शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विचारे दृढता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 06:39 IST

- बा.भो. शास्त्री शके ११४१मध्ये स्वामी महाराष्ट्रात आले. इथल्या माणसांचं अंतर्बाह्य निरीक्षण केले. ‘उकिरड्यातून माणूस जन्मतो, यावर माणसाचा विश्वास ...

- बा.भो. शास्त्रीशके ११४१मध्ये स्वामी महाराष्ट्रात आले. इथल्या माणसांचं अंतर्बाह्य निरीक्षण केले. ‘उकिरड्यातून माणूस जन्मतो, यावर माणसाचा विश्वास होता. जनावरांना गोंजारतो व माणसांना अस्पृश्य म्हणतो, असाही पाहिला. स्त्रियांना धर्मापासून वंचित ठेवून प्राण्यांचे बळी देणारा मानव दिसला. अविचारातून बिमारीच्या नावाने खोकलाई, ठसकाई, जाखाई, जोखाई, मरीमाय असे देव निर्माण करणारा माणूस पाहिला. तेव्हा स्वामी म्हणाले, ‘हा अवघा जनु ठकला ठेला असे: याचे ठक फेडिता कवन नसे: तू ठकला ऐसे कुणी न पुसे’ हे बाराव्या शतकातले महाराष्ट्राचे चित्र होते. अंधश्रद्धेच्या गर्तेत समाज सापडला. असत्याला सत्य व अधर्माला समजत होता. मूठभर लोकांनी अनेकांना फसविले, तेही फसले. याचे एकच कारण माणसाजवळ विचार नव्हता. विचाराची आवड नव्हती. विचाराने निवड नव्हती. अज्ञान व मिथ्या ज्ञानाने माणसे भरकटली, अस्थिर झाली. विचार माणसाला स्थिर करतो. विचाराने दृढता येते. निश्चलता येते. शांती क्रांतीने मिळत नाही. ती निश्चलतेने मिळते. हाच सल्ला संत ज्ञानेश्वर महाराज देतात,‘निश्चलत्वाची भावना, जरी नव्हेचि देखै मन तरी शांती केवी अर्जुना, आपु होय.’ म्हणून स्वामींनी प्रथम मराठीत मानवाला विचाराची बैठक दिली व ठकांपासून सांभाळून राहावे, म्हणून ज्ञानाचे डोळे दिले. सफरचंद काय एकाच न्यूटनच्या अंगावर पडले काय? कविट व नारळ पडून अनेकांच्या डोक्याला जखमा झाल्या असतील, पण जमिनीवर पडलेल्या फळाला खेचणारी शक्ती कोणती, ही शंका एकाच्याच मनात आली. कारण विचाराला जिज्ञासेची जोड मिळाली.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक