शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकनंतर भाजीपाल्याचे दर २५ टक्क्यांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो, बटाटे, दुधी भोपळा, फ्लाॅवर, कोबी, कोथिंबीर, भुईमुगाची शेंगाची चांगली आवक झाली आहे. ...

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो, बटाटे, दुधी भोपळा, फ्लाॅवर, कोबी, कोथिंबीर, भुईमुगाची शेंगाची चांगली आवक झाली आहे. त्या तुलनेत गवार, वांगी, घोसाळे, कारले, भेंडी, वाल, मेथी, पालक या भाज्यांची आवक कमी होती. त्यामुळे या भाज्यांचे दर वाढले आहेत. दर वाढले तरी शेतकऱ्यांच्याऐवजी विक्रेत्यांनाच जास्त फायदा झाल्याचे दिसून येत आहे.

---------------

भाजीपाल्याचे ठोक दर (प्रतिकिलो )

भाजी १४ जून २० जून

टोमॅटो १० १०

बटाटे ११ १५

भेंडी २० ३५

मिरची २५ ३०

कारले ३० ३५

फ्लावर ८ ४०

वांगे ५ ४०

पालक ५ १०

-------------

पुन्हा वरणावर जोर

---------

आधी लॉकडाऊन होता म्हणून भाज्या मिळत नव्हत्या. त्यामुळे त्यावेळी जास्त वरणावरच जोर द्यावा लागला. आता अनलॉक आहे. मात्र, भाज्यांचे दर वाढले आहेत. एकीकडे पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढलेले असताना आता भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य कुटुंबाचे जीणे कठीण झाले आहे.

-शैला धावडे, माळीवाडा.

------------

चांगला पाऊस झाला आहे. सगळीकडे हिरवेगार वातावरण आहे. त्यामुळे भाजीपाल्याचीही आवक होईल आणि भाजीपाला स्वस्त होईल, असे वाटत होते. मात्र, सध्या भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. सामान्य लोक आधीच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्रस्त आहेत. त्यात आता भाजीपालाही महागला आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे.

- मनीषा जोशी, भिस्तबाग नाका, सावेडी.

---------------

म्हणून वाढले दर..

सध्या भाज्यांची आवक कमी झाली आहे. आवक कमी झाली की दर वाढतात. त्यात सध्या उन्हाची तीव्रता जास्त आहे. पाऊस नाही. त्यामुळे नव्या भाज्यांची आवक कमी आहे. उन्हाळी भाजीपाला आला संपला आहे. मेथी, दोडके, घोसाळे अशा भाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत.

-नरेंद्र देशमुख, भाजीपाला विक्रेते.

-----------

पावसाळी वातावरण सुरू झाले आहे. मालही कमी येत आहे. फुलगळती, फळगळती आणि काही फळभाज्यांना कीडही लागते. त्यामुळे मालाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. एकीकडे कमी आवक आणि दुसरीकडे अनलॉक झाल्यानंतर भाजीपाल्याला मागणी मात्र वाढली आहे.

-अंकुश सर्जेराव काळे, व्यापारी.

----------------

शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा

----

टोमॅटोचे उत्पादन यंदा शेतकऱ्यांनी चांगले घेतले आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर वाढलेले आहेत. प्रत्यक्षात मात्र ठोक बाजारात शेतकऱ्यांना कवडीमोल किंमत दिली जाते. त्यामुळे नक्की काय सुरू आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्येच संभ्रम आहे.

-संकेल लाळगे, कृषिमित्र.

------------------

आता डाळिंबाचे चांगले उत्पादन झाले आहे. शेतकऱ्यांकडून ४० ते ५० रुपये किलोने घेतले जातात. मात्र, किरकोळ बाजारात दोनशे रुपये किलोने विकली जात आहेत. शेतकऱ्यांना कोणताही आर्थिक लाभ होत नाही. शेतकऱ्यांनी फक्त कष्ट घ्यायचे. त्यात उत्पादकांचे मरण आहे.

श्रीधर बेल्हेकर, शेतकरी.

---------

डमी -८३१- नेट फोटो