शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

शेवगाव तालुक्यातील शेतक-यांवरील गोळीबारासंदर्भात चौकशी अहवालानंतर कारवाई : राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 19:08 IST

शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारप्रकरणाची उपविभागीय दंडाधिका-यांमार्फत चौकशी सुरू असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाईबात निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारप्रकरणाची उपविभागीय दंडाधिका-यांमार्फत चौकशी सुरू असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाईबात निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.गोळीबारात जखमी झालेल्या दोघा शेतक-यांची शिंदे यांनी सोमवारी येथील खासगी रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. गेली चार ते पाच दिवस नियोजित दौरे असल्याने शेतक-यांची भेट घेता आली नाही, मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जखमींची भेट घेतली होती, असे सांगत पालकमंत्री म्हणाले, जखमी झालेले शेतकरी हे औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याने तेथील जिल्हाधिका-यांमार्फत त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून धनादेश देण्यात येणार आहे. खानापूर येथील आंदोलन ही मोठी घटना होती़ जाहीर केलेल्या एफआरपीप्रमाणे शेतक-यांना उसाला दर मिळणार आहे.खासगी साखर कारखाने आणि शेतक-यांमध्ये समन्वय राखने ही सरकारचीच जबाबदारी आहे. याच दृष्टिकोणातून २३ नोव्हेंबर रोजी नगर व नाशिक विभागांतील साखर कारखाने व शेतक-यांची समन्वय बैठक ठेवण्यात आलेली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थित ही बैठक होणार आहे. यामध्ये ऊसउत्पादकांचे प्रश्न समजून घेण्यात येणार आहेत.पालकमंत्र्यांनी भेट घेतली तेव्हा जखमी शेतकरी उद्धव मापारी यांनी आंदोलनादरम्यान शेतक-यांवर दाखल झाले गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. यावेळी पालकमंत्र्यांनीही त्यांना सकारात्मक उत्तर देत काळजी घेण्याचे सांगितले. यावेळी प्रादेशिक सहसंचालक (साखर) संगीता डोंगरे, प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदेShevgaonशेवगाव