शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

शहरातील ११० कुटुंबांचा धोकादायक इमारतीत संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST

अहमदनगर : शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पावसामुळे ऐरणीवर आला असून, २२ धोकादायक इमारतींमध्ये सुमारे ११० रहिवासी वास्तव्यास असल्याचे पालिका ...

अहमदनगर : शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पावसामुळे ऐरणीवर आला असून, २२ धोकादायक इमारतींमध्ये सुमारे ११० रहिवासी वास्तव्यास असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहेत. अतिधोकादायक असलेल्या १२ इमारती त्वरित उतरवून घेण्याबाबत संबंधितांना नोटिसा देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मध्यवर्ती शहरात जुने वाडे व इमारती धोकादायक बनल्या आहेत. मागील आठवड्यात पावसाळामुळे एका धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला होता. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीचा काही भागा उतरवून घेतला. पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून इमारतींची पाहणी केली जाते. त्यासाठी त्रयस्थ अभियंत्यांचीही नेमणूक करण्यात आलेली आहे. इमारतींचे परीक्षण करून धोकादायक ठरविण्यात येत असतात. याही वर्षी पालिकेने २२ इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केलेले आहे. यापैकी १२ इमारती अतिधोकादायक आहेत. या इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. बहुतांश धोकादायक इमारतींबाबत मालक व भाडेकरू, असा वाद आहे. त्यामुळे इमारती उतरवून घेण्यात अडचणी येत असून, काहींनी न्यायालयात धाव घेतलेली आहे. अशा इमारतींबाबत पालिकेलाही निर्णय घेता येत नाही. त्यामुळे धोकादायक इमारती ‘जैसे थे’ आहे. धोकादायक इमारतींत नागरिक वास्तव्यास आहेत. पावसामुळे इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते, याची कल्पना तेथे राहणाऱ्या रहिवाशांनाही आहे; परंतु नाइलाजाने ते धोकादायक इमारतीत राहत असून, यावर ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे; परंतु हा निर्णय घेणार कोण, असा प्रश्न आहे.

....

शहरातील धोकादायक इमारती

२२

...

अतिधोकादायक इमारती

१२

...

धोकादायक इमारतीत राहणारे रहिवासी

अंदाजे-११०

..

सर्व काही माहीत आहे; पण जाणार कुठे?

महापालिकेने इमारतींचे परीक्षण करून धोकादायक ठरविल्या आहेत. याबाबत रहिवाशांना माहितीही देण्यात आली आहे; परंतु इमारत पाडून जाणार कुठे, असा तेथे राहणाऱ्या रहिवाशांचा प्रश्न आहे. मालकी हक्काचा वाद निकाली निघत नसल्याने भाडेकरू तिथेच राहत असून, त्यांनाही नाइलाज आहे, असे सांगण्यात आले.

...

वारंवार नोटिसा देऊनही इमारती ‘जैसे थे’

महापालिकेकडून धोकादायक इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. मागील वर्षीही नोटिसा बजावण्यात आल्या होत्या; परंतु इमारती उतरवून घेतल्या जात नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे इमारती उभ्या असून, त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

...

शहरातील १२ अतिधोकादायक इमारत मालकांना इमारत त्वरित उतरवून घेण्याबाबत नाेटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्या अद्याप उतरविण्यात आलेल्या नाहीत.

- श्रीकांत निंबाळकर, अभियंता, महापालिका