शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

अहमदनगर-औरंगाबाद महामार्ग पाण्यासाठी अडविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 14:49 IST

पांढरीपूल येथे रास्तारोको,पाणीप्रश्नावर वाहनांच्या दुतर्फा रांगा

नेवासा : नेवासा तालुक्यातील शेतकरी हक्काच्या पाण्यासाठी आक्रमक झाले असून वांबोरी पाईपलाईन चारीतून बंधारे भरून घेण्याची तरतूद असूनही टाळाटाळ केली जात असल्याने आज शेतकऱ्यांनी हक्काच्या पाण्यासाठी सोमवारी अहमदनगर-औंरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल येथे रास्तारोको आंदोलन केले.

वांबोरी पाईपलाईनच्या चारीतून हक्काचे पाणी मिळावे म्हणून १९ नोहेंबरला वांजोळी गावात ४ गावच्या शेतकऱ्यांनी ३ दिवस उपोषणही केले होते, यावेळी मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी १४ तलाव भरून देण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले होते. तसेच पाणीही सोडले नसल्याने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यावेळी काशिनाथ पागिरे , सुनील वीरकर ,रामनाथ खंडागळे ,भरत गर्जे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

       यावेळी बोलताना बद्रीनाथ खंडागळे म्हणाले की, आम्ही उपोषण केले त्यावेळेस अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधी यांनी आम्हाला आश्वासन दिले होते परंतु आम्हाला पाणी मिळाले नाही. नगर, पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील तलाव भरून दिले आहेत. परंतु नेवासा तालुक्यातील तलाव का भरून दिले जात नाही आमदार बाळासाहेब मुरकुटे हे फक्त खोटे आश्वासन देत असतात अन्य तालुक्यात तलाव भरत असतांना आमदारांना दिसत नाही का ? पाण्यापासून १४ गावांना वंचित ठेवल आहे. याला आमदार, अधिकारी जबाबदार असून यापुढे मोठे आंदोलन केले जाईल. 

  वांजोळी, लोहोगाव, मोरेचिंचोरे, धनगरवाडी या गावांचा जनावरांच्या चारा-पाण्यासह, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून वांबोरी पाईपलाईन चारीतून या तलावात पाणी सोडण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. पाईपलाईन चारीतून राहूरी तालुक्यातील प्रस्तावित सर्व तलाव भरल्याकडे या आंदोलकांनी लक्ष वेधले आहे. त्याच बरोबर नगर आणि पाथर्डी तालुक्यातील तलाव यातून भरण्याचे काम चालू असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. दुष्काळ परिस्थिती असल्याने पशुधन विकून उदरनिर्वाह करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. वांबोरी चारीवरील इतर तालुक्यात तलाव भरले जातात, मग नेवासा तालुक्यातील का नाही ? वांबोरी चारीतून पाणी मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ नियोजनामुळे आमच्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप आंदोलनकर्ते करत आहेत.

नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर यांना निवेदन देण्यात आले. चार दिवसात संबंधित सर्व विभागाची बैठक घेतली जाईल, असे आश्वासन नायब तहसीलदार जायकर यांनी दिले. सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Waterपाणी