शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

शहरात हॉटेल्सना ३०० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:22 IST

अहमदनगर : कोरोनामुळे नगर शहरातील हॉटेल व्यवसायाला लॉक करण्याची वेळ आली आहे. सततच्या लाॅकडाऊन व निर्बंधांमुळे मागील १६ महिन्यांत ...

अहमदनगर : कोरोनामुळे नगर शहरातील हॉटेल व्यवसायाला लॉक करण्याची वेळ आली आहे. सततच्या लाॅकडाऊन व निर्बंधांमुळे मागील १६ महिन्यांत हॉटेल व्यवसायाला सुमारे ३०० कोटींहून अधिकचा फटका बसल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांकडून देण्यात आली. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे हॉटेल व्यवसायाचा आर्थिक कणा मोडला असून, हॉटेल व्यवसायावर आर्थिक संकट कोसळले आहे.

औरंगाबाद, पुणे, सोलापूर, कल्याण, मनमाड असे महामार्ग नगर शहरातून जातात. या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी जेवणासाठी नगर शहर व परिसरातील हॉटेल्समध्ये थांबतात. त्यामुळे येथील हॉटेल्समध्ये रेलचेल असते. मात्र कोरोनाचा संसर्ग व त्यानंतर लागलेला लॉकडाऊन यामुळे हॉटेल्स व्यवसाय मोडून पडला आहे. हाॅटेल व्यवसाय केवळ निवास आणि भोजनाची सुविधा एवढ्यापुरताच मर्यादित नसून, अन्य ५० हून अधिक व्यवसायांशी जोडलेला आहे. दूध, भाजीपाला, बेकरी उत्पादनांवरही याचा परिणाम झाला आहे. शहरात मोठी दहा हॉटेल्स आहेत. त्यांची प्रत्येकाची वार्षिक उलाढाल सरासरी १५ कोटींच्या घरात आहे. रेस्टॉरंट, बार, शाकाहारी, मांसाहारी जेवणाची लहान-मोठी पाचशेहून अधिक हॉटेल्स आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल एक हजार कोटींहून अधिक आहे. हाॅटेल्स व्यवसायातील उलाढाल मोठी असली तरी गुंतवणूकही मोठी आहे.

सध्या दुपारी चारपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास मुभा आहे. तसेच पार्सल सुविधा पुरविण्यासही परवानगी आहे. परंतु, दिवसभर व्यवसाय होत नाही. ग्राहक रात्रीच्या वेळी जेवणासाठी येतात. पण, रात्री हॉटेल बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. हॉटेलचा परिसर मोठा आहे. रात्रीच्या वेळी नियमांचे पालन करून हॉटेल सुरू ठेवणे व्यावसायिकांना शक्य आहे. वेळोवेळी मागणी करून रात्री हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे कामगारांचा पगार, वीज बिल, साफसफाई हा सर्व खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न सध्या हॉटेल व्यावसायिकांना भेडसावत आहे.

....

पूर्ण क्षमतेने परवानगी द्या

सध्या अनलॉक काळात दुपारी ४ वाजेनंतर हॉटेलमध्ये बसणे बंद होते व पार्सल सुविधा सुरू होते. येथील हॉटेलचा ६० टक्के व्यवसाय हा सायंकाळनंतरच होतो. हा ६० टक्के व्यवसाय बुडाल्याने हॉटेल उद्योग कोलमडला आहे. जिल्हा प्रशासनाने रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल पूर्ण क्षमतेने चालविण्यास परवानगी दिली तरच हा व्यवसाय तग धरू शकेल, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

...

तीन हजार कर्मचारी बसले घरी

सध्या हॉटेल्स निम्म्याच क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे कामगार संख्येवरही गदा आली आहे. आजघडीला तीन हजारांहून अधिक कामगार घरी बसून आहेत. व्यावसायिक उत्पन्न बंद आहे. पण, देखभाल-दुरुस्तीचा खर्च, व्यवसाय कर, वीज बिल, मालमत्ता कर, कर्मचाऱ्यांचे पगार सुरूच आहेत.

....

जिल्हा प्रशासनाने दुपारी ४ वाजेपर्यंत हॉटेल्सना परवानगी दिलेली आहे. परंतु, ६० टक्के व्यवसाय रात्रीच होतो. दिवसभर परवानगी मिळते; मग रात्रीच्या वेळी कोरोना येतो का? रात्री हॉटेल्स सुरू ठेवल्याने संसर्ग वाढणार आहे का? प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेले आहेत. बँकांचे हप्ते सुरू आहेत. तसेच कामगारांचे पगार, वीज बिल यासह अन्य खर्च आहे. तो भागवायचा कसा, असा प्रश्न आहे.

- सुनील काळे, हॉटेल व्यावसायिक

.....

मागण्या

१) पूर्ण क्षमतेने हॉटेल उद्योग सुरू करण्यास परवानगी देणे

२) रात्री १० वाजेपर्यंत हॉटेलमध्ये जेवणास परवानगी द्यावी

३) बँकेतून जे कर्ज काढले आहे, त्या कर्जाऊ रकमेच्या हप्त्याची परतफेड करण्यास वर्षभरासाठी स्थगिती मिळावी

४) जीएसटीमधून सवलत मिळावी

.....

सूचना : फोटो ३० हॉटेल नावाने आहे.