शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अशांतस्य कृत्य:सुखं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 4:55 AM

अहंतेत ममता असते ती विस्तारवादी आहे.

- बा.भो. शास्त्रीअहंतेत ममता असते ती विस्तारवादी आहे. विस्तारात अडथळा आला की, अहंता चिडते, अशांती जन्मते म्हणून स्वामी कुठल्याही समस्येच्या मुळापर्यंत जाण्यासाठी विचार देतात. मंदिरात, सत्संगात शांती मिळते हा एक समज आहे. पण देवळांनीच समस्या निर्माण केल्या त्याचं काय? ते पूर्ण सत्य नाही. तो तात्पुरता विसावा असतो. वेदनाशामक औषधीसारखं ते क्षणिक समाधान असतं. कारण हे सगळे उपचार वरचेवर असतात. मूळ बिमारी तशीच असते. औषधीने लक्षणे दिसत नाहीत एवढेच. शिवचरित्रावर चांगले व्याख्यान देणारा वक्ता महाराजांनी ३५० किल्ले ताब्यात घेतले हे न चुकता सांगतो व त्यांनी ते नीट सांभाळले, असेही सांगतो. पण वक्ताच सतत घराची किल्ली विसरतो, त्याचं काय? राजा किल्ला सांभाळतो, हा किल्ली सांभाळत नाही. राजे संयमी होते, विवेकी होते. त्यांच्या विचाराचा संचार मुळापर्यंत होता. संत तुकोबा म्हणतात,‘‘ओलेमूळ भेदी खडकाचे अंगअभ्यासासी सांग कार्यसिद्धी’’दुभंगणाऱ्या पाषाणाचा विचार तुकोबांनी वरवर केला नाही. मुळापर्यंत गेले. मूळ रोगाला असतं, भोगाला असतं, त्यागाला असतं, अशांतीला असतं. आपण साधी माणसं. कार्यकारण भावाचं चिंतन करीत नाही. हेच आपल्या अशांतीचं मुख्य कारण आहे. सुख हे शांतीच्या वेलीला आलेलं मधुर फळ आहे. आपल्याला सुख हवं की शांती? सुख हवं पण ते शांतीशिवाय कसं मिळणार, वेलीशिवाय फूल, फळ कसं मिळणार? ‘अशांतस्य कृत्य:सुखं’ असं गीता ठासून सांगते. जो स्वस्थ असतो तोच मस्त असतो, अस्वस्थ अस्ताव्यस्त होतो, अहंतेच्या आगीत जग होरपळून जात आहे. धर्म, जात, देश, धन, शक्तीचा, कृतीचा, अहंकार हा सर्वत्र व्यापला आहे. शांतीचे रोप लावणारे लावतात, पण ते टिकत नाही. शांती म्हणजे निश्चिंत रहित अवस्था. ताण व काळजी विक्षेपशून्य जीवन.