शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

"आज फिर जिने कि तमन्ना है !    

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 21:38 IST

मित्र अव्दैतचा फोन आला, सर तुम्हाला मला अर्जेंट भेटायचे आहे. भेटीत त्याने त्याच्या मित्राविषयी सांगण्यास सुरुवात केली. सर माझा मित्र अविनाश खूप खचलाय, निराशेने त्याला घेरलंय , वैफल्यग्रस्त अवस्थेत खूप दारू पितोय, कामावर जाने बंद केले आहे.

-डॉ दत्ता कोहिनकर 

             मित्र अव्दैतचा फोन आला, सर तुम्हाला मला अर्जेंट भेटायचे आहे. भेटीत त्याने त्याच्या मित्राविषयी सांगण्यास सुरुवात केली. सर माझा मित्र अविनाश खूप खचलाय, निराशेने त्याला घेरलंय , वैफल्यग्रस्त अवस्थेत खूप दारू पितोय, कामावर जाने बंद केले आहे. व्यवस्थापन व संघटनेने खुपदा समजावलं, पण जगायचच नाही म्हणतोय! स्वत:च्या पत्नीविषयी  खूपच गैरसमज व संशयाचे भूत त्याच्या मानगुटीवर बसले आहे, एकदा तर  त्याने आत्महत्यतेचा  देखील  प्रयेत्न्न  केला होता, सर त्याला लहान मुलं आहेत.

           त्याला यातून बाहेर काढण्यासाठी आपली मदत हवी आहे. अव्दैताच्या या मित्राला अविनाशला कुटुंबासह भेटायला बोलावले व समजावल्यावर  अविनाशला दहा दिवसीय विपश्यनेच्या शिबिराला बसवले.  त्याचे शिबीर यशस्वीरित्या पूर्ण झाले. विपश्यनेच्या दैनदिन सरावानंतर मन सबळ व निर्मल होत गेले. अविनाश नैराश्यातून बाहेर पडला, कामावर रुजू झाला. दारू बंद झाली. संशयाचे भूत मानगुटीवरून उतरले, स्वत:ला व इतरांना समजून घेण्याची मनोवृत्ती वाढली. आज सुखाने संसार चाललाय त्याचा.

        अशीच एक घटना - एक साधिका मला म्हणाली  " सर माझ्या मैत्रिणीला मी शिबिरासाठी आणले आहे. डॉ. शर्मिला, प्रेमभंग झालाय तिचा. खूप मानाने खचलिय. नैराश्य, व्याकुळता , मानसिक अस्वस्थेमुळे एकदा तर तिने झोपेच्या खूप गोळ्या खाल्या होत्या . तिला थोडी प्रेरणा व सहानुभूती देऊन मदत करावी. त्याप्रमाणे डॉ. शर्मिलाशी बोलणी केली. संवादातून " दुनिया मे इतना गम है - मेरा गम कितना कम है " हे तिला - उमगले शर्मिलाने विपश्यना शिबीर पूर्ण केले. आज ती खूप प्रसन्न आणि आनंदी असते. स्वत:ची वैधकिय प्रक्टिस तिने सुरु केलीय.  दैनंदिन ध्यान करत असते.

           मित्रांनो अनेक प्रकारची दु:खी कष्टी लोक विपश्यना ध्यान केंद्रावर (मनाच्या व्यायामशाळेत ) कोमजलेले दु:खी - खिन्न चेहरे घेऊन येतात व शिबीर संपल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर  प्रसन्नता - आनंद बघण्यासारखा असतो. अपयशाने - करीयरच्या चिंतेने , घटस्फोट, व्यसन, न्यूनगंड, भित्रा स्वभाव , आत्मविश्वासाचा अभाव, मानसिक व शारीरिक आजार, रागिंग , छळ , आर्थिक कमकुवतपणा, बेरोजगारी अशा अनेक कारणामुळे दिवसेंदिवस लोक आत्महत्येकडे वळत आहेत. याला प्रमुख कारण मनाची दुर्बलता हे आहे. २०११ मध्ये भारतात  १ लाख ३५,५८५ जणांनी आत्महत्या केल्या. २०१० मध्ये 

            महाराष्ट्रात ६६ विध्यार्थ्यानी आत्महत्या केल्या आहेत. यावर लहान मुलांनसाठी आनापान  ध्यान व १८ वर्षावरील व्यक्तीसाठी " विपश्यना शिबीर" हे उत्तम रामबाण औषध आहे. मनाची सबलता व निर्मलता वाढवून शारीरिक , मानसिक व आध्यात्मिक  प्रगती साधणारे हे विपश्यना ध्यान साधना  २५०० वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी शोधून काढली. पु. आचार्य सत्यनारायण गोयंकाजींच्या व्हीडीओ , ओडीओ  च्या माध्यमातून हे ध्यान शिकवले जाते. राज्य सरकारने या साधनेला १४ दिवसांची परावर्तीत रजा मंजूर केली आहे. पुण्यात स्वारगेट व आळंदी जवळ मरकळ या गावी असलेल्या विपश्यना केंद्रावर हि शिबिरे विनामूल्य घेतली जातात.

           जुन्या साधकांच्या दानावर सर्व काम चालते. दोन्ही केंद्रावर दरमहा ३०० लोक प्रतीक्षा यादीवर असतात .मित्रांनो सारा संसार मानवी मनाचा खेळ आहे. मन हे प्रमुख आहे. हजार युद्ध जिंकण्यापेक्षा मनाचं एक युद्ध जिंकणारा योद्धा सर्वश्रेष्ठ  असतो. म्हणतात ना - "मन करा से प्रसन्न - सर्व सिद्धीचे कारण" अशा या खचलेल्या -  निराश - वैफल्यग्रस्त मनाला सबळ व निर्मल करून आनंदाने जीवन जगण्यासाठी एकदा का होईना या मनाच्या व्यायामशाळेत जा व जाता - जाता आपल्या मनाला हसतपणे सांगा ,

" आ चल मैं तुझे मैं लेके चलू ,

एक ऐसे गगन के तले ,

जहा गम भी ना हो - आसू भी ना हो ,

बस प्यार हि - प्यार पले

टॅग्स :Puneपुणेspiritualअध्यात्मिक