शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

तुका झालासे कळस...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 20:43 IST

आज फाल्गुन व।। द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज.  महाराजांच्या वैकुंठगमनाचा पर्वकाळ.  म्हणून त्यांचे पुण्यस्मरण.

सतरावे शतक म्हणजे महाराष्टÑातील पुण्यपूर्वच म्हणावे लागते.  शिवाजीराजाने भगवा फडकावून स्वराज्याचे तोरण बांधले.  अनेक शतकाच्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडल्या आणि अध्यात्माच्या क्षेत्रातही दोन उत्तुंग महात्मे याच शतकात जन्मले व सामान्यांच्या उद्धाराचा मार्ग त्यांनी सोपा केला.  यात जगद्गुरू तुकाराम महाराज व समर्थ रामदास हे होत.  आज फाल्गुन व।। द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज.  महाराजांच्या वैकुंठगमनाचा पर्वकाळ.  म्हणून त्यांचे पुण्यस्मरण.

तुकाराम महाराजांचा जन्म देहू गावी झाला.  बोल्होबा व कनकाईच्या पोटी तीन पुत्र होते.  सावजी, तुकाराम व कान्होबा.  घरी शेती, सावकारकी, महाजनकी.  त्यामुळे घर अगदी संपन्न होते.  पण माता-पितरांच्या मृत्यूनंतर व १६२८ व २९ साली दुष्काळ नंतर अतिवृष्टी. त्यामुळे शेती अर्थातच तोट्यात.  घरी असणारा व्यापारही तोट्यात.  त्यात सावजी तीर्थयात्रेला निघून गेला.  घराची सर्व जबाबदारी तुकारामावर आली, मन सैरभैर झाले.

त्या काळी सामान्य समाजाची, बहुजनाची स्थिती अतिशय दयनीय होती.  वर्णवाद तर पराकोटीचा, म्हणूनच क्षत्रिय असूनसुद्धा तुकाराम महाराज स्वत:ला शूद्र म्हणवून घेतात.  कारण ब्राह्मणवर्ग त्यांना शूद्रच मानीत होता म्हणून अभंग करणे, गाणे, कीर्तन करणे या महाराजांच्या कृतीला त्यांच्याकडून विरोध होता व म्हणूनच त्यांचा छळ केला जात होता.  भक्ती, कीर्तन, भजन-पूजन ही फक्त ब्राह्मणांची मक्तेदारी होती.अशा अंधारयुगात तुकाराम महाराजांनी -‘‘बुडती हे जन, न देखवे डोळाम्हणूनी कळवळा, येत असे’’हे ध्यानी घेऊन अतिशय सोप्या भाषेत, व्यवहारातील उदाहरणांनी जनप्रबोधन केले.  भाषा अतिशय फटकळ पण मर्माघाती.  बोध साधा पण भवतारक म्हणूनच आज साडेतीनशे वर्षांनंतरही ‘‘ज्ञानोबा-तुकाराम’’ हा गजर कानी येतो.  ज्ञानेश्वरी, गाथा व भागवत ही वारकºयांची प्रस्थानत्रयी आहे.  हजारो वारकºयांना गाथेतील अभंग मुखोद्गत आहेत.  एवढे अमोल संचित आम्हाला तुकाराम महाराजांनी ठेवले आहे.  म्हणूनच ही कृतज्ञता.सुमारे चार हजार अभंगातून महाराजांनी अध्यात्म, भक्ती याचा मार्ग तर दाखवलाच आहे.  पण रोजच्या व्यवहारातील अनेक गोष्टी  सांगून ‘‘शहाणे करून’’ सोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.।। वाघे उपदेशिला कोल्हा,      सुखे खाऊ द्यावे मला ।।।। तुका म्हणे ऐशा नरा,     मोजू माराव्या पैजारा ।।।। नवसे कन्यापुत्र होती,     मग का कारणे लागे पती।।।। धिक जिणे तो बाईले अधिन,     परलोक मान नाही दोघा ।।।। तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण,     तया त्रिभुवन अवघे खोटे ।।।। वेचुनिया धन उत्तम वेव्हारे,     उदास विचारे वेचकरी ।।असा सोपा पण अतिशय परखड भाषेत उपदेश केला आहे.  तो आजही आम्हाला मार्गदर्शक व लाभदायक आहे.  म्हणूनच हे त्यांचे पुण्यस्मरण.  तुकोबांना सर्व मराठीजनांचे लाख-लाख प्रणाम!- प्रमिला देशमुख(लेखिका या प्राध्यापिका आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक