शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

येथेचिया कथावार्ता किजेति

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 6:12 AM

माणूस हा कथाप्रिय होता.नातवांना गोष्टी सांगायची जबाबदारी आजी व आजोबावर असायची आटपाट एक नगर होतं, हेच प्रत्येक गोष्टीचं प्रास्ताविक होतं.

पूर्वी विरंगुळा नव्हता पाहाण्यासाठी नाटक,सेनिमा नव्हते,कादंब-या वाचायला शिक्षण नव्हतं.पण कथा ऐकायला कान होते.कथेचे ग्रंथ होते.काही कल्पक गोष्टी सांगण्यात चतुर असायचे एकच गोष्ट रात्रभर सांगणारे माणसं असायचे.कीर्तनकार प्रबोधन करीत असत.महाभारत रामायण,जाताककथा, इसाफनीती, पंचतंत्र याचा ब-यापैकी प्रचार झाला होता.विष्णुशमार्ने कथा सांगूनच तीन मूर्ख राजपुत्रांना शाहाणं केलं होतं. माणसांना शाहाणपण देण्याचं काम कथेने केलं होतं हे मान्य करावं लागेल.

माणूस हा कथाप्रिय होता.नातवांना गोष्टी सांगायची जबाबदारी आजी व आजोबावर असायची आटपाट एक नगर होतं, हेच प्रत्येक गोष्टीचं प्रास्ताविक होतं. कथाकार माणसाच्या रेखाचित्रात नाना प्रकारचे रंग भरत होता.कथा फुलत होती, श्रोते डुलत होती. भूतकाळातल्या कथानकातील दोष टाळायचे असतात गुण पाळायचे असतात. सिद्धांताचा अर्थ कळावा म्हणून कथेतून हितोपदेश केल्या जात होता. कथा प्रत्येकाला असते म्हणून कथा आवडत होती.आपणही स्वत:च्या कथेचे पात्र असतो.समान गुणधमार्चा वेध असतो. बालकथा, नीतीकथा, बोधकथा,भयकथा, परिकथा, रहस्यकथा असा अनंत कथेचा खजाना कथा या दोनच अक्षरात सामावलेला आहे.रामकथेने चारित्र्य दिलं, कृष्णकथेने सामर्थ्ये दिलं,धर्मकथेने सत्य सांगितलं ,कथेने गुणांचा विकास व दोषांचा ºहास होतो. कथेत रमत असतो. भगवंत म्हणतात,‘मच्चित्ता मद्गता प्राणा बोधयंत परस्परकथयंतस्य मांनित्यं तुष्यंतिच रमन्तिच’श्रीचक्रधर हे मराठीतले पहिले कथाकार आहेत.सिद्धांत सुलभ करण्यासाठी त्यांनी अनेक दृष्टांत सांगितले आहेत.सामान्य बुद्धीच्या माणसाला दृष्टांतामुळे सिद्धांत कळतो.कथा सांगण्यातून,वार्ता वर्तनातून आपल्या समोर येते.फक्त कथनात व वर्तमान पत्रात वास्तव असावं लागतं.पुराणातली चुकीची कथा स्वामी दुरुस्त करुन सांगत असतं.आमनदेवाचे डोळे काढले रामदेव देवगिरीचा राजा झाला ही वार्ता स्वामी भक्तांना सांगतात."सावधेया असावे"अशी सूचना करुन भक्तांना सजगतेचा सल्ला देतात.कथा संतुष्ट करणारी असावी.संतुष्ट माणसात सकारात्मक ऊर्जा वाढते.मन रममान होतं.चांगल्या कथा व वार्ता सांगणारा व ऐकणारा आनंदात वावरत असतो.कथा व वार्ता दुधारी असतात.एक गुणावर्धक एक दोषर्धक असते. दौर्बल्य निर्माण करणा-या कथा सांगून हतोत्साही करते ती कथा सांगुनये व ऐकूहीनये.‘रात्री परावर कथा कथिता उजैडेतै विस्मिते मुनीवरे पुसिजे प्रभूतेसामर्थ्यवेधकमहा निजदर्शनाचेसांगे सुवेधपती राजकथा प्रसंगे’स्वामी रात्रभर कथा सांगत असतं.त्यात ऐहिक व पारलौकिकता असायची, कथेत सामर्थ्ये व वेधकता होती.राजकथा म्हणजे कथेतून रहस्य सांगितल्या जात होतं.आजही आपण विज्ञान कथा ऐकतो त्या ज्ञानवर्धक व रहस्य उलगडणा-या असतात.डा.बाबासाहेब म्हणाले एक शाहीरी गाण्यात माज्या दाहा भाषणाची ताकद असते,शिवरायांचं व्यक्तिमत्व शाहीरांनी कथेतूनच लोकांपर्यांत नेलं आहे.रामकथा, कृष्णकथा हाजारो वषार्पासून आम्ही ऐकतो.आजही त्या नित्यनूतन वाटतात.मनाला ताजं करतात.बळ देतात.कथा व्यथा हरण करते.माथा माजबूत करते.उगीचच वायफळ गप्पा मारण्या ऐवजी संसर्गजन्य विषाणू पासूनस्वतंला वाचविण्यासाठी घरात बसून महापुरुषांच्या व ईश्वराच्या कथा वाचने काय वाईट आहे.पांडवांच्या एक वर्ष अज्ञातवासातली कथा कळली तर, काही दिवस आपण घरातच राहाण्याची शक्ती मिळते.बा. भो. शास्त्री