शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

मनाच्या ताकदीसाठी नामस्मरण करा : ह.भ.प. बाबामहाराज सातारकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 12:18 IST

मन दुबळे झाले तर माणूस खचून जातो.

मन हे देखील एक इंद्रिय आहे. मन आणि इंद्रियांचा संगम होतो तेव्हा एकरुपता प्राप्त होते आणि इंद्रियांची एकाग्रता होणे म्हणजे तप. जेव्हा मन आणि इंद्रियांची सांगड घातली जाते तेव्हा कृती घडते. यातील एकाने जरी आपले काम चोख केले नाही, तर कृतीमध्ये विसंगती होते. परंतु मन दुबळे झाले तर माणूस खचून जातो. म्हणून मनाची ताकद वाढविण्यासाठी नामस्मरण महत्त्वाचे आहे, असे मत प्रवचनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांनी व्यक्त केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मास सोहळ्यानिमित्त सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या हरिपाठावर ते निरूपण करीत आहेत. हभप बाबामहाराज सातारकर म्हणाले, मन आणि इंद्रियांची सांगड घातली जाते तेव्हा तप सुरू होते. परंतु तपामध्येदेखील व्यत्यय असतो. तप करीत असताना मनात अहंकार आणू नये, अन्यथा तुम्ही केलेला परमार्थ सफल होणार नाही. जर अहंकारापासून दूर राहायचे असेल तर हरिनाम घ्या. एकदा नामस्मरणाला सुरुवात केल्यानंतर निष्ठेने पांडुरंगाचे रुप डोळ्यांसमोर आणावे. तुमच्याकडे निष्ठा असेल तर ही गोष्ट नक्की साध्य होते. इतकी वर्षे झाले आज वृद्धापकाळातदेखील तितक्याच ताकदीने मी भजन करतो आहे. त्याचे कारण नित्य नामस्मरण हेच आहे. हरिपाठात देखील नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. हरिपाठ हा सोपा नाही, यामध्ये सर्व तत्त्वज्ञानाचे सार आहे. परंतु लोकांना हे तत्त्वज्ञान कळावे म्हणून तो सोप्या भाषेत मांडला आहे. 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकBaba Maharaj Satarkarबाबा महाराज सातारकर