शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सर्वोच्च राष्ट्रपती मानकाने ‘एसीसी अ‍ॅण्ड एस’चा गौरव

By admin | Updated: April 15, 2017 13:28 IST

देशाचे राष्ट्रपती व तिन्ही सेनादलाचे प्रमुख प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते येथील एसीसी अ‍ॅण्ड एस या लष्करी प्रशिक्षण संस्थेला सर्वोच्च राष्ट्रपती मानकाने गौरवण्यात आले.

अहमदनगर : देशाचे राष्ट्रपती व तिन्ही सेनादलाचे प्रमुख प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते येथील एसीसी अ‍ॅण्ड एस या लष्करी प्रशिक्षण संस्थेला सर्वोच्च राष्ट्रपती मानकाने गौरवण्यात आले. शनिवारी झालेल्या एका शानदार सोहळ्यात लष्कराचे उत्कृष्ट संचलन, रणगाड्यांचा ताफा अन् हेलिकॉप्टर, सुखोई हवाई विमानाच्या चित्तथरारक कसरतीने उपस्थित भारावले. येथील आर्मर्ड कार्प सेंटर अ‍ॅण्ड स्कूल या देशातील उत्कृष्ट लष्करी प्रशिक्षण संस्थेला शनिवारी सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती मानक देऊन गौरविण्यात आले. एसीसी अ‍ॅण्ड एसचे कमांडिंग आॅफिसर मेजर जनरल प्रवीण दिक्षित यांनी हा मानाचा ध्वज स्वीकारला. प्रथम सैनिकांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, लेफ्टनंट जनरल पी. एम. हैरिज, लेफ्ट. जनरल डी. आर. सोनी आदी प्रमुख पाहुण्यांना सलामी दिली. राष्ट्रपतींचे मानक मिळणे हे कोणत्याही सैनिक तुकडीचा सर्वोच्च सन्मान व दुर्मिळ क्षण असतो. सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम हे निशान करते. अहमदनगरमध्ये १९४८मध्ये एसीसी अ‍ॅण्ड एसची स्थापना झाली. तेव्हापासून आतापर्यंतच्या ६९ वर्षांच्या कामगिरीच्या आधारे त्यांना हा सर्वोच्च बहुमान पहिल्यांदाच मिळाला आहे. तत्पूर्वी जवानांनी शिस्तबद्ध संचलन केले. या संचलनात घोडेस्वार, लढाऊ रणगाडे, तसेच जवानांनी विविध कसरती दाखवत सैन्य सज्जतेची झलक दाखवली. याच दरम्यान, लढाऊ सुखोई विमान, तसेच हेलिकॉप्टरने आकाशातून ध्वजवहन करून आपले सामर्थ्य प्रदर्शित केले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘फर्स्ट डे कव्हर’चे प्रकाशन झाले. एसीसी अ‍ॅण्ड एसच्या उत्कृष्ट कामगिरीचे त्यांनी आपल्या भाषणात कौतूक केले.