शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

स्वत्वाच्या शोधाने आत्मप्रकाशाची जाणीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 09:06 IST

अज्ञानाचा संपूर्ण नायनाट करणारी एखादी अमोघ शक्ती प्राप्त होते. आपणाला आपल्यात बदल झालेले जाणवतात. स्वत:त परिवर्तन झाले, स्वत्वाचा शोध लागला म्हणजे आत्मप्रकाशाची जाणीव होते

अज्ञानाचा संपूर्ण नायनाट करणारी एखादी अमोघ शक्ती प्राप्त होते. आपणाला आपल्यात बदल झालेले जाणवतात. स्वत:त परिवर्तन झाले, स्वत्वाचा शोध लागला म्हणजे आत्मप्रकाशाची जाणीव होते. माणसे नेहमी दुसऱ्याचा विचार करतात, स्वत:मध्ये कधी डोकून बघत नाहीत. त्याची त्यांना कल्पनासुद्धा येत नाही. स्वत:ची जाणीव झाल्याशिवाय ईश्वराची वाट सापडणार नाही. ईशतत्त्व प्रथम स्वत:मध्ये यावे, कारण जे स्वत:त आहे तेच ईशतत्त्वात आहे. फक्त जाणीव होणे महत्त्वाचे आहे. कारण ‘स्व’ची आत्मानुभूती येणे म्हणजे ईशतत्त्वाची जाणी होणे होय. ज्यांनी स्वत:ला ओळखले ते ईश्वराला ओळखू शकतात.

आपल्यामध्ये अनंत शक्ती निवास करतात. त्या शक्ती क्रियान्वित करव्या लागतात. योगी आपल्या कुंडलीद्वारे आतल्या शक्तींची जाणीव करून देतात. आतल्या शक्ती जागृत केल्यास ब्रह्मांडात फिरता येते. एका जागेवर बसून ब्रह्मांडाला पाहता येते. पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते. ‘स्व’ला विकसित केल्यास याची प्रचिती येते. मूलाधार चक्रापासून सहस्त्राकार चक्रापर्यंत कुंडलीचा प्रवास म्हणजे जागृती होय. या कुंडलिनी शक्ती तत्त्वाच्या पायऱ्या विकसित करीत चालते. ‘स्व’त्वाची क्रियात्मक शक्ती विकसित झाल्यास आत्मानंदाची पहाट उजाडते. त्या पहाटेच्या अमृतरूपी किरणात न्हाता येते, मग आत्मशक्तींचा प्रत्यय येतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयांचा उलगडा होतो. जल, पृथ्वी, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्त्वाशी समरसता साधता येते.

जीवनाच्या वाटेवरचा प्रवास आल्हाददायक होतो. स्वत्व गुणांची वृद्धी होते. सात्त्विकतेचा पान्हा येतो. आत्मज्ञानरूपी सूर्याचा प्रकाश पडतो. त्या प्रकाशात मनाची गती शांत राहाते. मनाचा कोवळेपणा नाहीसा होऊन, ऊर्जात्मक स्पंदने स्थिरता प्राप्त करून घेतात. आत्मानंदाच्या कृपावलयात मानवी जीवनाचे अंतिम सत्य सापडते. जीवनाचा मार्ग सुखकर करावासा वाटत असेल तर स्वत्वाला ओळखा. ‘स्व’तत्त्व हेच संजीवन तत्त्व आहे. त्याची जाणीव ठेवा.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक