शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

अहमदनगर - नाशिकमधील कारखान्यांनी थकवले शेतक-यांचे १६५ कोटी

By मिलिंदकुमार साळवे | Updated: April 28, 2018 10:24 IST

यंदाच्या ऊस गळीत हंगामात साखरेच्या भावात सतत घसरगुंडी होत असल्याने साखर कारखाने आर्थिक अडचणीत असतानाही उसाचे पैसे अदा करण्यात कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. अशाही परिस्थितीत १५ एप्रिलअखेर अहमदनगर विभागातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ऊस बिलापोटी १६५ कोटी २७ लाख रूपये थकले आहेत.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : यंदाच्या ऊस गळीत हंगामात साखरेच्या भावात सतत घसरगुंडी होत असल्याने साखर कारखाने आर्थिक अडचणीत असतानाही उसाचे पैसे अदा करण्यात कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. अशाही परिस्थितीत १५ एप्रिलअखेर अहमदनगर विभागातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ऊस बिलापोटी १६५ कोटी २७ लाख रूपये थकले आहेत.साखर आयुक्तालयाच्या अहमदनगर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत अहमदनगरसोबतच नाशिक जिल्ह्याचाही समावेश आहे. १५ एप्रिलअखेर अहमदनगर जिल्ह्यातील ज्ञानेश्वर (नेवासा), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे (प्रवरानगर),गणेश (राहाता), कर्मवीर शंकरराव काळे (कोपरगाव),मुळा (नेवासा),सहकारमहर्षी थोरात (संगमनेर),संजीवनी (कोपरगाव), सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) या सहकारी साखर कारखान्यांनी एफ. आर. पी. नुसार ऊस तोडणी वाहतुकीचा खर्च वजा जाता शेतकºयांच्या ऊस खरेदीचे १०० टक्के पैसे अदा केले आहेत. याशिवाय अंबालिका, गंगामाई, श्री क्रांती शुगर या खासगी कारखान्यांनी देखील ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा जाता रकमा शेतकºयांच्या खात्यात वर्ग केल्या आहेत.अगस्ती कारखान्याने ९०.१० टक्के, अशोक कारखान्याने ९१.०१ टक्के, वृद्धेश्वर कारखान्याने ९०.७५, कुकडी कारखान्याने ७८.७२, केदारेश्वर कारखान्याने ५३.९७, राहुरीच्या तनपुरे कारखान्याने ४५.४३, पियुष या खासगी कारखान्याने ६६.५१ टक्के, प्रसाद शुगरने ८२.१४, जय श्रीराम खासगी कारखान्याने ९५.६९,देवठाणच्या साईकृपा खासगी कारखान्याने ९८.३० तर पहिलाच गळीत हंगाम पार पाडलेल्या संगमनेरच्या युटेक शुगरने ५२.७५ टक्के पेमेंट शेतकºयांना अदा केले आहे.नाशिक जिल्ह्यातील कादवा, द्वारकाधीश व के. जी. एस. या तीन कारखान्यांनी १०० टक्के पैसे अदा केले आहेत. दोन्ही जिल्ह्यातील २७ कारखान्यांनी यंदाच्या हंगामात ऊस गाळप केले. दोन जिल्ह्यातील शंभर टक्के पैसे अदा न करणाºया कारखान्यांनी १५ एप्रिलपर्यंत १६५ कोटी २७ लाख रूपये ऊस बिलाची रक्कम थकविली आहे. ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा जाता २७ कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाच्या बिलाची रक्कम २ हजार ६४२ कोटी ७६ लाख रूपये झाली आहे.हंगामाच्या सुरूवातीस साडेतीन हजार रूपये प्रति टन भावाची मागणी शेतकरी संघटनांकडून झाली. नंतर साखरेच्या दरातील घसरणीमुळे कारखान्यांनी ऊस दर देण्यात हात आखडता घेतला. सर्वाधिक २३०० रूपये भाव देणारा मुळा कारखाना जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. नाशिकमध्ये द्वारकाधीश,केजीएसनेही २३०० रूपये भाव दिला आहे.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखानेNashikनाशिक