शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

अहमदनगर - नाशिकमधील कारखान्यांनी थकवले शेतक-यांचे १६५ कोटी

By मिलिंदकुमार साळवे | Updated: April 28, 2018 10:24 IST

यंदाच्या ऊस गळीत हंगामात साखरेच्या भावात सतत घसरगुंडी होत असल्याने साखर कारखाने आर्थिक अडचणीत असतानाही उसाचे पैसे अदा करण्यात कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. अशाही परिस्थितीत १५ एप्रिलअखेर अहमदनगर विभागातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ऊस बिलापोटी १६५ कोटी २७ लाख रूपये थकले आहेत.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : यंदाच्या ऊस गळीत हंगामात साखरेच्या भावात सतत घसरगुंडी होत असल्याने साखर कारखाने आर्थिक अडचणीत असतानाही उसाचे पैसे अदा करण्यात कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. अशाही परिस्थितीत १५ एप्रिलअखेर अहमदनगर विभागातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ऊस बिलापोटी १६५ कोटी २७ लाख रूपये थकले आहेत.साखर आयुक्तालयाच्या अहमदनगर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत अहमदनगरसोबतच नाशिक जिल्ह्याचाही समावेश आहे. १५ एप्रिलअखेर अहमदनगर जिल्ह्यातील ज्ञानेश्वर (नेवासा), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे (प्रवरानगर),गणेश (राहाता), कर्मवीर शंकरराव काळे (कोपरगाव),मुळा (नेवासा),सहकारमहर्षी थोरात (संगमनेर),संजीवनी (कोपरगाव), सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) या सहकारी साखर कारखान्यांनी एफ. आर. पी. नुसार ऊस तोडणी वाहतुकीचा खर्च वजा जाता शेतकºयांच्या ऊस खरेदीचे १०० टक्के पैसे अदा केले आहेत. याशिवाय अंबालिका, गंगामाई, श्री क्रांती शुगर या खासगी कारखान्यांनी देखील ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा जाता रकमा शेतकºयांच्या खात्यात वर्ग केल्या आहेत.अगस्ती कारखान्याने ९०.१० टक्के, अशोक कारखान्याने ९१.०१ टक्के, वृद्धेश्वर कारखान्याने ९०.७५, कुकडी कारखान्याने ७८.७२, केदारेश्वर कारखान्याने ५३.९७, राहुरीच्या तनपुरे कारखान्याने ४५.४३, पियुष या खासगी कारखान्याने ६६.५१ टक्के, प्रसाद शुगरने ८२.१४, जय श्रीराम खासगी कारखान्याने ९५.६९,देवठाणच्या साईकृपा खासगी कारखान्याने ९८.३० तर पहिलाच गळीत हंगाम पार पाडलेल्या संगमनेरच्या युटेक शुगरने ५२.७५ टक्के पेमेंट शेतकºयांना अदा केले आहे.नाशिक जिल्ह्यातील कादवा, द्वारकाधीश व के. जी. एस. या तीन कारखान्यांनी १०० टक्के पैसे अदा केले आहेत. दोन्ही जिल्ह्यातील २७ कारखान्यांनी यंदाच्या हंगामात ऊस गाळप केले. दोन जिल्ह्यातील शंभर टक्के पैसे अदा न करणाºया कारखान्यांनी १५ एप्रिलपर्यंत १६५ कोटी २७ लाख रूपये ऊस बिलाची रक्कम थकविली आहे. ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा जाता २७ कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाच्या बिलाची रक्कम २ हजार ६४२ कोटी ७६ लाख रूपये झाली आहे.हंगामाच्या सुरूवातीस साडेतीन हजार रूपये प्रति टन भावाची मागणी शेतकरी संघटनांकडून झाली. नंतर साखरेच्या दरातील घसरणीमुळे कारखान्यांनी ऊस दर देण्यात हात आखडता घेतला. सर्वाधिक २३०० रूपये भाव देणारा मुळा कारखाना जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. नाशिकमध्ये द्वारकाधीश,केजीएसनेही २३०० रूपये भाव दिला आहे.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखानेNashikनाशिक