१९० टँकरने पाणी पुरवठा
By Admin | Updated: May 27, 2014 00:29 IST2014-05-27T00:09:40+5:302014-05-27T00:29:38+5:30
अहमदनगर : उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात सरकारी पाण्याच्या टँकरची संख्या १९० वर पोहचली आहे.
१९० टँकरने पाणी पुरवठा
अहमदनगर : उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात सरकारी पाण्याच्या टँकरची संख्या १९० वर पोहचली आहे. या टँकरच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार जनतेची तहान भागविली जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक टंचाईच्या झळा नगर, पाथर्डी आणि संगमनेर तालुक्यात बसतांना दिसत आहे. या ठिकाणी ४० ते ६६ हजार जनतेला टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पावसाला अद्याप सुमारे १३ ते १४ दिवसांचा कालावधी असल्याने टँकरचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासन पाणी टंचाईवर लक्ष ठेवून असून ज्या ज्या ठिकाणी मागणी होत आहे, त्या ठिकाणी तातडीने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)तालुकनिहाय टँकरने पाणी पिणारी जनता: संगमनेर ४८ हजार २८८, अकोले ३ हजार ६२१, कोपरगाव १५ हजार ३१५, नेवासा ७ हजार ३७८, राहाता ७ हजार ७५६, नगर ६६ हजार ९९, पारनेर २८ हजार ८६१, पाथर्डी ६३ हजार ४०९, शेवगाव २३ हजार ५७२, कर्जत ३८ हजार ३४३, जामखेड ३० हजार ९१७, श्रीगोंदा २ हजार ६३८ असा आहे. श्रीरामपुर, राहुरी तालुका पाणी टंचाईपासून वाचलेला आहे. या ठिकाणी उन्हाळ्यात एकही टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली नाही. जिल्ह्यात १४४ गावे आणि ५८९ वाड्यांमध्ये टंचाईची परिस्थिती असून त्या ठिकाणी १९० टँकर सुरू आहेत.