शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खरे ज्ञानी भक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:56 IST

देहाभिमानिनि सर्वे दोघा: प्रादुर्भवन्ति

- वामनराव देशपांडेदेहाभिमानिनि सर्वे दोघा: प्रादुर्भवन्तिमर्त्य शरीराशी आणि भोवतीच्या जड मर्त्य सृष्टीशी जिवाचा नित्य संबंध जोडला गेल्यामुळे शरीर जाणिवेने आयुष्य जगण्याची माणसाला सवय जडल्यामुळे जड पदार्थांचा, नित्याचे आयुष्य जगताना आश्रय घेतल्यामुळे मानवी मर्त्य आयुष्यात तºहेतºहेचे दोष निर्माण होतात. तेच असह्य दु:खाचे मूळ कारण आहे. म्हणून साधकांनी देहाभिमाने एक क्षणसुद्धा जगू नये. परमात्मतत्त्व जाणून घेत, परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी आध्यात्मसाधना आहे, याचे भान येणे आवश्यक आहे. इष्ट वा अनिष्ट गोष्टींचा परिणाम चित्तावर होणार नाही, याची काळजी साधकाने प्राणपणाने घेतली, तरच परमात्मतत्त्व जाणून घेणे काहीसे सोपे जाईल. त्यासाठी साधकाने नेमके काय करावे, यावर भाष्य करताना भगवंत म्हणतात,मयि चानन्ययोगेन भक्तीरव्यभिचारिणी।विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि।।‘पार्था, या संसारसागरात देहबुद्धीने जगणारे असंख्य जीव अक्षरश: बुडून मरतात आणि पुन्हा नव्या योनीत जन्म घेतात. या जन्म-मृत्यूच्या गरागरा फिरणाऱ्या चक्रावर ते अनंतकाळ फिरत राहतात, परंतु जे मजसी अनन्य होऊन केवळ माझीच भक्ती करतात, माझ्या व्यतिरिक्त त्या माझ्या भक्तांना कुणाकडूनही काहीही मिळविण्याची इच्छासुद्धा नसते. ज्यांना मानवी मतमतांतरांचा गोंधळ ऐकवत नसल्यामुळे ज्यांना एकांत प्रिय वाटतो, किंबहुना ज्यांना एकांतात बसून माझी उपासना करावी असे वाटते, तो त्या भक्तांचा मूळ स्वभावच असतो. ज्यांना जनसमुदायात रमणे अजिबात प्रिय नसते, किंबहुना तत्त्वज्ञानभरल्या आध्यात्म विचारातच रममाण व्हायला अधिक आनंद वाटतो, तत्त्वज्ञानाच्या साहाय्याने अक्षरब्रह्माची ज्यांनी प्राप्ती करून घ्यावीशी वाटते, तेचखरे ज्ञानी भक्त असतात. बाकी सर्व अज्ञानच आहे रे, पार्था...’