शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

हर्षलने असे कृत्य का केले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 20:52 IST

मानसशास्त्रानुसार, ज्या मुलांना लहानपणापासून प्रेम , आदर , स्पर्श , कौतुक , प्रेमाची उबदार मिठी पालकांनी दिलेली असते ती मुले भावानिक परिपक्व होतात . त्यांचा भावनिक कोष मजबूत होतो . कितीही बिकट परिस्थिती आली तरी ही मुले त्यातून वाट काढतात . कधीही आत्महत्या करत नाही . म्हणून इंटेलिजन्स कोषापेक्षा भावनिक कोष हा महत्त्वाचा असतो.

- डॉ .दत्ता कोहिनकर

एकतर्फी प्रेमातून हर्षलने आपल्याच वर्गातील मुलीवर ब्लेडने वार करून स्वतालाही इजा करून घेतली होती . सुधारगृहातील हर्षलची केस स्टडी केली असता, आई - बाबा उच्चशिक्षित, उच्चस्पद नोकरी करणारे, त्यामुळे हर्षल पाळणाघरात वाढला . आईबाबांचं प्रेम सोडून सर्व गोष्टी त्याला मिळाल्या होत्या. तो प्रेमाचा, स्पर्शाचा भुकेला होता. अमेरिकेत ५ कृत्रिक रोबोटिक माकडांच्या आया ( हुबेहूब माकडीणी ) बनवल्या. नुकतीच जन्मलेली लहान माकडांची पिल्ले त्यांच्याकडे सोडली. बटन व सेन्सरच्या माध्यमातून पाचही माकडीणीकडून त्यांना दुध पाजणे , जवळ घेणे , त्यांच्याशी खेळणे , त्यांना झोपवणे या प्रकारची कार्य ५ वर्षे त्यांच्याकडून करून घेतली. 

५ वर्षानंतर सर्व माकडे तब्येतीने वाढली होती पण नॉर्मल नव्हती व हिंस्र झाली होती.  याच्या मुळाशी गेले असता, आईचे वात्सल्य, नैसर्गिक प्रेम, स्पर्श त्यांना मिळाला नव्हता . मित्रांनो घराघरात आईवडलांची भांडणे, मुलांना प्रेम, सहवास न मिळणे या कारणांमुळे व पाहिजे त्या गोष्टी चटकन उपलब्ध झाल्यामुळे रागीट पिढी तयार होत आहे . प्रेमाची भुकेली ही मुले , त्यांना ते नाही मिळालं की ओरबडून मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यातून असे हल्ले होऊन मुले वाममार्गाला जात आहेत . हर्षलला आईबाबांनी सगळ पुरवलं होतं. 

श्रीमंत पालक हर्षलने मोबाईल, लॅपटॉप, गाडी, पाहिजे तेवढी कॅश, थोडक्यात हर्षलची भौतिक जगातील सगळ्या मागण्या पूर्ण करत होते. त्यामुळे हवंय ते मिळत व मिळवण्यासाठी वाटेल ते करायच हा हर्षलचा स्वभाव झाला होता .पण वेळ, स्पर्श, प्रेम त्याला पालक देऊ शकले नव्हते. म्हणून प्रेमाचा व स्पर्शाचा तो भुकेला होता . ज्याक्षणी त्या मुलीन ते नाकारलं त्याक्षणी हर्षलचा स्वतःवरचा ताबा गेला व त्याने ओरबाडून ते मिळवण्यासाठी प्रयत्न केला व त्या मुलीवर वार केले. म्हणून लहानपणापासून मुलामुलीना वेळ द्या, प्रेम द्या, मिठी द्या, त्यांचे कौतुक करा, आपलेणाची भावना निर्माण करा व आपल्या आचरणातून चांगले संस्कार द्या, नाहीतर घराघरात असे विक्षिप्त हर्षल तयार होतील. कोणाच्याही मुलामुलींवर ही वेळ येऊ नये यासाठी हा लेखनप्रपंच . जी लोक माझा हा लेख वाचत असतील त्यांनी या क्षणी आपली मुले जवळ असतील तर त्यांना प्रेमाने जवळ घेऊन त्यांचे कौतुक करा व एक जादू कि झप्पी द्या . दूर असतील तर त्यांना एक फोन करून आपले प्रेम व्यक्त करा.

मुलांचे वय किती आहे यावर जाऊ नका. मनाला वय नसते. ते प्रेमाचे भुकेले असते. मानसशास्त्रानुसार, ज्या मुलांना लहानपणापासून प्रेम , आदर , स्पर्श , कौतुक , प्रेमाची उबदार मिठी पालकांनी दिलेली असते ती मुले भावानिक परिपक्व होतात . त्यांचा भावनिक कोष मजबूत होतो . कितीही बिकट परिस्थिती आली तरी ही मुले त्यातून वाट काढतात . कधीही आत्महत्या करत नाही . म्हणून इंटेलिजन्स कोषापेक्षा भावनिक कोष हा महत्त्वाचा असतो. त्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यायला हवा. नाहीतर घराघरात असे हर्षल तयार होतील .

टॅग्स :spiritualअध्यात्मिकCrime Newsगुन्हेगारी