शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भावना समजून घेतल्यानेच नात्यातील ओलावा टिकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 13:59 IST

आभासी जगतात स्वतःला अडकवून घेत आहे मनुष्य स्वतःच इतरांपासून कायमचे दूर जात आहे.     

- सचिन व्ही. काळे

आज प्रत्येक व्यक्तीचे जीवन फार धकाधकीचे आणि व्यस्त झाले आहे. मोबाईलच्या या युगात व्यक्ती इतका गुंतून गेला आहे की, त्याला मान वर करायला सुद्धा वेळ नाही. इतका तो व्यस्त झाला आहे. या व्यस्ततेमुळे व्यक्ती हळू हळू आपल्या नाजूक अशा भावना कुठे तरी हरवून बसला आहे. येत्या काळात या सर्व गोष्टींमुळे होणारे दुष्परिणाम हळू हळू नाते संबंधावर दिसू लागले आहेत. सततच्या या व्यस्ततेमुळे व्यक्ती उग्र, हिंसक व भावना शून्य होत आहे. आपण काय बोलतो ? काय करतो ? हेच त्याच्या लक्षात येत नाहीए. आपल्या वागण्याचा, बोलण्याचा आपल्या कुटुंबावर खोल असा परिणाम होत आहे. हे त्याच्या लक्षातच घेत नाहीए. मित्रांशी, नातेवाईकांशी प्रत्यक्ष भेटून बोलून जेवढे सुख, आनंद मिळतो. हे त्याच्या लक्षात न येता तो अडकून पडला आहे. ते मेसेज, इमोजी, स्टेट्स, सेल्फी यांसारख्या अभासी विश्वात. या माध्यमातून तो आपल्या भावना व्यक्त करू पाहत आहे. या सर्व गोष्टी म्हणजेच जग, खऱ्या भावना, स्वतःला समजून घेण्याचे व व्यक्त होण्याचे माध्यम, हेच आपले सर्वस्व असे त्याला वाटू लागले आहे.   

खरंच या गोष्टी म्हणजेच भावना, खरे जग का ? पूर्वीच्या काळी या गोष्टी नव्हत्या तरी हे जग चालूच होते ना ? जपल्याच जात होत्या ना एकमेकांच्या भावना ? होतेच ना एकमेकांचे एकमेकांवर प्रेम ? करतच होते ना एकमेकांचा आदर ? मग आज जग इतके जवळ येऊनही, का व्यक्ती आपल्याच माणसांपासून दूर जात आहे ? रोज रोज एकमेकांना मेसेज, इमोजी,फोन करून ही व्यक्ती आज आपल्याच प्रिय म्हणवणाऱ्या व्यक्ती पासून का दूरावलेला दिसतो ? का सोबत असूनही, एकमेकांमध्ये असणारा दुरावा वाढलेला दिसतो ? याचे मुख्य कारण म्हणजे आज प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की, मीच योग्य आहे, मी जे करतो तेच योग्य आहे, माझ्या म्हणवणाऱ्या माणसांना माझ्या भावनाच समजतच नाही, मीच सर्वाना समजून घेतो, मलाच का कुणी समजून घेत नाही ? असल्या प्रश्नांमध्ये तो स्वतः स्वतःला अडकवून घेत आहे आणि स्वतःच इतरांपासून कायमचे दूर जात आहे.    

खरे तर असे प्रश्न जेव्हा पडू लागतात तेव्हा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या हे लक्षात यायला हवे की, त्याचा संबंध त्याच्या सारख्याच भावना प्रधान व्यक्तींशी असतो. त्यांचे ही आपल्या सारखे मन आहे, आपल्या सारख्या इच्छा आहे, आपल्या सारख्या आकांक्षा आहेत, स्वप्नं आहेत, मन आहे. हेच तो विसरून जातो. तसेच समोरच्या व्यक्तीच्या एका साध्या शब्दाने ज्या प्रमाणे त्याचे मन दुखावते. त्याच प्रमाणे आपल्या ही शब्दांनी आपल्या प्रिय व्यक्तींचे मन नकळतपणे दुखावले जात असेल ना ? ज्या प्रमाणे स्वतःला एक आधार हवा असतो. त्याच प्रमाणे आपला ही आधार कुणा आपल्यालाच प्रिय व्यक्तीला हवा असेल ना ? नकळतपणे कधी तरी आपल्या भावना कुणी तरी समजून घ्याव्यात, असे जेव्हा त्याला वाटते. त्याच वेळी आपण ही कुणाच्या भावना नकळतपणे समजून घ्याव्यात असे त्याच्या प्रिय व्यक्तींना वाटतंच असेल ना ? हेही त्याला समजायला हवे. संकटाच्या काळात हवा असणारा धीर, मदत ज्याप्रमाणे त्याला हवी आहे. त्याचप्रमाणे त्याच्या आपल्या प्रिय व्यक्तींना ही तीच मदत, तोच आधार हवा असेल ना ? नुसता भावनिक आधार आपल्यालाच हवा नसून, आपल्या कडून ही कुणाला याच गोष्टींची अपेक्षा आहे. हे प्रत्येक व्यक्तीला लक्षात यायला हवे. फक्त स्वतःचे मन, स्वतःच्या भावना, स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं, दुखः याला कुरवाळत न बसता. आपल्या मनाचा जास्त विचार न करता. समोरच्या व्यक्तीच्या मनाचा, त्याच्या भावनांचा विचार करून जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यास, त्याच्या सर्व इच्छा, आकांक्षा, स्वप्नं, दुखः, मन, भावना यांचा समोरची व्यक्ती न सांगता विचार करेल. हे त्याच्या लक्षात यायला हवे. दूर गेलेली नाती मेसेज, इमोजी, स्टेट्स, सेल्फी यांच्या फंदात न पडता अपोआप जवळ येतील व वाटणारा एकटेपणा कमी होऊन, त्याला काही गमावण्याची भीती निर्माण होणार नाही. त्यासाठी व्यक्तीला स्वतःपेक्षा समोरच्या व्यक्तीला समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच आज नात्यांमध्ये निर्माण होणारी दरी कमी होईल. त्यासाठी व्यक्तीला आपली सतत खाली असलेली मान वर करावी लागेल. मेसेज, इमोजी, स्टेट्स, सेल्फी याच्या मोहजालात न अडकता भावनांच्या सागरात जेव्हा व्यक्ती उतरेल व समोरच्या व्यक्तीच्या मनरुपी खोल समुद्राची खोली शोधण्याचा प्रयत्न करेल तेव्हाच नात्यांमधील ओलावा टिकून राहील व हे जग सुंदर आणि भावनाप्रधान होईल.

( लेखकाचा संपर्क क्रमांक 9881849666 ) 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाAdhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक