रब्बी हंगाम अडचणीत : टंचाईग्रस्त गावांना १२ टँकरने पाणी पुरवठा

By Admin | Updated: December 14, 2015 20:51 IST2015-12-14T20:51:16+5:302015-12-14T20:51:16+5:30

पाणी टंचाईमुळे कर्जत तालुक्यातील कुळधरण, करमनवाडी भागातील ज्वारीची पिके जळू लागली आहेत. त्यामुळे या पिकांना जीवदान मिळण्यासाठी अजूनही कुकडीचे आवर्तन सोडावे

12 tanker water supply to scarcity-hit villages in trouble: Rabi season | रब्बी हंगाम अडचणीत : टंचाईग्रस्त गावांना १२ टँकरने पाणी पुरवठा

रब्बी हंगाम अडचणीत : टंचाईग्रस्त गावांना १२ टँकरने पाणी पुरवठा

पाणी टंचाई शेवगावमध्ये पाणी टंचाईचे संकट गडद शेतीचे अर्थकारण कोलमडले
पाणी टंचाईमुळे कर्जत तालुक्यातील कुळधरण, करमनवाडी भागातील ज्वारीची पिके जळू लागली आहेत. त्यामुळे या पिकांना जीवदान मिळण्यासाठी अजूनही कुकडीचे आवर्तन सोडावे, अशी मागणी होत आहे. शेवगाव : ऐन हिवाळय़ात शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे संकट गडद बनत आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी तहानलेल्या गावांमधून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने मात्र मुळा धरणाचे पाणी सुटल्याने टँकरची

मागणी असलेल्या गावात काही प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविल्याने नागरिकांमधून नाराजी तसेच संतापाचा सूर व्यक्त होत आहे.
तालुक्यातील १३ गावे व ४९ वाड्या- वस्त्यांना १२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तालुक्यातील निंबेनांदूर, ढोरजळगाव शे, जोहरापूर, सामनगाव, लोळेगाव, ठाकूर निमगाव, भातकुडगाव, खामपिंप्री नवी, खामपिंप्री जुनी अशा गावातून गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे संकट अधिक गडद बनत आहे. प्रशासनाने मात्र मुळा पाटपाण्याचे रोटेशन सुटल्याने वरील टंचाईग्रस्त गावात काही प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने सध्या टँकर सुरू करण्याची आवश्यकता नसल्याचा अभिप्राय वरिष्ठ स्तरावर सादर केल्याने संबंधितांच्या कामकाज पद्धतीबाबत टंचाईग्रस्त गावातील नागरिकांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
शेवगाव तालुक्यातील निंबेनांदूर येथील जाणापूर, बोरबंद, चेकेवस्ती, दलित वस्ती, बडे वस्ती व बुधवंत वस्ती परिसरात पाणी टंचाईचे सावट कायम असल्याने प्रशासनाच्या पातळीवरुन ४ खेपा सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आल्याची माहिती पंचायत समितीच्या टंचाई शाखेतून सांगण्यात आली. इतर प्रस्तावाबाबत वास्तविक मुळा पाटपाण्याचे रोटेशन 'टेल टू हेड' या पद्धतीने करण्याची मागणी असताना संबंधितांनी ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे पाटपाण्याच्या लाभापासून कायम वंचित असलेल्या परिसराला यंदाही पाटपाण्याचा लाभ मिळाला नाही. ही वस्तुस्थिती असल्याने पाणी टंचाईच्या परिस्थितीची वरिष्ठांनी पाहणी करून तातडीने टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी होत आहे.
(तालुका प्रतिनिधी) ■ अत्यल्प पावसामुळे लागोपाठ चौथ्या वर्षी तालुक्यात खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. त्यामुळे शेतकर्‍यांना रब्बी हंगामाची आशा लागली होती. मात्र, पावसाने निराशा केल्याने रब्बी हंगामही अडचणीच्या विळख्यात सापडल्याने शेती व शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडून पडले. त्यामुळे कमी पावसावर येणार्‍या कांदा लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला असून, तालुक्यात तीन ते साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रात कांद्याची लागवड झाल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयातून सांगण्यात आली. मध्यंतरी कांदा अडीच ते तीन हजारापर्यंत गेला होता. मात्र सध्या कांद्याचे भाव बाराशे ते पंधराशे पर्यंत खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. तालुक्यात ज्वारीचे २७ ते २८ हजार तर हरभर्‍याचे ८ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र असून, ज्वारीवर चिकटा तर हरभर्‍यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.

Web Title: 12 tanker water supply to scarcity-hit villages in trouble: Rabi season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.