शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

१ लाख ४५ हजार विद्यार्थी जाणार पुढच्या वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST

राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची कोणतीही परीक्षा न होता या विद्यार्थ्यांना पुढील ...

राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची कोणतीही परीक्षा न होता या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय मागील आठवड्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला. त्यानंतर बुधवारी पुन्हा नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबतही शिक्षण मंत्र्यांनी हाच निर्णय कायम ठेवला. नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न होता त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल, असे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले. नगर जिल्ह्यात पहिली ते आठवीचे सुमारे सव्वा सहा लाख विद्यार्थी आहेत. त्याप्रमाणे नववीचे ८१ हजार २०० व अकरावीचे ६३ हजार ८२२ असे एकूण १ लाख ४५ हजार विद्यार्थी संख्या मागील वर्षीच्या पटसंख्यानुसार आहे. या सर्वांना आता परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे.

आता केवळ दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत ठोस निर्णय झालेला नाही. तोही लवकरच होईल. दहावी बारावीची परीक्षा ऑफलाइन होणार आहे. परंतु तरीही सध्याच्या वेळापत्रकात बदल होणार की आणखी काही वेगळा पर्याय समोर येणार याबाबत लवकरच निर्णय जाहीर करू, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

----------------

नववी व अकरावीचे तालुकानिहाय विद्यार्थी

तालुका नववी अकरावी

अकोले ५०५६. ३७१८

जामखेड २५४४. २९०४

कर्जत ३७९६. ३३०७

कोपरगाव ६४१४. ४६१९

महापालिका ६८९२. ७७०२

नगर ५८५३. २८४४

नेवासा ६८८४. ४०९३

पारनेर ४५३८. ३२२१

पाथर्डी ४६४५. ५४४५

राहाता ६२३९. ५०९८

राहुरी ५२१५. २८७३

संगमनेर ८६४०. ६५८४

शेवगाव ४४९१. ४४४०

श्रीगोंदा ४६७६. ३४४४

श्रीरामपूर ५३२७. ३५३०

----------------------------------------

एकूण ८१२००. ६३८२२