शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

साईनगरीतून १४०२ वीटभट्टी मजूर रेल्वेने उत्तरप्रदेशला मार्गस्थ; साईसंस्थानने दिली अन्नाची पाकिटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 15:43 IST

राहाता तालुक्यातील जवळपास नऊ गावांमध्ये  वीटभट्टीवर काम करणा-या १४०२ मजुरांना शुक्रवारी साईनगर रेल्वेस्थानकावरून रेल्वेने उत्तरप्रदेशला स्वगृही रवाना करण्यात आले. 

शिर्डी : राहाता तालुक्यातील जवळपास नऊ गावांमध्ये  वीटभट्टीवर काम करणा-या १४०२ मजुरांना शुक्रवारी साईनगर रेल्वेस्थानकावरूनरेल्वेने उत्तरप्रदेशला स्वगृही रवाना करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना स्वगृही पाठविण्याचे राज्याच्या ग्रामिण भागातील सर्वात मोठे आॅपरेशन राहाता तालुक्यात राबविण्यात आले.एकीकडे मायभूमीत परतण्याचा आनंद या मजुरांना झाला होता. यामुळे मजुरांनी प्रशासनाला धन्यवाद देत विशेष रेल्वेने साईनगर स्थानकावरून लखीमपूरकडे कूच केले. दुपारी तीन वाजता ही रेल्वे लखीमपूर, उत्तरप्रदेश येथे रवाना करण्यात आली. प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, नायब तहसीलदार सचिन म्हस्के, शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, मिथुन घुगे, रेल्वेचे स्थानकप्रमुख बी़एस़ प्रसाद, पोलीस निरीक्षक रामजी मीना, अनुप देशमुख यांच्यासह शंभरावर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.मायभूमीकडे परतणा-या मजुरांना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांच्या आदेशानुसार प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात यांनी प्रसादालय कर्मचा-यामार्फत अन्नाची पाकीटे दिली़ प्रवरा मेडीकल ट्रस्टने मास्क पुरवले. प्रशासनाने पाण्याचे पाऊच दिले़या मजुरांमध्ये साकुरी-४३७, राहाता-२१८, पिंपळस-९८, पुणतांबा-५५, खडकेवाके-२९, वाळकी-३५, रूई-६७ व एकरुखे येथील ८९ कामगारांचा समावेश होता. या सर्वांची गावपातळीवरच तपासणी करण्यात आली होती. या सर्वांचा सर्व्हे करणे, पैसे जमा करणे, तिकीट काढणे यात मंडलाधिकारी जाधव, ९ गावातील तलाठी, ग्रामसेवक व ५३ शिक्षकांचा समावेश होता.मजुरांना स्वगृही पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष प्रमुख उर्मिला पाटील, संदीप नचित, वैशाली आव्हाड, चंद्रशेखर शितोळे आदींनी पाठपुरावा केला. रात्री उशीरा रेल्वेची मान्यता मिळविली.औरंगाबाद घटनेतील मजुरांना श्रध्दांजलीदोन दिवसांपूर्वी १२५१ मजूर येथून रेल्वेने लखीमपुरला रवाना करण्यात आले. त्यावेळी टाळ्या वाजवून आनंदोत्सव व्यक्त करण्यात आला. कालच्या औरंगाबादच्या दुर्घटनेमुळे मात्र आजच्या निरोप समारंभावर दु:खाच सावट असल्याने या गोष्टी टाळण्यात आल्या. रेल्वे निघण्यापूर्वी कालच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगारrailwayरेल्वेshirdiशिर्डी