शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

तुका झालासे कळस...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 20:43 IST

आज फाल्गुन व।। द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज.  महाराजांच्या वैकुंठगमनाचा पर्वकाळ.  म्हणून त्यांचे पुण्यस्मरण.

सतरावे शतक म्हणजे महाराष्टÑातील पुण्यपूर्वच म्हणावे लागते.  शिवाजीराजाने भगवा फडकावून स्वराज्याचे तोरण बांधले.  अनेक शतकाच्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडल्या आणि अध्यात्माच्या क्षेत्रातही दोन उत्तुंग महात्मे याच शतकात जन्मले व सामान्यांच्या उद्धाराचा मार्ग त्यांनी सोपा केला.  यात जगद्गुरू तुकाराम महाराज व समर्थ रामदास हे होत.  आज फाल्गुन व।। द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज.  महाराजांच्या वैकुंठगमनाचा पर्वकाळ.  म्हणून त्यांचे पुण्यस्मरण.

तुकाराम महाराजांचा जन्म देहू गावी झाला.  बोल्होबा व कनकाईच्या पोटी तीन पुत्र होते.  सावजी, तुकाराम व कान्होबा.  घरी शेती, सावकारकी, महाजनकी.  त्यामुळे घर अगदी संपन्न होते.  पण माता-पितरांच्या मृत्यूनंतर व १६२८ व २९ साली दुष्काळ नंतर अतिवृष्टी. त्यामुळे शेती अर्थातच तोट्यात.  घरी असणारा व्यापारही तोट्यात.  त्यात सावजी तीर्थयात्रेला निघून गेला.  घराची सर्व जबाबदारी तुकारामावर आली, मन सैरभैर झाले.

त्या काळी सामान्य समाजाची, बहुजनाची स्थिती अतिशय दयनीय होती.  वर्णवाद तर पराकोटीचा, म्हणूनच क्षत्रिय असूनसुद्धा तुकाराम महाराज स्वत:ला शूद्र म्हणवून घेतात.  कारण ब्राह्मणवर्ग त्यांना शूद्रच मानीत होता म्हणून अभंग करणे, गाणे, कीर्तन करणे या महाराजांच्या कृतीला त्यांच्याकडून विरोध होता व म्हणूनच त्यांचा छळ केला जात होता.  भक्ती, कीर्तन, भजन-पूजन ही फक्त ब्राह्मणांची मक्तेदारी होती.अशा अंधारयुगात तुकाराम महाराजांनी -‘‘बुडती हे जन, न देखवे डोळाम्हणूनी कळवळा, येत असे’’हे ध्यानी घेऊन अतिशय सोप्या भाषेत, व्यवहारातील उदाहरणांनी जनप्रबोधन केले.  भाषा अतिशय फटकळ पण मर्माघाती.  बोध साधा पण भवतारक म्हणूनच आज साडेतीनशे वर्षांनंतरही ‘‘ज्ञानोबा-तुकाराम’’ हा गजर कानी येतो.  ज्ञानेश्वरी, गाथा व भागवत ही वारकºयांची प्रस्थानत्रयी आहे.  हजारो वारकºयांना गाथेतील अभंग मुखोद्गत आहेत.  एवढे अमोल संचित आम्हाला तुकाराम महाराजांनी ठेवले आहे.  म्हणूनच ही कृतज्ञता.सुमारे चार हजार अभंगातून महाराजांनी अध्यात्म, भक्ती याचा मार्ग तर दाखवलाच आहे.  पण रोजच्या व्यवहारातील अनेक गोष्टी  सांगून ‘‘शहाणे करून’’ सोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.।। वाघे उपदेशिला कोल्हा,      सुखे खाऊ द्यावे मला ।।।। तुका म्हणे ऐशा नरा,     मोजू माराव्या पैजारा ।।।। नवसे कन्यापुत्र होती,     मग का कारणे लागे पती।।।। धिक जिणे तो बाईले अधिन,     परलोक मान नाही दोघा ।।।। तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण,     तया त्रिभुवन अवघे खोटे ।।।। वेचुनिया धन उत्तम वेव्हारे,     उदास विचारे वेचकरी ।।असा सोपा पण अतिशय परखड भाषेत उपदेश केला आहे.  तो आजही आम्हाला मार्गदर्शक व लाभदायक आहे.  म्हणूनच हे त्यांचे पुण्यस्मरण.  तुकोबांना सर्व मराठीजनांचे लाख-लाख प्रणाम!- प्रमिला देशमुख(लेखिका या प्राध्यापिका आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक