शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

अध्यात्म - निष्काम बुद्धी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 7:01 AM

भगवंतांनी आपले अतिभव्य विश्वरूप दर्शन आपल्या अत्यंत लाडक्या परमभक्ताला भक्तश्रेष्ठ अर्जुनाला घडविले तेव्हा ते परमेश्वरी दिव्य स्वरूप पाहून अर्जुन आश्चर्यमुग्ध झाला.

भगवंतांनी आपले अतिभव्य विश्वरूप दर्शन आपल्या अत्यंत लाडक्या परमभक्ताला भक्तश्रेष्ठ अर्जुनाला घडविले तेव्हा ते परमेश्वरी दिव्य स्वरूप पाहून अर्जुन आश्चर्यमुग्ध झाला. परंतु ते ब्रह्मांडव्यापी स्वरूप त्याला सहन होईना, तो भयकंपित झाला तेव्हा स्वत: भगवंत अर्जुनाला म्हणाले की,मा ते व्यथा माच विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीहृदमेदम्।व्यपेतभी: प्रीतमना: पुनरत्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य।।पार्था, हे माझे आक्राळविक्राळ रूप पाहून तू भेदरून गेला आहेस, हे माझ्या पूर्ण लक्षात आले आहे, परंतु तू घाबरू नकोस, व्यथितसुद्धा होऊ नकोस. तुझ्यातला मूढभाव जो या क्षणी जागृत झाला आहे त्याला तू प्रयत्नपूर्वक बाजूला सार. मी भगवंत तुझा रक्षणकर्ता आहे. तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे तू लक्षात ठेवून तू निर्भय हो, नि:शंक हो. हे माझे दिव्य चतुर्भुज रूप पाहून घे. प्रसन्नपणे माझे हे भगवंत स्वरूप मनसोक्तपणे अनुभवून घे. ही अप्रतिम संधी तुला साधनेच्या बळावर प्राप्त झाली आहे. ती तू पुन्हा पुन्हा अनुभवून घे. त्यातून तुला आत्यंतिक महत्त्वाचे ज्ञान आणि जाणीव प्राप्त होणार आहे. मानवी योनीतला तू एकमेव माझा परमभक्त आहेस. म्हणून तर हे अत्यंत दुर्मीळ विश्वरूपदर्शन तुला अत्यंत भाग्याने प्राप्त झाले आहे. हे भाग्यही इतक्या सहजासहजी प्राप्त झाले नव्हते. त्यासाठी आवश्यक असलेल्या खडतर कसोट्या अर्जुनाने पार केलेल्या होत्या. भगवान श्रीकृष्ण आपल्या परमभक्तावर अत्यंत प्रसन्न झाले होते म्हणून तर भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाची विश्वरूप दर्शनाची इच्छा पूर्ण केली होती. अर्जुनाला भगवंतांचे चतुर्भुज दर्शन झाले ते केवळ भगवंतांवरील अतूट भक्तीमुळेच. प्रापंचिक वृत्तीला पूर्णपणे छेद केल्यावर, ‘हवे-नको’चा खेळ संपल्यावर, निष्काम बुद्धीने कर्म करण्याची प्रवृत्ती वाढल्यावर, भक्तीमयी आयुष्याची खरी सुरुवात होते. जीवनाचे खरे सार यातच आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक