शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

अहमदनगर - नाशिकमधील कारखान्यांनी थकवले शेतक-यांचे १६५ कोटी

By मिलिंदकुमार साळवे | Updated: April 28, 2018 10:24 IST

यंदाच्या ऊस गळीत हंगामात साखरेच्या भावात सतत घसरगुंडी होत असल्याने साखर कारखाने आर्थिक अडचणीत असतानाही उसाचे पैसे अदा करण्यात कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. अशाही परिस्थितीत १५ एप्रिलअखेर अहमदनगर विभागातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ऊस बिलापोटी १६५ कोटी २७ लाख रूपये थकले आहेत.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : यंदाच्या ऊस गळीत हंगामात साखरेच्या भावात सतत घसरगुंडी होत असल्याने साखर कारखाने आर्थिक अडचणीत असतानाही उसाचे पैसे अदा करण्यात कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. अशाही परिस्थितीत १५ एप्रिलअखेर अहमदनगर विभागातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ऊस बिलापोटी १६५ कोटी २७ लाख रूपये थकले आहेत.साखर आयुक्तालयाच्या अहमदनगर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत अहमदनगरसोबतच नाशिक जिल्ह्याचाही समावेश आहे. १५ एप्रिलअखेर अहमदनगर जिल्ह्यातील ज्ञानेश्वर (नेवासा), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे (प्रवरानगर),गणेश (राहाता), कर्मवीर शंकरराव काळे (कोपरगाव),मुळा (नेवासा),सहकारमहर्षी थोरात (संगमनेर),संजीवनी (कोपरगाव), सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) या सहकारी साखर कारखान्यांनी एफ. आर. पी. नुसार ऊस तोडणी वाहतुकीचा खर्च वजा जाता शेतकºयांच्या ऊस खरेदीचे १०० टक्के पैसे अदा केले आहेत. याशिवाय अंबालिका, गंगामाई, श्री क्रांती शुगर या खासगी कारखान्यांनी देखील ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा जाता रकमा शेतकºयांच्या खात्यात वर्ग केल्या आहेत.अगस्ती कारखान्याने ९०.१० टक्के, अशोक कारखान्याने ९१.०१ टक्के, वृद्धेश्वर कारखान्याने ९०.७५, कुकडी कारखान्याने ७८.७२, केदारेश्वर कारखान्याने ५३.९७, राहुरीच्या तनपुरे कारखान्याने ४५.४३, पियुष या खासगी कारखान्याने ६६.५१ टक्के, प्रसाद शुगरने ८२.१४, जय श्रीराम खासगी कारखान्याने ९५.६९,देवठाणच्या साईकृपा खासगी कारखान्याने ९८.३० तर पहिलाच गळीत हंगाम पार पाडलेल्या संगमनेरच्या युटेक शुगरने ५२.७५ टक्के पेमेंट शेतकºयांना अदा केले आहे.नाशिक जिल्ह्यातील कादवा, द्वारकाधीश व के. जी. एस. या तीन कारखान्यांनी १०० टक्के पैसे अदा केले आहेत. दोन्ही जिल्ह्यातील २७ कारखान्यांनी यंदाच्या हंगामात ऊस गाळप केले. दोन जिल्ह्यातील शंभर टक्के पैसे अदा न करणाºया कारखान्यांनी १५ एप्रिलपर्यंत १६५ कोटी २७ लाख रूपये ऊस बिलाची रक्कम थकविली आहे. ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा जाता २७ कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाच्या बिलाची रक्कम २ हजार ६४२ कोटी ७६ लाख रूपये झाली आहे.हंगामाच्या सुरूवातीस साडेतीन हजार रूपये प्रति टन भावाची मागणी शेतकरी संघटनांकडून झाली. नंतर साखरेच्या दरातील घसरणीमुळे कारखान्यांनी ऊस दर देण्यात हात आखडता घेतला. सर्वाधिक २३०० रूपये भाव देणारा मुळा कारखाना जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. नाशिकमध्ये द्वारकाधीश,केजीएसनेही २३०० रूपये भाव दिला आहे.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखानेNashikनाशिक