शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
3
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
4
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
5
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
6
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
7
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
8
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
9
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
10
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
11
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
12
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
13
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
14
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
15
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
16
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
17
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
18
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
20
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

१०७ गावात पाणी शुध्दीकरणात अनियमितता

By admin | Updated: February 23, 2024 10:02 IST

अहमदनगर : नगर शहरात सध्या काविळीची साथ सुरू आहे.

अहमदनगर : नगर शहरात सध्या काविळीची साथ सुरू आहे. या ठिकाणी शेकडो नागरिकांना काविळीची लागण झालेली असतांना आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात १०७ गावात पिण्याचे पाणी शुध्दीकरणात अनियमितता झालेली आहे. पाणी शुध्दीकरणासाठी ब्लिचिंग पावडर असतांनाही जिल्ह्यात १२ गावात पिण्याचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. तसेच प्रत्येक महिन्यांप्रमाणे आॅगस्टमध्ये २५८ गावातील पाणी नमुने दूषित आढळले आहेत.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, स्वच्छता आणि पाणी गुणनियंत्रण समितीच्या वतीने दर महिन्याला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे नमुने घेण्यात येतात. या ठिकाणी पाणी नमुने पिण्यास अयोग्य आणि पाणी शुध्दीकरणात अनियमितता, दूषित असणाऱ्यांना गावच्या ग्रामपंचायतींना लाल कार्ड देण्यात येत आहे. मात्र, असे असतांनाही जिल्ह्यातील दूषित पाणी नमुने सापडण्याचे प्रमाण अद्यापही घटलेले दिसत नाही.आरोग्य विभागाने आॅगस्ट महिन्यात १ हजार ३१६ ग्रामपंचायतींत पिण्याचे पाणी योग्य आहे की नाही याची तपासणी करण्यात आली. यात तीन गावात पाणी शुध्दीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लिचिंग पावडरचा साठा नसल्याचे आढळून आले. १२ गावात पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले. तर १०७ गावात पाणी शुध्दीकरणात अनियमितता दिसून आली. करंडी, शिवाजीनगर (ता. अकोले), रुपेवाडी (पाथर्डी) या ठिकाणी टीसीएल पावडर नव्हती. (प्रतिनिधी)दरम्यान, पाण्याच्या जैविक तपासणीत २५८ पाणी नमुने दूषित आढळलेले आहेत. यात सर्वाधिक ६४ नमुने एकट्या श्रीगोंंदा तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल अकोले ३६, संगमनेर २३, नगर २०, कोपरगाव आणि पाथर्डी प्रत्येकी १९, कर्जत १६, पारनेर १५, राहुरी ८, श्रीरामपूर ७, राहाता ६ यांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १० हजार ४५९ पाणी तपासण्यात आले असून यात १ हजार ८७८ पाणी नमुने दूषित आढलेले आहेत. पाणी शुध्दीकरणात अनियमितता असणारी गावेअकोले ३१, जामखेड २५, नेवासा १४, पारनेर २, पाथर्डी २५, राहुरी ६, संगमनेर ४ यांचा समावेश आहे. श्रीरामपूर, श्रीगोंदा, शेवगाव, राहाता , नेवासा, कर्जत आणि नगर तालुक्यातील एकाही गावाचा समावेश यात नाही.जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा पाणी गुणवत्ता समितीच्या मार्फत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पिण्याचे शुध्द पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित येत आहेत. याबाबत संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जलजन्य आजारांचा उद्रेक होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.- शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी.