१५ लाखांच्या खत विक्रीला बंदी
By Admin | Updated: May 26, 2014 00:25 IST2014-05-26T00:04:54+5:302014-05-26T00:25:03+5:30
अहमदनगर : कृषी विभागाकडून बियाणे आणि खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
१५ लाखांच्या खत विक्रीला बंदी
अहमदनगर : कृषी विभागाकडून बियाणे आणि खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. असे असताना गतवर्षी कायद्यातील तरतुदींची अपूर्णता असणार्या १५ लाख ७७ हजार १४२ रुपये किमतीच्या खते विक्रीला बंदी घालण्यात आली होती. या खताचे वजन ३२२ मेट्रीक टन होते. कृषी निविष्ठांचे गुणवत्ता नियंत्रणासाठी १९८३ पासून प्रत्येक जिल्हास्तरावर गुणवत्ता नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. यात १ पूर्णवेळ तर ४१ अर्धवेळ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली असणार्या समितीत, कृषी उपसंचालक, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी या पथकाने केलेल्या कारवाईत बियाणांची गुणवत्ता तपासण्यासाठी ७८४ नमुने घेण्यात आले होते. यात २५ नमुने अप्रमाणित आढळलेले आहेत. यातील १२ नमुने कोर्टकेससाठी पात्र असून सहांवर कोर्टात खटले दाखल करण्यात आलेले आहेत. उर्वरित प्रशासकीय कारवाईसाठी वगळण्यात आलेले आहेत. १३ नमुन्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आलेली आहे. पाच नमुनांच्या बियाणांना विक्री बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांची रक्कम ३ लाख रुपये आहे. रासायनिक खतांच्या तपासलेल्या नमुन्यांपैकी ३९ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आलेले आहेत. त्यात २६ नमुन्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून १३ नमुन्यांविरोधात कोर्टात खटले दाखल करण्यात आलेले आहेत. ४७ प्रकरणी विक्रीबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत. या खतांची किंमत १५ लाख ७७ हजार रुपये आहे. किटकनाशकांचे २०२ नमुन्यापैकी अवघा एक नमुना अप्रमाणित घोषित करण्यात आलेला आहे. एका नमुन्याला विक्री बंदीचा आदेश देण्यात आलेला आहे. यंदा देखील कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण समितीमार्फत खते, बियाणे आणि किटकनाशकांचे नमुने घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विलास नलगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)बियाणांचा काळाबाजार करणार्या ३ कृषी सेवा केंद्राचे, २ खते विक्री केंद्राचे आणि ३ किटकनाशक केंद्राचे परवाने कृषी विभागाने निलंबित के ले आहेत. जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीकडे २२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्याचे निराकरण करण्यात आलेले आहे.