शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

खरे ज्ञानी भक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:56 IST

देहाभिमानिनि सर्वे दोघा: प्रादुर्भवन्ति

- वामनराव देशपांडेदेहाभिमानिनि सर्वे दोघा: प्रादुर्भवन्तिमर्त्य शरीराशी आणि भोवतीच्या जड मर्त्य सृष्टीशी जिवाचा नित्य संबंध जोडला गेल्यामुळे शरीर जाणिवेने आयुष्य जगण्याची माणसाला सवय जडल्यामुळे जड पदार्थांचा, नित्याचे आयुष्य जगताना आश्रय घेतल्यामुळे मानवी मर्त्य आयुष्यात तºहेतºहेचे दोष निर्माण होतात. तेच असह्य दु:खाचे मूळ कारण आहे. म्हणून साधकांनी देहाभिमाने एक क्षणसुद्धा जगू नये. परमात्मतत्त्व जाणून घेत, परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी आध्यात्मसाधना आहे, याचे भान येणे आवश्यक आहे. इष्ट वा अनिष्ट गोष्टींचा परिणाम चित्तावर होणार नाही, याची काळजी साधकाने प्राणपणाने घेतली, तरच परमात्मतत्त्व जाणून घेणे काहीसे सोपे जाईल. त्यासाठी साधकाने नेमके काय करावे, यावर भाष्य करताना भगवंत म्हणतात,मयि चानन्ययोगेन भक्तीरव्यभिचारिणी।विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि।।‘पार्था, या संसारसागरात देहबुद्धीने जगणारे असंख्य जीव अक्षरश: बुडून मरतात आणि पुन्हा नव्या योनीत जन्म घेतात. या जन्म-मृत्यूच्या गरागरा फिरणाऱ्या चक्रावर ते अनंतकाळ फिरत राहतात, परंतु जे मजसी अनन्य होऊन केवळ माझीच भक्ती करतात, माझ्या व्यतिरिक्त त्या माझ्या भक्तांना कुणाकडूनही काहीही मिळविण्याची इच्छासुद्धा नसते. ज्यांना मानवी मतमतांतरांचा गोंधळ ऐकवत नसल्यामुळे ज्यांना एकांत प्रिय वाटतो, किंबहुना ज्यांना एकांतात बसून माझी उपासना करावी असे वाटते, तो त्या भक्तांचा मूळ स्वभावच असतो. ज्यांना जनसमुदायात रमणे अजिबात प्रिय नसते, किंबहुना तत्त्वज्ञानभरल्या आध्यात्म विचारातच रममाण व्हायला अधिक आनंद वाटतो, तत्त्वज्ञानाच्या साहाय्याने अक्षरब्रह्माची ज्यांनी प्राप्ती करून घ्यावीशी वाटते, तेचखरे ज्ञानी भक्त असतात. बाकी सर्व अज्ञानच आहे रे, पार्था...’