शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

हर्षलने असे कृत्य का केले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 20:52 IST

मानसशास्त्रानुसार, ज्या मुलांना लहानपणापासून प्रेम , आदर , स्पर्श , कौतुक , प्रेमाची उबदार मिठी पालकांनी दिलेली असते ती मुले भावानिक परिपक्व होतात . त्यांचा भावनिक कोष मजबूत होतो . कितीही बिकट परिस्थिती आली तरी ही मुले त्यातून वाट काढतात . कधीही आत्महत्या करत नाही . म्हणून इंटेलिजन्स कोषापेक्षा भावनिक कोष हा महत्त्वाचा असतो.

- डॉ .दत्ता कोहिनकर

एकतर्फी प्रेमातून हर्षलने आपल्याच वर्गातील मुलीवर ब्लेडने वार करून स्वतालाही इजा करून घेतली होती . सुधारगृहातील हर्षलची केस स्टडी केली असता, आई - बाबा उच्चशिक्षित, उच्चस्पद नोकरी करणारे, त्यामुळे हर्षल पाळणाघरात वाढला . आईबाबांचं प्रेम सोडून सर्व गोष्टी त्याला मिळाल्या होत्या. तो प्रेमाचा, स्पर्शाचा भुकेला होता. अमेरिकेत ५ कृत्रिक रोबोटिक माकडांच्या आया ( हुबेहूब माकडीणी ) बनवल्या. नुकतीच जन्मलेली लहान माकडांची पिल्ले त्यांच्याकडे सोडली. बटन व सेन्सरच्या माध्यमातून पाचही माकडीणीकडून त्यांना दुध पाजणे , जवळ घेणे , त्यांच्याशी खेळणे , त्यांना झोपवणे या प्रकारची कार्य ५ वर्षे त्यांच्याकडून करून घेतली. 

५ वर्षानंतर सर्व माकडे तब्येतीने वाढली होती पण नॉर्मल नव्हती व हिंस्र झाली होती.  याच्या मुळाशी गेले असता, आईचे वात्सल्य, नैसर्गिक प्रेम, स्पर्श त्यांना मिळाला नव्हता . मित्रांनो घराघरात आईवडलांची भांडणे, मुलांना प्रेम, सहवास न मिळणे या कारणांमुळे व पाहिजे त्या गोष्टी चटकन उपलब्ध झाल्यामुळे रागीट पिढी तयार होत आहे . प्रेमाची भुकेली ही मुले , त्यांना ते नाही मिळालं की ओरबडून मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यातून असे हल्ले होऊन मुले वाममार्गाला जात आहेत . हर्षलला आईबाबांनी सगळ पुरवलं होतं. 

श्रीमंत पालक हर्षलने मोबाईल, लॅपटॉप, गाडी, पाहिजे तेवढी कॅश, थोडक्यात हर्षलची भौतिक जगातील सगळ्या मागण्या पूर्ण करत होते. त्यामुळे हवंय ते मिळत व मिळवण्यासाठी वाटेल ते करायच हा हर्षलचा स्वभाव झाला होता .पण वेळ, स्पर्श, प्रेम त्याला पालक देऊ शकले नव्हते. म्हणून प्रेमाचा व स्पर्शाचा तो भुकेला होता . ज्याक्षणी त्या मुलीन ते नाकारलं त्याक्षणी हर्षलचा स्वतःवरचा ताबा गेला व त्याने ओरबाडून ते मिळवण्यासाठी प्रयत्न केला व त्या मुलीवर वार केले. म्हणून लहानपणापासून मुलामुलीना वेळ द्या, प्रेम द्या, मिठी द्या, त्यांचे कौतुक करा, आपलेणाची भावना निर्माण करा व आपल्या आचरणातून चांगले संस्कार द्या, नाहीतर घराघरात असे विक्षिप्त हर्षल तयार होतील. कोणाच्याही मुलामुलींवर ही वेळ येऊ नये यासाठी हा लेखनप्रपंच . जी लोक माझा हा लेख वाचत असतील त्यांनी या क्षणी आपली मुले जवळ असतील तर त्यांना प्रेमाने जवळ घेऊन त्यांचे कौतुक करा व एक जादू कि झप्पी द्या . दूर असतील तर त्यांना एक फोन करून आपले प्रेम व्यक्त करा.

मुलांचे वय किती आहे यावर जाऊ नका. मनाला वय नसते. ते प्रेमाचे भुकेले असते. मानसशास्त्रानुसार, ज्या मुलांना लहानपणापासून प्रेम , आदर , स्पर्श , कौतुक , प्रेमाची उबदार मिठी पालकांनी दिलेली असते ती मुले भावानिक परिपक्व होतात . त्यांचा भावनिक कोष मजबूत होतो . कितीही बिकट परिस्थिती आली तरी ही मुले त्यातून वाट काढतात . कधीही आत्महत्या करत नाही . म्हणून इंटेलिजन्स कोषापेक्षा भावनिक कोष हा महत्त्वाचा असतो. त्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यायला हवा. नाहीतर घराघरात असे हर्षल तयार होतील .

टॅग्स :spiritualअध्यात्मिकCrime Newsगुन्हेगारी