शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

विचारे दृढता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 06:39 IST

- बा.भो. शास्त्री शके ११४१मध्ये स्वामी महाराष्ट्रात आले. इथल्या माणसांचं अंतर्बाह्य निरीक्षण केले. ‘उकिरड्यातून माणूस जन्मतो, यावर माणसाचा विश्वास ...

- बा.भो. शास्त्रीशके ११४१मध्ये स्वामी महाराष्ट्रात आले. इथल्या माणसांचं अंतर्बाह्य निरीक्षण केले. ‘उकिरड्यातून माणूस जन्मतो, यावर माणसाचा विश्वास होता. जनावरांना गोंजारतो व माणसांना अस्पृश्य म्हणतो, असाही पाहिला. स्त्रियांना धर्मापासून वंचित ठेवून प्राण्यांचे बळी देणारा मानव दिसला. अविचारातून बिमारीच्या नावाने खोकलाई, ठसकाई, जाखाई, जोखाई, मरीमाय असे देव निर्माण करणारा माणूस पाहिला. तेव्हा स्वामी म्हणाले, ‘हा अवघा जनु ठकला ठेला असे: याचे ठक फेडिता कवन नसे: तू ठकला ऐसे कुणी न पुसे’ हे बाराव्या शतकातले महाराष्ट्राचे चित्र होते. अंधश्रद्धेच्या गर्तेत समाज सापडला. असत्याला सत्य व अधर्माला समजत होता. मूठभर लोकांनी अनेकांना फसविले, तेही फसले. याचे एकच कारण माणसाजवळ विचार नव्हता. विचाराची आवड नव्हती. विचाराने निवड नव्हती. अज्ञान व मिथ्या ज्ञानाने माणसे भरकटली, अस्थिर झाली. विचार माणसाला स्थिर करतो. विचाराने दृढता येते. निश्चलता येते. शांती क्रांतीने मिळत नाही. ती निश्चलतेने मिळते. हाच सल्ला संत ज्ञानेश्वर महाराज देतात,‘निश्चलत्वाची भावना, जरी नव्हेचि देखै मन तरी शांती केवी अर्जुना, आपु होय.’ म्हणून स्वामींनी प्रथम मराठीत मानवाला विचाराची बैठक दिली व ठकांपासून सांभाळून राहावे, म्हणून ज्ञानाचे डोळे दिले. सफरचंद काय एकाच न्यूटनच्या अंगावर पडले काय? कविट व नारळ पडून अनेकांच्या डोक्याला जखमा झाल्या असतील, पण जमिनीवर पडलेल्या फळाला खेचणारी शक्ती कोणती, ही शंका एकाच्याच मनात आली. कारण विचाराला जिज्ञासेची जोड मिळाली.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक