शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
8
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
9
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
10
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
11
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
13
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
14
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
15
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
16
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
17
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
18
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
19
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
20
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
Daily Top 2Weekly Top 5

हर्षलने असे कृत्य का केले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 20:52 IST

मानसशास्त्रानुसार, ज्या मुलांना लहानपणापासून प्रेम , आदर , स्पर्श , कौतुक , प्रेमाची उबदार मिठी पालकांनी दिलेली असते ती मुले भावानिक परिपक्व होतात . त्यांचा भावनिक कोष मजबूत होतो . कितीही बिकट परिस्थिती आली तरी ही मुले त्यातून वाट काढतात . कधीही आत्महत्या करत नाही . म्हणून इंटेलिजन्स कोषापेक्षा भावनिक कोष हा महत्त्वाचा असतो.

- डॉ .दत्ता कोहिनकर

एकतर्फी प्रेमातून हर्षलने आपल्याच वर्गातील मुलीवर ब्लेडने वार करून स्वतालाही इजा करून घेतली होती . सुधारगृहातील हर्षलची केस स्टडी केली असता, आई - बाबा उच्चशिक्षित, उच्चस्पद नोकरी करणारे, त्यामुळे हर्षल पाळणाघरात वाढला . आईबाबांचं प्रेम सोडून सर्व गोष्टी त्याला मिळाल्या होत्या. तो प्रेमाचा, स्पर्शाचा भुकेला होता. अमेरिकेत ५ कृत्रिक रोबोटिक माकडांच्या आया ( हुबेहूब माकडीणी ) बनवल्या. नुकतीच जन्मलेली लहान माकडांची पिल्ले त्यांच्याकडे सोडली. बटन व सेन्सरच्या माध्यमातून पाचही माकडीणीकडून त्यांना दुध पाजणे , जवळ घेणे , त्यांच्याशी खेळणे , त्यांना झोपवणे या प्रकारची कार्य ५ वर्षे त्यांच्याकडून करून घेतली. 

५ वर्षानंतर सर्व माकडे तब्येतीने वाढली होती पण नॉर्मल नव्हती व हिंस्र झाली होती.  याच्या मुळाशी गेले असता, आईचे वात्सल्य, नैसर्गिक प्रेम, स्पर्श त्यांना मिळाला नव्हता . मित्रांनो घराघरात आईवडलांची भांडणे, मुलांना प्रेम, सहवास न मिळणे या कारणांमुळे व पाहिजे त्या गोष्टी चटकन उपलब्ध झाल्यामुळे रागीट पिढी तयार होत आहे . प्रेमाची भुकेली ही मुले , त्यांना ते नाही मिळालं की ओरबडून मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यातून असे हल्ले होऊन मुले वाममार्गाला जात आहेत . हर्षलला आईबाबांनी सगळ पुरवलं होतं. 

श्रीमंत पालक हर्षलने मोबाईल, लॅपटॉप, गाडी, पाहिजे तेवढी कॅश, थोडक्यात हर्षलची भौतिक जगातील सगळ्या मागण्या पूर्ण करत होते. त्यामुळे हवंय ते मिळत व मिळवण्यासाठी वाटेल ते करायच हा हर्षलचा स्वभाव झाला होता .पण वेळ, स्पर्श, प्रेम त्याला पालक देऊ शकले नव्हते. म्हणून प्रेमाचा व स्पर्शाचा तो भुकेला होता . ज्याक्षणी त्या मुलीन ते नाकारलं त्याक्षणी हर्षलचा स्वतःवरचा ताबा गेला व त्याने ओरबाडून ते मिळवण्यासाठी प्रयत्न केला व त्या मुलीवर वार केले. म्हणून लहानपणापासून मुलामुलीना वेळ द्या, प्रेम द्या, मिठी द्या, त्यांचे कौतुक करा, आपलेणाची भावना निर्माण करा व आपल्या आचरणातून चांगले संस्कार द्या, नाहीतर घराघरात असे विक्षिप्त हर्षल तयार होतील. कोणाच्याही मुलामुलींवर ही वेळ येऊ नये यासाठी हा लेखनप्रपंच . जी लोक माझा हा लेख वाचत असतील त्यांनी या क्षणी आपली मुले जवळ असतील तर त्यांना प्रेमाने जवळ घेऊन त्यांचे कौतुक करा व एक जादू कि झप्पी द्या . दूर असतील तर त्यांना एक फोन करून आपले प्रेम व्यक्त करा.

मुलांचे वय किती आहे यावर जाऊ नका. मनाला वय नसते. ते प्रेमाचे भुकेले असते. मानसशास्त्रानुसार, ज्या मुलांना लहानपणापासून प्रेम , आदर , स्पर्श , कौतुक , प्रेमाची उबदार मिठी पालकांनी दिलेली असते ती मुले भावानिक परिपक्व होतात . त्यांचा भावनिक कोष मजबूत होतो . कितीही बिकट परिस्थिती आली तरी ही मुले त्यातून वाट काढतात . कधीही आत्महत्या करत नाही . म्हणून इंटेलिजन्स कोषापेक्षा भावनिक कोष हा महत्त्वाचा असतो. त्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यायला हवा. नाहीतर घराघरात असे हर्षल तयार होतील .

टॅग्स :spiritualअध्यात्मिकCrime Newsगुन्हेगारी