शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
3
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
4
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
5
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
6
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
7
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
8
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
9
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
10
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
11
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
12
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
13
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
14
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
15
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
16
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
17
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

मनाच्या ताकदीसाठी नामस्मरण करा : ह.भ.प. बाबामहाराज सातारकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 12:18 IST

मन दुबळे झाले तर माणूस खचून जातो.

मन हे देखील एक इंद्रिय आहे. मन आणि इंद्रियांचा संगम होतो तेव्हा एकरुपता प्राप्त होते आणि इंद्रियांची एकाग्रता होणे म्हणजे तप. जेव्हा मन आणि इंद्रियांची सांगड घातली जाते तेव्हा कृती घडते. यातील एकाने जरी आपले काम चोख केले नाही, तर कृतीमध्ये विसंगती होते. परंतु मन दुबळे झाले तर माणूस खचून जातो. म्हणून मनाची ताकद वाढविण्यासाठी नामस्मरण महत्त्वाचे आहे, असे मत प्रवचनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांनी व्यक्त केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मास सोहळ्यानिमित्त सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या हरिपाठावर ते निरूपण करीत आहेत. हभप बाबामहाराज सातारकर म्हणाले, मन आणि इंद्रियांची सांगड घातली जाते तेव्हा तप सुरू होते. परंतु तपामध्येदेखील व्यत्यय असतो. तप करीत असताना मनात अहंकार आणू नये, अन्यथा तुम्ही केलेला परमार्थ सफल होणार नाही. जर अहंकारापासून दूर राहायचे असेल तर हरिनाम घ्या. एकदा नामस्मरणाला सुरुवात केल्यानंतर निष्ठेने पांडुरंगाचे रुप डोळ्यांसमोर आणावे. तुमच्याकडे निष्ठा असेल तर ही गोष्ट नक्की साध्य होते. इतकी वर्षे झाले आज वृद्धापकाळातदेखील तितक्याच ताकदीने मी भजन करतो आहे. त्याचे कारण नित्य नामस्मरण हेच आहे. हरिपाठात देखील नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. हरिपाठ हा सोपा नाही, यामध्ये सर्व तत्त्वज्ञानाचे सार आहे. परंतु लोकांना हे तत्त्वज्ञान कळावे म्हणून तो सोप्या भाषेत मांडला आहे. 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकBaba Maharaj Satarkarबाबा महाराज सातारकर