शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

‘‘ श्रमदेवतेची आराधना’’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 17:54 IST

विजय आणि राजू दोघेही सख्खे भाऊ, दोघांचेही शिक्षण जेमतेम झालेले. विजय हा पापभिरू, शांत, सज्जन व कष्टाळू प्रवृत्तीचा याउलट राजू हा आळशी व गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता.

डॉ.दत्ता कोहिनकर

विजय आणि राजू दोघेही सख्खे भाऊ, दोघांचेही शिक्षण जेमतेम झालेले. विजय हा पापभिरू, शांत, सज्जन व कष्टाळू प्रवृत्तीचा याउलट राजू हा आळशी व गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता.चटकन - कमी श्रमात उलटी - पालटी कामे करून पैसे कमावणे व आळसात दिवस खाण्यापिण्यात घालवणे. राजुला आवडायचे. श्रमजीवी विजयने काबाडकष्ट करून लोकसेवा व सत्याच्या मार्गाने नावलौकीक मिळवला होता. समाजात त्याला खूप मान मिळत होता. याउलट गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे राजु दुःखीकष्टी व  अपमानित जीवन जगत होता. लोक त्याला जवळ करत नव्हती. दोघेही एकाच संस्कारात वाढलेले पण आपले आरंभीचे असणे जरी आपल्या हाती नसले तरी नंतरचे होणे आपल्या हाती असते हे विजयने सच्चाई व दीर्घोद्योगाने पटवून दिले होते. 

खरोखर मित्रांनो काबाडकष्टाला - नैतिक मुल्यांची जोड दिल्यास जीवनाचा सन्मान सर्वत्र केला जातो. लहानपणी आजीने आम्हा मुलांना जग कधी बुडणार आहे हे तिला माहीत असल्याचे सांगितले. आम्ही उत्तराचा आग्रह धरत खूप गलका - गोंगाट केल्यावर ती म्हणाली. ज्या दिवशी माणसांच्या नजरेला थांबलेली - निवांत बसलेली - झोपलेली मुंगी दिसेल तेव्हा जग बुडेल. आम्ही सर्वांनी खुप शोध घेऊन थांबलेली मुंगी आमच्या नजरेला पडली नाही. आजीला या गोष्टीतून एवढेच सांगायचे होते. मुंगीसारखा शून्यवत - नगण्य जीव अहोरात्र काहीतरी करीत असतो. याउलट ज्याच्या ठायी ईश्वराने सर्व सामर्थ्य दिले तो मात्र आपल्या नाकर्तेपणाने सर्व सामर्थ्याची प्रतारणा करतो. माणसाला परमेश्वराने दोन हात दिलेत ते श्रम करण्यासाठी, इतरांना आधार देण्यासाठी व रंजले गांजलेल्यांची सेवा करण्यासाठी. ‘जेथे राबती हात तेथे हरी’’ ही संत गाडगेबाबांची धारणा होती . ज्या देशात श्रमाला प्रतिष्ठा लाभलेली असते अथवा श्रमाची उपासना निष्ठापुर्वक केली जाते तो देश समृध्द व अजिंक्य बनतो हा विचार गाडगेबाबांनी समाजासमोर प्रत्यक्ष स्वरूपात ठेवला होता. आज कमी श्रमात जास्त धन मिळविण्याची अपप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. पण या वाममार्गाने मिळवलेला पैसा मी-मी म्हणणार्या राज्यकर्त्यांना देखील तुरूंगाची हवा दाखवत आहे. करोडोपती असणारे महाभाग आज दुःखी-कष्टी होवून नैराश्याने आत्महत्या करत आहे. कारण श्रमाला प्रतिष्ठा व नैतिक मुल्यांना डावलून केलेल्या कृत्याचे हे फळ असते. कोणी एका शास्त्रज्ञाचे साडेतीन हजार प्रयोग फसले. परंतु पहाटेच्या वेळी प्रयोगशाळेचे दार उघडून तो कामाला लागत असे कोणी त्याला हिणवले, ‘या वाया गेलेल्या प्रयोगाची कहाणी जगाला कळली तर?  यावर तो म्हणाला हेच प्रयोग परत कोणाला करावे लागणार नाही. या कल्पनेने जग आनंदी होईल !* लोकशाहीर आण्णाभाऊ साठे म्हणायचे,* पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकर्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे * ’’.लहानपणीची एक बोधपर कविता सांगून जाते."The heights by greatman reached and kept were not attained by sudden flight.  But they while their companions slept were toilling upwards in the night."म्हणून माणसाने नेहमी दीर्घोउदयोगी रहावे.‘‘उद्योगाची घरी - रिद्धीसिद्धी पाणी भरी’’ या सुभाषिताचे सार जाणून घ्यावे. आयुष्यात काबाड कष्टाला - सेवेची, त्यागाची, लोककल्याणाची व सत्याची जोड देणारे विवेकानंद - शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले या महापुरूषंचा इतिहास आजही आपणांस प्रेरणा देतो व श्रमाला - नैतिक मुल्यांची जोड देऊन श्रमदेवतेची उपासना केल्यास आपण नियतीकडून सन्मानित झाल्याशिवाय राहणार नाही. अशी उच्चकोटीची शिकवण देतो. मग चला - उठो - जागे व्हा - श्रमदेवतेची पुजा केल्याशिवाय स्वस्थ बसू नका

(लेखक हे व्याख्याते आहेत. )

टॅग्स :SocialसामाजिकAdhyatmikआध्यात्मिक