शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

स्वत्वाच्या शोधाने आत्मप्रकाशाची जाणीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 09:06 IST

अज्ञानाचा संपूर्ण नायनाट करणारी एखादी अमोघ शक्ती प्राप्त होते. आपणाला आपल्यात बदल झालेले जाणवतात. स्वत:त परिवर्तन झाले, स्वत्वाचा शोध लागला म्हणजे आत्मप्रकाशाची जाणीव होते

अज्ञानाचा संपूर्ण नायनाट करणारी एखादी अमोघ शक्ती प्राप्त होते. आपणाला आपल्यात बदल झालेले जाणवतात. स्वत:त परिवर्तन झाले, स्वत्वाचा शोध लागला म्हणजे आत्मप्रकाशाची जाणीव होते. माणसे नेहमी दुसऱ्याचा विचार करतात, स्वत:मध्ये कधी डोकून बघत नाहीत. त्याची त्यांना कल्पनासुद्धा येत नाही. स्वत:ची जाणीव झाल्याशिवाय ईश्वराची वाट सापडणार नाही. ईशतत्त्व प्रथम स्वत:मध्ये यावे, कारण जे स्वत:त आहे तेच ईशतत्त्वात आहे. फक्त जाणीव होणे महत्त्वाचे आहे. कारण ‘स्व’ची आत्मानुभूती येणे म्हणजे ईशतत्त्वाची जाणी होणे होय. ज्यांनी स्वत:ला ओळखले ते ईश्वराला ओळखू शकतात.

आपल्यामध्ये अनंत शक्ती निवास करतात. त्या शक्ती क्रियान्वित करव्या लागतात. योगी आपल्या कुंडलीद्वारे आतल्या शक्तींची जाणीव करून देतात. आतल्या शक्ती जागृत केल्यास ब्रह्मांडात फिरता येते. एका जागेवर बसून ब्रह्मांडाला पाहता येते. पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते. ‘स्व’ला विकसित केल्यास याची प्रचिती येते. मूलाधार चक्रापासून सहस्त्राकार चक्रापर्यंत कुंडलीचा प्रवास म्हणजे जागृती होय. या कुंडलिनी शक्ती तत्त्वाच्या पायऱ्या विकसित करीत चालते. ‘स्व’त्वाची क्रियात्मक शक्ती विकसित झाल्यास आत्मानंदाची पहाट उजाडते. त्या पहाटेच्या अमृतरूपी किरणात न्हाता येते, मग आत्मशक्तींचा प्रत्यय येतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयांचा उलगडा होतो. जल, पृथ्वी, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्त्वाशी समरसता साधता येते.

जीवनाच्या वाटेवरचा प्रवास आल्हाददायक होतो. स्वत्व गुणांची वृद्धी होते. सात्त्विकतेचा पान्हा येतो. आत्मज्ञानरूपी सूर्याचा प्रकाश पडतो. त्या प्रकाशात मनाची गती शांत राहाते. मनाचा कोवळेपणा नाहीसा होऊन, ऊर्जात्मक स्पंदने स्थिरता प्राप्त करून घेतात. आत्मानंदाच्या कृपावलयात मानवी जीवनाचे अंतिम सत्य सापडते. जीवनाचा मार्ग सुखकर करावासा वाटत असेल तर स्वत्वाला ओळखा. ‘स्व’तत्त्व हेच संजीवन तत्त्व आहे. त्याची जाणीव ठेवा.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक