शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर-औरंगाबाद महामार्ग पाण्यासाठी अडविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 14:49 IST

पांढरीपूल येथे रास्तारोको,पाणीप्रश्नावर वाहनांच्या दुतर्फा रांगा

नेवासा : नेवासा तालुक्यातील शेतकरी हक्काच्या पाण्यासाठी आक्रमक झाले असून वांबोरी पाईपलाईन चारीतून बंधारे भरून घेण्याची तरतूद असूनही टाळाटाळ केली जात असल्याने आज शेतकऱ्यांनी हक्काच्या पाण्यासाठी सोमवारी अहमदनगर-औंरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल येथे रास्तारोको आंदोलन केले.

वांबोरी पाईपलाईनच्या चारीतून हक्काचे पाणी मिळावे म्हणून १९ नोहेंबरला वांजोळी गावात ४ गावच्या शेतकऱ्यांनी ३ दिवस उपोषणही केले होते, यावेळी मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी १४ तलाव भरून देण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले होते. तसेच पाणीही सोडले नसल्याने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यावेळी काशिनाथ पागिरे , सुनील वीरकर ,रामनाथ खंडागळे ,भरत गर्जे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

       यावेळी बोलताना बद्रीनाथ खंडागळे म्हणाले की, आम्ही उपोषण केले त्यावेळेस अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधी यांनी आम्हाला आश्वासन दिले होते परंतु आम्हाला पाणी मिळाले नाही. नगर, पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील तलाव भरून दिले आहेत. परंतु नेवासा तालुक्यातील तलाव का भरून दिले जात नाही आमदार बाळासाहेब मुरकुटे हे फक्त खोटे आश्वासन देत असतात अन्य तालुक्यात तलाव भरत असतांना आमदारांना दिसत नाही का ? पाण्यापासून १४ गावांना वंचित ठेवल आहे. याला आमदार, अधिकारी जबाबदार असून यापुढे मोठे आंदोलन केले जाईल. 

  वांजोळी, लोहोगाव, मोरेचिंचोरे, धनगरवाडी या गावांचा जनावरांच्या चारा-पाण्यासह, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून वांबोरी पाईपलाईन चारीतून या तलावात पाणी सोडण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. पाईपलाईन चारीतून राहूरी तालुक्यातील प्रस्तावित सर्व तलाव भरल्याकडे या आंदोलकांनी लक्ष वेधले आहे. त्याच बरोबर नगर आणि पाथर्डी तालुक्यातील तलाव यातून भरण्याचे काम चालू असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. दुष्काळ परिस्थिती असल्याने पशुधन विकून उदरनिर्वाह करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. वांबोरी चारीवरील इतर तालुक्यात तलाव भरले जातात, मग नेवासा तालुक्यातील का नाही ? वांबोरी चारीतून पाणी मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ नियोजनामुळे आमच्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप आंदोलनकर्ते करत आहेत.

नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर यांना निवेदन देण्यात आले. चार दिवसात संबंधित सर्व विभागाची बैठक घेतली जाईल, असे आश्वासन नायब तहसीलदार जायकर यांनी दिले. सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Waterपाणी