शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

१०७ गावात पाणी शुध्दीकरणात अनियमितता

By admin | Updated: February 23, 2024 10:02 IST

अहमदनगर : नगर शहरात सध्या काविळीची साथ सुरू आहे.

अहमदनगर : नगर शहरात सध्या काविळीची साथ सुरू आहे. या ठिकाणी शेकडो नागरिकांना काविळीची लागण झालेली असतांना आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात १०७ गावात पिण्याचे पाणी शुध्दीकरणात अनियमितता झालेली आहे. पाणी शुध्दीकरणासाठी ब्लिचिंग पावडर असतांनाही जिल्ह्यात १२ गावात पिण्याचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. तसेच प्रत्येक महिन्यांप्रमाणे आॅगस्टमध्ये २५८ गावातील पाणी नमुने दूषित आढळले आहेत.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, स्वच्छता आणि पाणी गुणनियंत्रण समितीच्या वतीने दर महिन्याला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे नमुने घेण्यात येतात. या ठिकाणी पाणी नमुने पिण्यास अयोग्य आणि पाणी शुध्दीकरणात अनियमितता, दूषित असणाऱ्यांना गावच्या ग्रामपंचायतींना लाल कार्ड देण्यात येत आहे. मात्र, असे असतांनाही जिल्ह्यातील दूषित पाणी नमुने सापडण्याचे प्रमाण अद्यापही घटलेले दिसत नाही.आरोग्य विभागाने आॅगस्ट महिन्यात १ हजार ३१६ ग्रामपंचायतींत पिण्याचे पाणी योग्य आहे की नाही याची तपासणी करण्यात आली. यात तीन गावात पाणी शुध्दीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लिचिंग पावडरचा साठा नसल्याचे आढळून आले. १२ गावात पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले. तर १०७ गावात पाणी शुध्दीकरणात अनियमितता दिसून आली. करंडी, शिवाजीनगर (ता. अकोले), रुपेवाडी (पाथर्डी) या ठिकाणी टीसीएल पावडर नव्हती. (प्रतिनिधी)दरम्यान, पाण्याच्या जैविक तपासणीत २५८ पाणी नमुने दूषित आढळलेले आहेत. यात सर्वाधिक ६४ नमुने एकट्या श्रीगोंंदा तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल अकोले ३६, संगमनेर २३, नगर २०, कोपरगाव आणि पाथर्डी प्रत्येकी १९, कर्जत १६, पारनेर १५, राहुरी ८, श्रीरामपूर ७, राहाता ६ यांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १० हजार ४५९ पाणी तपासण्यात आले असून यात १ हजार ८७८ पाणी नमुने दूषित आढलेले आहेत. पाणी शुध्दीकरणात अनियमितता असणारी गावेअकोले ३१, जामखेड २५, नेवासा १४, पारनेर २, पाथर्डी २५, राहुरी ६, संगमनेर ४ यांचा समावेश आहे. श्रीरामपूर, श्रीगोंदा, शेवगाव, राहाता , नेवासा, कर्जत आणि नगर तालुक्यातील एकाही गावाचा समावेश यात नाही.जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा पाणी गुणवत्ता समितीच्या मार्फत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पिण्याचे शुध्द पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित येत आहेत. याबाबत संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जलजन्य आजारांचा उद्रेक होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.- शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी.