडे वेधले गेले. यातून रोजगार व कलावंत निर्माण झाले. तुमच्या भागातील शैक्षणिक व सामाजिक वातावरण काय आहे? यावर तुमचा विकासाचा अजेंडा ठरतो. शिक्षणाची गरज भागविण्यासाठी खासगी संस्था काही प्रमाणात हव्या आहेत. मात्र, सरकारी शिक्षण संस्थाच पुरेशा हव्यात. कारण सरकारी व खासगी संस्थातील शुल्कात तफावत आहे. अनुदानित तत्त्वावरील शिक्षकांना पुरेसे वेतन व विनाअनुदानीतला मात्र वेतनाची मारामार ही दरीही मिटायला हवी. कारण त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत आहे.शैक्षणिक क्षेत्रात राजकारण आणणे अयोग्यसध्याचे सरकार शिक्षणात मोठ्या सुधारणा करेल असे अपेक्षित होते. २०१४ मध्ये नवीन शैक्षणिक धोरणासाठी सूचना मागविण्यात आल्या. मात्र, पाच वर्षानंतरही धोरण तयार झाले नाही. शिक्षणात उच्चपदस्थ पदे नियुक्त करताना त्या व्यक्तीच्या गुणवत्तेला महत्त्व आहे. मात्र, सध्या राज्य व केंद्राच्या विविध विद्यापीठांत विशिष्ट विचारसरणीचे लोक नियुक्त करण्याचा चुकीचा पायंडा पाडला जात आहे हे शिक्षणाच्या दृष्टीने घातक आहे. केंद्रीय विद्यापीठातील नऊ कुलगुरु पात्र नसल्याने त्यांना घरी जावे लागले ही देशासाठी चिंताजनक बाब आहे याकडे डॉ. निमसे यांनी लक्ष वेधले.रोजगार निर्मितीत सरकारला अपयशदरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण होतील असे सध्याचे सरकार म्हणाले होते. पण, रोजगार निर्मितीचा दर नकारात्मक आहे. रोजगारामुळे आर्थिक विकासाचा दर वाढलेला नसून सेवा क्षेत्रातून जो पैसा उपलब्ध झाला त्याद्वारे वाढला आहे. तरुणांना रोजगार मिळाला नाही, तर समाजात अस्थिरता निर्माण होईल. त्यामुळे रोजगार कसे निर्माण होतील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरसारख्या जिल्ह्यांतील औद्योगिक क्षेत्राला चालना देणे आवश्यक आहे.शेतीतील अस्थिरताही विकासाला मारकबहुतांश शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळाली. मात्र, त्यासाठीची यंत्रणा कार्यक्षम नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. हा दर गत पाच वर्षांपूर्वी पाच व साडेचार टक्के होता. मात्र, सध्या दोन टक्के आहे. त्यामुळे एकतर शेतीची धोरणे चुकत आहेत किंवा अंमलबजावणी चुकत आहे. शेतकरी अस्वस्त रहाणे हे परवडणारे नाही, असेही निमसे म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर