शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आत्मबळ भक्कम त्यांना उत्तम मनोबळ लाभते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 21:26 IST

आपल्या परंपरेत मानवप्राणी भौतिक रसायन द्रव्यांचा गोळा मानलेला नाही. ते त्याला पंचमहाभूतांचा समूह समजतात. ही पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप(पाणी), तेज (अग्नी), वायू आणि आकाश ही पाच मूलतत्त्वे.

- डॉ. विजय जंगम (स्वामी)

आपल्या परंपरेत मानवप्राणी भौतिक रसायन द्रव्यांचा गोळा मानलेला नाही. ते त्याला पंचमहाभूतांचा समूह समजतात. ही पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप(पाणी), तेज (अग्नी), वायू आणि आकाश ही पाच मूलतत्त्वे. त्यांच्याशी मन, बुद्धी, चेतनांचा संबंध येऊन सचेतन मानव बनतो. कारण पाच मूलतत्त्वे, मन-बुद्धी-अंत:करण या आठांनी तो बनतो, असा पूर्वजांचा दावा आहे. पाहा प्राणायमाची मुख्य अंगही आठ आणि मानवी शरीर चालविणाऱ्या प्रेरणाही आठ! मुख्य दिशा आणि उपदिशा मिळूनही आठच होतात. ऊर्ध्व आणि अधर या उपदिशा या अंगाबाहेर-मस्तकावर आणि पायाखाली. बाकीच्या अंगाभोवती असतात. म्हणून त्यांनाच मोजणीत मान मिळाला. प्राणवायू हा आपल्या पूर्वजांच्या मते विश्वव्यापी चेतनाशक्ती होय. त्यांच्या मते प्राण ही अतिंद्रिय शक्ती आहे. वेदांमध्ये प्राणशक्तीचे महत्त्व आहे. अथर्व वेदातप्राणांना मूळ चेतना, विराट, संप्रेरक म्हटलेले आहे. प्राण हाच सूर्य-चंद्र आणि प्रजापतींसह सर्व भौतिक अस्तित्वांचा संचालक आहे, असेही म्हटलेय. आणखी एक मंत्र सांगतो की, प्राण हे वीर्य (तेज, अग्नीरूप), उत्साह आणि बल देणारे आहेत. प्राण अग्नीयुक्त असल्याने दीप्तिमान आहेत. चराचर विश्वजीवन, दिव्यत्वाचे माहेर आहेत. शतपथ ब्राह्मणाने सूर्यालाच ‘प्राण’ ही संज्ञा दिलीय, तो सहस्त्रावधी किरणधारी, कोट्यवधी जिवांना उत्पन्न करून आपल्या कार्यशक्तीने त्यांचे योगक्षेत्र चालविणारा आहे-असे सांगितलेय. बृहदारक उपनिषदाप्रमाणे - ‘प्राण ही बल, जीवन, अमृतमय जीवनवस्तू आहे. प्राण विश्वसम्राट आहे!’ सूर्यापासून ग्रह, उपग्रह, ग्रहांवरील चलाचल जीवसृष्टी, वायू, चुंबकीय लहरी उत्पन्न झाल्या. वायू घनीभूत होता-होता द्रवरूप झाले. ते जीवनदायी जल आणि ज्वालामुखीतले धातूरस. घनीभूत झाले ते पर्वत, पहाड. यांच्या संयोगातून प्राणचेतनेने वनस्पतींची सृष्टी केली. माणसासह प्राणी, दृश्य आणि साध्या डोळ्यांना दिसायला कठीण अशी जीवजंतूसृष्टी त्यातून उत्पन्न झाली. गुरुत्वाकर्षण, विद्युत, मरुत्, प्रकाश, ध्वनी या ऊर्जा झाल्या. चुंबकीय शक्तिंपैकी विद्युतचुंबकीय शक्तीलाच पूर्वज मरुत् शक्ती म्हणत की काय, हा संशोधनाचा विषय आहे. प्राण हा आयुर्दायी, आयुर्वधक असल्याने प्राण जाणे यातूनच मरण येण्याची घटना घडते. प्राणांमुळे शरीरबळ, आत्मबळ, मनोबळ, बुद्धिबळ मिळते. ज्यांचे आत्मबळ भक्कम त्यांना उत्तम मनोबळ लाभते. जोडीला उत्तम शरीरबळ असेल, तर आरोग्य चांगले राहते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक