शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

मनाच्या ताकदीसाठी नामस्मरण करा : ह.भ.प. बाबामहाराज सातारकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 12:18 IST

मन दुबळे झाले तर माणूस खचून जातो.

मन हे देखील एक इंद्रिय आहे. मन आणि इंद्रियांचा संगम होतो तेव्हा एकरुपता प्राप्त होते आणि इंद्रियांची एकाग्रता होणे म्हणजे तप. जेव्हा मन आणि इंद्रियांची सांगड घातली जाते तेव्हा कृती घडते. यातील एकाने जरी आपले काम चोख केले नाही, तर कृतीमध्ये विसंगती होते. परंतु मन दुबळे झाले तर माणूस खचून जातो. म्हणून मनाची ताकद वाढविण्यासाठी नामस्मरण महत्त्वाचे आहे, असे मत प्रवचनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांनी व्यक्त केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मास सोहळ्यानिमित्त सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या हरिपाठावर ते निरूपण करीत आहेत. हभप बाबामहाराज सातारकर म्हणाले, मन आणि इंद्रियांची सांगड घातली जाते तेव्हा तप सुरू होते. परंतु तपामध्येदेखील व्यत्यय असतो. तप करीत असताना मनात अहंकार आणू नये, अन्यथा तुम्ही केलेला परमार्थ सफल होणार नाही. जर अहंकारापासून दूर राहायचे असेल तर हरिनाम घ्या. एकदा नामस्मरणाला सुरुवात केल्यानंतर निष्ठेने पांडुरंगाचे रुप डोळ्यांसमोर आणावे. तुमच्याकडे निष्ठा असेल तर ही गोष्ट नक्की साध्य होते. इतकी वर्षे झाले आज वृद्धापकाळातदेखील तितक्याच ताकदीने मी भजन करतो आहे. त्याचे कारण नित्य नामस्मरण हेच आहे. हरिपाठात देखील नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. हरिपाठ हा सोपा नाही, यामध्ये सर्व तत्त्वज्ञानाचे सार आहे. परंतु लोकांना हे तत्त्वज्ञान कळावे म्हणून तो सोप्या भाषेत मांडला आहे. 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकBaba Maharaj Satarkarबाबा महाराज सातारकर