शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
3
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
4
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
5
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
6
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
7
उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व
8
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
9
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
10
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी
11
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
12
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
13
सेबीने जेन स्ट्रीट प्रकरण जाणूनबुजून लांबवले? माधवी बुच यांचा 'स्फोटक' खुलासा, आता सत्य काय?
14
चिंताजनक! ४० दिवसांत हार्ट अटॅकने २३ जणांचा मृत्यू; 'या' राज्यात खळबळ, रुग्णालयात प्रचंड गर्दी
15
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
16
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
17
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
18
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
19
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
20
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!

१०७ गावात पाणी शुध्दीकरणात अनियमितता

By admin | Updated: February 23, 2024 10:02 IST

अहमदनगर : नगर शहरात सध्या काविळीची साथ सुरू आहे.

अहमदनगर : नगर शहरात सध्या काविळीची साथ सुरू आहे. या ठिकाणी शेकडो नागरिकांना काविळीची लागण झालेली असतांना आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात १०७ गावात पिण्याचे पाणी शुध्दीकरणात अनियमितता झालेली आहे. पाणी शुध्दीकरणासाठी ब्लिचिंग पावडर असतांनाही जिल्ह्यात १२ गावात पिण्याचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. तसेच प्रत्येक महिन्यांप्रमाणे आॅगस्टमध्ये २५८ गावातील पाणी नमुने दूषित आढळले आहेत.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, स्वच्छता आणि पाणी गुणनियंत्रण समितीच्या वतीने दर महिन्याला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे नमुने घेण्यात येतात. या ठिकाणी पाणी नमुने पिण्यास अयोग्य आणि पाणी शुध्दीकरणात अनियमितता, दूषित असणाऱ्यांना गावच्या ग्रामपंचायतींना लाल कार्ड देण्यात येत आहे. मात्र, असे असतांनाही जिल्ह्यातील दूषित पाणी नमुने सापडण्याचे प्रमाण अद्यापही घटलेले दिसत नाही.आरोग्य विभागाने आॅगस्ट महिन्यात १ हजार ३१६ ग्रामपंचायतींत पिण्याचे पाणी योग्य आहे की नाही याची तपासणी करण्यात आली. यात तीन गावात पाणी शुध्दीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लिचिंग पावडरचा साठा नसल्याचे आढळून आले. १२ गावात पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले. तर १०७ गावात पाणी शुध्दीकरणात अनियमितता दिसून आली. करंडी, शिवाजीनगर (ता. अकोले), रुपेवाडी (पाथर्डी) या ठिकाणी टीसीएल पावडर नव्हती. (प्रतिनिधी)दरम्यान, पाण्याच्या जैविक तपासणीत २५८ पाणी नमुने दूषित आढळलेले आहेत. यात सर्वाधिक ६४ नमुने एकट्या श्रीगोंंदा तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल अकोले ३६, संगमनेर २३, नगर २०, कोपरगाव आणि पाथर्डी प्रत्येकी १९, कर्जत १६, पारनेर १५, राहुरी ८, श्रीरामपूर ७, राहाता ६ यांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १० हजार ४५९ पाणी तपासण्यात आले असून यात १ हजार ८७८ पाणी नमुने दूषित आढलेले आहेत. पाणी शुध्दीकरणात अनियमितता असणारी गावेअकोले ३१, जामखेड २५, नेवासा १४, पारनेर २, पाथर्डी २५, राहुरी ६, संगमनेर ४ यांचा समावेश आहे. श्रीरामपूर, श्रीगोंदा, शेवगाव, राहाता , नेवासा, कर्जत आणि नगर तालुक्यातील एकाही गावाचा समावेश यात नाही.जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा पाणी गुणवत्ता समितीच्या मार्फत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पिण्याचे शुध्द पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित येत आहेत. याबाबत संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जलजन्य आजारांचा उद्रेक होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.- शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी.