शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

खरे ज्ञानी भक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:56 IST

देहाभिमानिनि सर्वे दोघा: प्रादुर्भवन्ति

- वामनराव देशपांडेदेहाभिमानिनि सर्वे दोघा: प्रादुर्भवन्तिमर्त्य शरीराशी आणि भोवतीच्या जड मर्त्य सृष्टीशी जिवाचा नित्य संबंध जोडला गेल्यामुळे शरीर जाणिवेने आयुष्य जगण्याची माणसाला सवय जडल्यामुळे जड पदार्थांचा, नित्याचे आयुष्य जगताना आश्रय घेतल्यामुळे मानवी मर्त्य आयुष्यात तºहेतºहेचे दोष निर्माण होतात. तेच असह्य दु:खाचे मूळ कारण आहे. म्हणून साधकांनी देहाभिमाने एक क्षणसुद्धा जगू नये. परमात्मतत्त्व जाणून घेत, परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी आध्यात्मसाधना आहे, याचे भान येणे आवश्यक आहे. इष्ट वा अनिष्ट गोष्टींचा परिणाम चित्तावर होणार नाही, याची काळजी साधकाने प्राणपणाने घेतली, तरच परमात्मतत्त्व जाणून घेणे काहीसे सोपे जाईल. त्यासाठी साधकाने नेमके काय करावे, यावर भाष्य करताना भगवंत म्हणतात,मयि चानन्ययोगेन भक्तीरव्यभिचारिणी।विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि।।‘पार्था, या संसारसागरात देहबुद्धीने जगणारे असंख्य जीव अक्षरश: बुडून मरतात आणि पुन्हा नव्या योनीत जन्म घेतात. या जन्म-मृत्यूच्या गरागरा फिरणाऱ्या चक्रावर ते अनंतकाळ फिरत राहतात, परंतु जे मजसी अनन्य होऊन केवळ माझीच भक्ती करतात, माझ्या व्यतिरिक्त त्या माझ्या भक्तांना कुणाकडूनही काहीही मिळविण्याची इच्छासुद्धा नसते. ज्यांना मानवी मतमतांतरांचा गोंधळ ऐकवत नसल्यामुळे ज्यांना एकांत प्रिय वाटतो, किंबहुना ज्यांना एकांतात बसून माझी उपासना करावी असे वाटते, तो त्या भक्तांचा मूळ स्वभावच असतो. ज्यांना जनसमुदायात रमणे अजिबात प्रिय नसते, किंबहुना तत्त्वज्ञानभरल्या आध्यात्म विचारातच रममाण व्हायला अधिक आनंद वाटतो, तत्त्वज्ञानाच्या साहाय्याने अक्षरब्रह्माची ज्यांनी प्राप्ती करून घ्यावीशी वाटते, तेचखरे ज्ञानी भक्त असतात. बाकी सर्व अज्ञानच आहे रे, पार्था...’