शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

खरे ज्ञानी भक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:56 IST

देहाभिमानिनि सर्वे दोघा: प्रादुर्भवन्ति

- वामनराव देशपांडेदेहाभिमानिनि सर्वे दोघा: प्रादुर्भवन्तिमर्त्य शरीराशी आणि भोवतीच्या जड मर्त्य सृष्टीशी जिवाचा नित्य संबंध जोडला गेल्यामुळे शरीर जाणिवेने आयुष्य जगण्याची माणसाला सवय जडल्यामुळे जड पदार्थांचा, नित्याचे आयुष्य जगताना आश्रय घेतल्यामुळे मानवी मर्त्य आयुष्यात तºहेतºहेचे दोष निर्माण होतात. तेच असह्य दु:खाचे मूळ कारण आहे. म्हणून साधकांनी देहाभिमाने एक क्षणसुद्धा जगू नये. परमात्मतत्त्व जाणून घेत, परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी आध्यात्मसाधना आहे, याचे भान येणे आवश्यक आहे. इष्ट वा अनिष्ट गोष्टींचा परिणाम चित्तावर होणार नाही, याची काळजी साधकाने प्राणपणाने घेतली, तरच परमात्मतत्त्व जाणून घेणे काहीसे सोपे जाईल. त्यासाठी साधकाने नेमके काय करावे, यावर भाष्य करताना भगवंत म्हणतात,मयि चानन्ययोगेन भक्तीरव्यभिचारिणी।विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि।।‘पार्था, या संसारसागरात देहबुद्धीने जगणारे असंख्य जीव अक्षरश: बुडून मरतात आणि पुन्हा नव्या योनीत जन्म घेतात. या जन्म-मृत्यूच्या गरागरा फिरणाऱ्या चक्रावर ते अनंतकाळ फिरत राहतात, परंतु जे मजसी अनन्य होऊन केवळ माझीच भक्ती करतात, माझ्या व्यतिरिक्त त्या माझ्या भक्तांना कुणाकडूनही काहीही मिळविण्याची इच्छासुद्धा नसते. ज्यांना मानवी मतमतांतरांचा गोंधळ ऐकवत नसल्यामुळे ज्यांना एकांत प्रिय वाटतो, किंबहुना ज्यांना एकांतात बसून माझी उपासना करावी असे वाटते, तो त्या भक्तांचा मूळ स्वभावच असतो. ज्यांना जनसमुदायात रमणे अजिबात प्रिय नसते, किंबहुना तत्त्वज्ञानभरल्या आध्यात्म विचारातच रममाण व्हायला अधिक आनंद वाटतो, तत्त्वज्ञानाच्या साहाय्याने अक्षरब्रह्माची ज्यांनी प्राप्ती करून घ्यावीशी वाटते, तेचखरे ज्ञानी भक्त असतात. बाकी सर्व अज्ञानच आहे रे, पार्था...’