शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

शहरातील ११० कुटुंबांचा धोकादायक इमारतीत संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST

अहमदनगर : शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पावसामुळे ऐरणीवर आला असून, २२ धोकादायक इमारतींमध्ये सुमारे ११० रहिवासी वास्तव्यास असल्याचे पालिका ...

अहमदनगर : शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पावसामुळे ऐरणीवर आला असून, २२ धोकादायक इमारतींमध्ये सुमारे ११० रहिवासी वास्तव्यास असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहेत. अतिधोकादायक असलेल्या १२ इमारती त्वरित उतरवून घेण्याबाबत संबंधितांना नोटिसा देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मध्यवर्ती शहरात जुने वाडे व इमारती धोकादायक बनल्या आहेत. मागील आठवड्यात पावसाळामुळे एका धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला होता. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीचा काही भागा उतरवून घेतला. पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून इमारतींची पाहणी केली जाते. त्यासाठी त्रयस्थ अभियंत्यांचीही नेमणूक करण्यात आलेली आहे. इमारतींचे परीक्षण करून धोकादायक ठरविण्यात येत असतात. याही वर्षी पालिकेने २२ इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केलेले आहे. यापैकी १२ इमारती अतिधोकादायक आहेत. या इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. बहुतांश धोकादायक इमारतींबाबत मालक व भाडेकरू, असा वाद आहे. त्यामुळे इमारती उतरवून घेण्यात अडचणी येत असून, काहींनी न्यायालयात धाव घेतलेली आहे. अशा इमारतींबाबत पालिकेलाही निर्णय घेता येत नाही. त्यामुळे धोकादायक इमारती ‘जैसे थे’ आहे. धोकादायक इमारतींत नागरिक वास्तव्यास आहेत. पावसामुळे इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते, याची कल्पना तेथे राहणाऱ्या रहिवाशांनाही आहे; परंतु नाइलाजाने ते धोकादायक इमारतीत राहत असून, यावर ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे; परंतु हा निर्णय घेणार कोण, असा प्रश्न आहे.

....

शहरातील धोकादायक इमारती

२२

...

अतिधोकादायक इमारती

१२

...

धोकादायक इमारतीत राहणारे रहिवासी

अंदाजे-११०

..

सर्व काही माहीत आहे; पण जाणार कुठे?

महापालिकेने इमारतींचे परीक्षण करून धोकादायक ठरविल्या आहेत. याबाबत रहिवाशांना माहितीही देण्यात आली आहे; परंतु इमारत पाडून जाणार कुठे, असा तेथे राहणाऱ्या रहिवाशांचा प्रश्न आहे. मालकी हक्काचा वाद निकाली निघत नसल्याने भाडेकरू तिथेच राहत असून, त्यांनाही नाइलाज आहे, असे सांगण्यात आले.

...

वारंवार नोटिसा देऊनही इमारती ‘जैसे थे’

महापालिकेकडून धोकादायक इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. मागील वर्षीही नोटिसा बजावण्यात आल्या होत्या; परंतु इमारती उतरवून घेतल्या जात नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे इमारती उभ्या असून, त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

...

शहरातील १२ अतिधोकादायक इमारत मालकांना इमारत त्वरित उतरवून घेण्याबाबत नाेटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्या अद्याप उतरविण्यात आलेल्या नाहीत.

- श्रीकांत निंबाळकर, अभियंता, महापालिका